शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

शैक्षणिक साहित्याच्या किमतीत वाढ

By admin | Updated: June 4, 2014 23:49 IST

शासनाने शैक्षणिक दर्जा सुधारण्याचा व सक्तीचे शिक्षण कायदा लागू केला आहे. मात्र भविष्यात गरीब विद्यार्थी शिक्षण घेऊ शकणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील वर्षीच्या शैक्षणिक

वाढत्या महागाईचा फटका : वह्या, कंपास आदींवर १0 ते २0 टक्क्यांनी वाढगोंदिया : शासनाने शैक्षणिक दर्जा सुधारण्याचा व सक्तीचे शिक्षण कायदा लागू केला आहे. मात्र भविष्यात गरीब विद्यार्थी शिक्षण घेऊ शकणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील वर्षीच्या शैक्षणिक साहित्याच्या किंमती १0 ते २0 टक्यांनी वाढल्या आहेत. यामुळे वाढत्या महागाईनंतर आता शैक्षणिक साहित्याच्या किंमती दुप्पटीने वाढल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांवरील शिक्षणाच्या बोझात आणखी वाढ झाली आहे. शासनाच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गंत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तकांचे वाटप करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शासनाकडे नऊ लाख ४७  हजार पुस्तकांची मागणी केली आहे. शाळेतून केवळ आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके मिळत असल्याने आठवीनंतरच्या विद्यार्थ्यांना बाजारातून पाठय़पुस्तकांची खरेदी करावी लागते. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बाजारपेठेतून नोटबुक, कंपास, ड्रॉईंग वही, साध्या वह्या, पेन व अन्य साहित्यांची खरेदी करावी लागते. मात्र दरवर्षी शैक्षणिक साहित्याच्या किमती दुप्पटीने वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खांद्यावरील शिक्षणाचा बोझा दरवर्षी वाढतच आहे. प्रत्येक आई-वडीलांचे स्वप्न असते की, आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घेऊन यशाचे शिखर गाठून आपले नाव मोठे करावे. यासाठी ते आपल्या अन्य गरजांमध्ये काटकसर करुन आपल्या पाल्यांच्या शिक्षणात कुठलीही अडचण येऊ देत नाही. गरीब कुटुंबांतील लोकांना देखील आता शिक्षणाचे महत्व कळले असल्याने ते देखील मोलमजुरी करून आपल्या मुलांना चांगले शिक्षण देत असतात. मात्र दिवसेंदिवस वाढत्या शैक्षणिक साहित्याच्या किंमती व प्रवेश शुल्काने त्यांच्यासमोर समस्यांचे डोंगर निर्माण झाले आहे. शाळा सुरु होण्याकरिता अजुन १0 ते १५ दिवस वेळ असला तरी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास सुरुवात केली. यासाठी बाजारपेठेतील शैक्षणिक साहित्यांची दुकाने देखील सजू लागली आहेत. सध्या बाजारपेठेत मागील वर्षी ज्या वह्यांची किंमत १0 रुपये होती त्याची किंमत १५ ते ३0 रुपये, रजिस्टर २0 रूपयांपासून २५ ते ३५ रूपयांपर्यंत, ड्रॉईंग वही १५ ते ३0  रुपये, कंपासपेटी ५0 ते १२५ रुपये, पेन १0 ते १५ रुपये तर दफ्तर २00 ते ६00 रुपये दराने विक्री केले जात आहेत.  काही वस्तुंवर तर २0 ते ३0 रुपयांची वाढ झाली आहे. बर्‍याच पुस्तक विक्रेत्यांनी मागील दोन-तीन वर्षापासून पाठय़पुस्तके विक्रीस आणणे बंद केले आहे. शाळेतूनच विद्यार्थ्यांंना पाठय़पुस्तके मिळत असल्याने बाजारपेठेतील विक्रेत्यांकडील स्टॉक तसाच पडून राहतो. वाढत्या किंमतीने पाठय़पुस्तक विक्रेते देखील हैराण झाले आहेत. पाठय़पुस्तके, नोटबुक  व अन्य शैक्षणिक साहित्य खरेदी करताना पालकांची मोठी अडचण होत आहे. त्यांचे महिन्याचे बजेट देखील ढासळले आहे. बाजारपेठेत पाठय़पुस्तकांची दुकाने सज्ज झाली असली तरी अजुन या दुकानांमधील गर्दीत वाढ झाली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. पुढील आठवड्यापासून गर्दी वाढण्याचे संकेत एका पुस्तक विक्रेत्याने लोकमतशी बोलताना दिले. (शहर प्रतिनिधी)