शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

शैक्षणिक साहित्याच्या किमतीत वाढ

By admin | Updated: June 4, 2014 23:49 IST

शासनाने शैक्षणिक दर्जा सुधारण्याचा व सक्तीचे शिक्षण कायदा लागू केला आहे. मात्र भविष्यात गरीब विद्यार्थी शिक्षण घेऊ शकणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील वर्षीच्या शैक्षणिक

वाढत्या महागाईचा फटका : वह्या, कंपास आदींवर १0 ते २0 टक्क्यांनी वाढगोंदिया : शासनाने शैक्षणिक दर्जा सुधारण्याचा व सक्तीचे शिक्षण कायदा लागू केला आहे. मात्र भविष्यात गरीब विद्यार्थी शिक्षण घेऊ शकणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील वर्षीच्या शैक्षणिक साहित्याच्या किंमती १0 ते २0 टक्यांनी वाढल्या आहेत. यामुळे वाढत्या महागाईनंतर आता शैक्षणिक साहित्याच्या किंमती दुप्पटीने वाढल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांवरील शिक्षणाच्या बोझात आणखी वाढ झाली आहे. शासनाच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गंत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तकांचे वाटप करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शासनाकडे नऊ लाख ४७  हजार पुस्तकांची मागणी केली आहे. शाळेतून केवळ आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके मिळत असल्याने आठवीनंतरच्या विद्यार्थ्यांना बाजारातून पाठय़पुस्तकांची खरेदी करावी लागते. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बाजारपेठेतून नोटबुक, कंपास, ड्रॉईंग वही, साध्या वह्या, पेन व अन्य साहित्यांची खरेदी करावी लागते. मात्र दरवर्षी शैक्षणिक साहित्याच्या किमती दुप्पटीने वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खांद्यावरील शिक्षणाचा बोझा दरवर्षी वाढतच आहे. प्रत्येक आई-वडीलांचे स्वप्न असते की, आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घेऊन यशाचे शिखर गाठून आपले नाव मोठे करावे. यासाठी ते आपल्या अन्य गरजांमध्ये काटकसर करुन आपल्या पाल्यांच्या शिक्षणात कुठलीही अडचण येऊ देत नाही. गरीब कुटुंबांतील लोकांना देखील आता शिक्षणाचे महत्व कळले असल्याने ते देखील मोलमजुरी करून आपल्या मुलांना चांगले शिक्षण देत असतात. मात्र दिवसेंदिवस वाढत्या शैक्षणिक साहित्याच्या किंमती व प्रवेश शुल्काने त्यांच्यासमोर समस्यांचे डोंगर निर्माण झाले आहे. शाळा सुरु होण्याकरिता अजुन १0 ते १५ दिवस वेळ असला तरी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास सुरुवात केली. यासाठी बाजारपेठेतील शैक्षणिक साहित्यांची दुकाने देखील सजू लागली आहेत. सध्या बाजारपेठेत मागील वर्षी ज्या वह्यांची किंमत १0 रुपये होती त्याची किंमत १५ ते ३0 रुपये, रजिस्टर २0 रूपयांपासून २५ ते ३५ रूपयांपर्यंत, ड्रॉईंग वही १५ ते ३0  रुपये, कंपासपेटी ५0 ते १२५ रुपये, पेन १0 ते १५ रुपये तर दफ्तर २00 ते ६00 रुपये दराने विक्री केले जात आहेत.  काही वस्तुंवर तर २0 ते ३0 रुपयांची वाढ झाली आहे. बर्‍याच पुस्तक विक्रेत्यांनी मागील दोन-तीन वर्षापासून पाठय़पुस्तके विक्रीस आणणे बंद केले आहे. शाळेतूनच विद्यार्थ्यांंना पाठय़पुस्तके मिळत असल्याने बाजारपेठेतील विक्रेत्यांकडील स्टॉक तसाच पडून राहतो. वाढत्या किंमतीने पाठय़पुस्तक विक्रेते देखील हैराण झाले आहेत. पाठय़पुस्तके, नोटबुक  व अन्य शैक्षणिक साहित्य खरेदी करताना पालकांची मोठी अडचण होत आहे. त्यांचे महिन्याचे बजेट देखील ढासळले आहे. बाजारपेठेत पाठय़पुस्तकांची दुकाने सज्ज झाली असली तरी अजुन या दुकानांमधील गर्दीत वाढ झाली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. पुढील आठवड्यापासून गर्दी वाढण्याचे संकेत एका पुस्तक विक्रेत्याने लोकमतशी बोलताना दिले. (शहर प्रतिनिधी)