शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

सालेकसा नगरपंचायतमध्ये ना मुख्याधिकारी, ना पदाधिकारी, कारभार वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 16:21 IST

नागरिकांनी व्यथा मांडावी कोणाकडे?

विजय मानकर

सालेकसा (गोंदिया) : येथील नगरपंचायतमध्ये एकीकडे मागील दोन वर्षांपासून नियमित मुख्याधिकारी नाही. त्यात नगराध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला असून कार्यकाळ संपण्याआधी निवडणुका न झाल्यामुळे आता नगरपंचायतचे कामकाज वाऱ्यावर चालत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी आपली व्यथा कोणाकडे मांडावी, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

२०१५ मध्ये सालेकसा ग्रामपंचायतला नगरपंचायत घोषित करण्यात आले. परंतु नगरपंचायतचा परिसर शहराबाहेर असून सालेकसा मुख्यालयासह सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये व मुख्य बाजारपेठ आमगाव खुर्द ग्रामपंचायतच्या हद्दीत असल्याने आमगाव खुर्दलाही नगरपंचायतमध्ये समाविष्ट करण्याची मागणी होऊ लागली. हे प्रकरण शासन दरबारी व कोर्टापर्यंत पोहोचले. दरम्यान, प्रकरण निकाली लागण्याआधीच नगरपंचायतची २०१७ मध्ये पहिली निवडणूक झाली. लोकशाही पद्धतीने नगरपंचायतवर सत्ता स्थापन करण्यात आली. परंतु आमगाव खुर्दला समाविष्ट करण्यासाठी आणखी तीव्र आंदोलन करण्यात आले.

शेवटी शासनाने आमगाव खुर्दला नगरपंचायतमध्ये समाविष्ट केले, परंतु प्रतिनिधित्व देण्यात आले नाही. नव्याने निवडणुका घेऊन संयुक्त नगरपंचायतची सत्ता स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. ती सुद्धा शासनाने पूर्ण केली नाही. त्यामुळे नगरपंचायतमध्ये निवडून आलेले नगराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना आमगाव खुर्दची जबाबदारी सुद्धा देण्यात आली. परंतु आमगाव खुर्दकडे हवे तेवढे लक्ष दिले जात नाही, अशी तक्रार आमगाव खुर्दवासी सतत करीत राहिले. दरम्यान, नगरपंचायतमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद निर्माण होत असल्याने मुख्याधिकारी नियमितपणे टिकून राहिले नाही. याचा परिणाम विकास कामावर होत राहिला. मुख्याधिकाऱ्यांअभावी कारभार कधी दुसऱ्या तालुक्यातील मुख्याधिकाऱ्यांकडे देण्यात आला तर कधी तहसीलदारांकडे अतिरिक्त कारभार देण्यात आला. यामुळे नगरपंचायतचा हवा तसा विकास होऊ शकला नाही.

तहसीलदारही गेले सुट्टीवर

- १२ जानेवारी रोजी नगरपंचायतचा पहिला कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष व विषय समिती सभापती आणि नगरसेवकांचाही कार्यकाळ पूर्ण झाला असून निवडणुका न झाल्याने प्रशासकराज आले आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून नियमित मुख्याधिकारी सुद्धा नाहीत. दीड महिन्यापासून एकीकडे पदाधिकारी तर नाहीच, दुसरीकडे नियमित मुख्याधिकारी नसून मुख्याधिकाऱ्यांचा कारभार येथील तहसीलदारांकडे देण्यात आला आहे. परंतु तहसीलदार सुद्धा मागील दीड महिन्यापासून कौटुंबिक कारणामुळे सुटीवर असल्यामुळे तहसीलदारांचा प्रभार नायब तहसीलदारांकडे देण्यात आला आहे. अशात नगरपंचायतकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे चित्र निर्माण झाले असून, प्रशासनाने येथील नगरपंचायतला वाऱ्यावर सोडले असल्याचे दिसून येत आहे.

दोन नियमित व काही कंत्राटी कर्मचारी

- नगरपंचायतचा कार्यकाळ संपला, त्याआधी निवडणूक होऊन पुन्हा सत्ता स्थापन होईल, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु निवडणूक घेण्यापूर्वी आमगाव खुर्दला विलीन करून नव्याने प्रभाग रचना करण्याची प्रक्रिया करावी लागलेली ती प्रक्रिया सुद्धा आतापर्यंत झालेली नाही. तसेच निवडणूक केव्हा घेण्यात येईल हे सुद्धा स्पष्ट नाही. त्यामुळे नगरपंचायत पदाधिकाऱ्यांविना चालत असून कारभार तहसीलदारांकडे देण्यात आला आहे. परंतु तहसीलदार सुद्धा सुटीवर आहेत. यामुळे दोन-तीन नियमित कर्मचारी आणि काही कंत्राटी कर्मचारी कामकाज पाहत असून जनता किंवा शहरातील समस्यांकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.

टॅग्स :localलोकलgondiya-acगोंदिया