शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

..तर गोंदिया रेल्वे स्थानकावर होऊ शकते बल्लारशासारख्या घटनेची पुनरावृत्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2022 17:15 IST

अरुंद पादचारी पुलामुळे होते गर्दी : प्रवाशांचा जीव धोक्यात; रेल्वे प्रशासनाची डोळेझाक

गोंदिया : रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल कोसळून १७ जण गंभीर झाल्याची घटना रविवारी (दि.२७) चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा रेल्वे स्थानकावर घडली. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावरील जीर्ण झालेल्या पादचारी पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर गोंदिया रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ वर तयार करण्यात आलेल्या अरुंद पादचारी पुलामुळे या पुलावर प्रवाशांची कोंडी होऊन हा पूल कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने येथेही बल्लारशासारख्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावरून दररोज ७५ प्रवासी गाड्या धावतात. तर १५ हजारांवर प्रवासी दररोज ये-जा करतात. या रेल्वे स्थानकावर एकूण सहा फलाट असून सहाही फलाटांवर ये-जा करण्यासाठी पादचारी पुलाची व्यवस्था रेल्वे प्रशासनाने केली आहे. चार वर्षांपूर्वी फलाट क्रमांक पाच आणि सहावर जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल तयार केला.

पादचारी पूल तयार करताना या पुलावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या विचारात घेणे आवश्यक होते. विशेष म्हणजे याच फलाटावर विदर्भ एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेससह काही लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुद्धा थांबतात. या गाड्या गोंदियापर्यंतच असल्याने सर्वच प्रवासी येथेच उतरतात. त्यामुळे या पादचारी पुलावर एकाच वेळी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यातच पादचारी पूल फारच अरुंद असल्याने अनेकदा या ठिकाणी प्रवाशांची कोंडी होते. तर पुलावर प्रवाशांची गर्दी वाढून हा पूल कोसळण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. या पादचारी पुलाचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी प्रवाशांनी अनेकदा रेल्वे विभागाकडे केली. पण त्यांनी याची अद्यापही दखल घेतली नसल्याने रेल्वे विभागाला बल्लारशासारख्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची प्रतीक्षा आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बल्‍लारपूर रेल्वे पूल दुर्घटना: मृताच्‍या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

तांत्रिक विभागाची चूक

फलाट क्रमांक पाचवर चार वर्षांपूर्वी नवीन पादचारी पूल तयार करण्यात आला. पूल तयार करीत असताना या पुलावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या विचारात घेणे गरजेचे होते. पण रेल्वेच्या तांत्रिक विभागाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच अरुंद पुलामुळे अनेकदा या पुलावर प्रवाशांची कोंडी होते.

कोरोना गेला तरी दोन पादचारी पूल बंदच

रेल्वे प्रशासनाने गोंदिया रेल्वे स्थानकावरील दोन पादचारी पूल कोरोनाचे कारण देत बंद केले होते. याला आता दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, दोन्ही पादचारी पूल अद्यापही सुरू केले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना दूरवरून फेरा मारून यावे लागत आहे. हे पादचारी पूल सुरू करण्यास रेल्वे विभागाला नेमकी अडचण काय हे कळण्यास मार्ग नाही.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे