शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

वनांच्या संवर्धनाने वन्यजीवांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 21:47 IST

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्यात वन्यजीव व विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपाय योजनांचे पाझिटीव्ह परिणाम दिसायला आता सुरूवात झाली आहे. वनांच्या संवर्धनामुळे नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीवांच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत .....

ठळक मुद्देप्राणी गणना : मागील वर्षीच्या तुुलनेत ९७० वन्यप्राण्यांची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्यात वन्यजीव व विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपाय योजनांचे पाझिटीव्ह परिणाम दिसायला आता सुरूवात झाली आहे. वनांच्या संवर्धनामुळे नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीवांच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत समाधानकारक वाढ झाल्याची बाब अलीकडेच झालेल्या प्राणी गणनेनंतर पुढे आली आहे. वन्यजीव प्रेमींसाठी निश्चित ही बाब दिलासादायक आहे.येथील राष्ट्रीय उद्यानाच्या कोअर झोनमध्ये बुध्द पौर्णिमेला करण्यात आलेल्या वन्यप्राणी गणनेत दोन पट्टेदार वाघासह, ५ बिबट, ५५५ रानगवे, २८ चितळ, ५१ सांबर, ३६ चौसिंगा, १०४ निलगायसह २६४४ वन्यप्राण्यांची नोंद झाली. मागील वर्षी १६७४ वन्यप्राण्यांची नोंद झाली होती. या वर्षीच्या वन्यप्राणी गणनेत ९७० वन्यप्राण्यांची वाढ झाली आहे. तर वाघ, बिबट, रानगवे, सांबर या प्राण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिलासादायक चित्र आहे.राष्ट्रीय उद्यानात २९ व ३० एप्रिलला बुध्द पौर्णिमेच्या रात्री ही वन्यप्राणी गणना करण्यात आली. यासाठी ४० पाणवठ्यावर ४० मचानी यासाठी उभारण्यात आल्या होत्या. प्राणी गणनेसाठी १ उपविभागीय वनाधिकारी, वनपरिक्षेत्राधिकारी २, ४ क्षेत्रसहायक, १७ वनरक्षक, तीन पर्यटक, १४ वनमजूर, ५२ हंगामी मजूर अशा एकूण ९० प्रगणकांनी वन्यप्राण्यांची गणना केली. तृणभक्षी प्राण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही वन्यप्राणी गणना राष्ट्रीय उद्यानाच्या १३३.८८ चौरस किलो मीटर परिसरात पसरलेल्या कोअर झोनमध्ये करण्यात आली. मागील वर्षीच्या गणनेत १ वाघ, २ बिबट, २८५ रानगवे, ४४ चितळ, २१ सांबरासह १६७४ वन्यप्राण्यांची नोंद झाली होती. तर यंदा २९ एप्रिलच्या १० वाजेपासून ते ३० एप्रिलच्या सकाळी १० वाजेपर्यंत झालेल्या वन्यप्राणी गणनेत २ वाघ, ५ बिबट, ५५५ रानगवे, २८ चितळ, ५१ सांबर, ३६ चौशिंगा, १०४ निलगाय, ५१ मोर, ३५३ लाल तोंडे माकड, ९९६ काळेतोंडे माकड, १६ मेडकी, ३६ अस्वल, ३७७ रानडुकरे, २ रानमांजर, १ सायाळ, २८ रानकुत्रे, ३५ ससे, ३५ घोरपड, १० झाड विंचू यासह २६४४ वन्यप्राण्यांची नोंद झाली.खोलीग्राम परिस्थितीकी विकास समितीच्या माध्यमातून नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, पिटेझरी, नागझिरा येथील प्रगणकांसाठी व्यवस्था करण्यात आली.सर्वच प्रगणकांनी उत्तम सहकार्य केले. प्रगणकांच्या सुरक्षततेची काळजी विभागाकडून घेण्यात आली. राष्ट्रीय उद्यानाच्या राखीव वनांमध्ये मानवी वावर लाकडासाठी व इतर गोष्टीसाठी वाढू नये, म्हणून राष्ट्रीय उद्यान परिसरातील गावात शामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना प्रभावीपणे राबविली जात आहे.एलपीजी गॅसचे वितरण, गावातील सुशिक्षीत बेरोजगारांसाठी विविध प्रशिक्षण या गावातील महिला बचत गटाचा संघ तयार करुन कॅटरींग तसेच तत्सम व्यवसायासाठी प्रोत्साहीत करुन लघु उद्योगाची उभारणी करणे, शेतीला सोलर कुंपण, दुधाळ गाईचे वाटप करुन या कुटूंबाना रोजगार उपलब्ध करुन दिले जात आहेत. गाभाक्षेत्र लगतचे (कोअर झोन) गावातील लोक अवैध लाकूड, बांबू व अन्य कामासाठी राखीव वनात जाणार नाही, यासाठी त्यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.गावात कार्यशाळा, शिबिर घेऊन विद्यार्थी, नागरिक, महिलांशी संवाद साधून वन्यप्राणी संरक्षण व संवर्धन या विषयीची जनजागृती वन्यजीव संरक्षण विभागाकडून केली जात आहे. गाभा क्षेत्रातील गावातील गावकºयांचे सहकार्य मिळत आहे.या वन्य प्राण्यांचा अभावनवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात बुध्द पोर्णिमेला घेण्यात आलेल्या प्राणी गणनेत चांदी अस्वल, मुंगूस, मसन्याउद, घुबड, तळस, खवल्या मांजर यांची नोंद झाली नाही. त्यामुळे या उद्यानात या वन्यप्राण्यांचा अभाव दिसून आला.उपाय योजनांमुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढनवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या गाभा क्षेत्रातील (कोअर झोन) लगतच्या गावाील लोकांचा राखीव जंगलातील मानवी वावर व हस्तक्षेप कमी झाला. या राखीव जंगलातील कालीमाटी, कवलेवाडा व इतर भागात गवताचे कुरणक्षेत्र वाढले, ३३ कृत्रीम पाणवठे वन्यप्राण्यांसाठी तयार करण्यात आले. पाणवठ्यांची संख्या वाढविण्यात आली. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्यासाठी, चाºयासाठी इतरत्र भटकावे लागत नाही. त्यामुळेचवन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

टॅग्स :forestजंगल