शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

ओलीत क्षेत्राच्या व्याख्येत सुधारणा करा- रहांगडाले

By admin | Updated: October 15, 2015 02:12 IST

ज्याप्रमाणे शासनाच्या आणेवारी पद्धतीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे शासनाच्या कृषी ओलीत क्षेत्राची व्याख्या बदलावी,

तिरोडा : ज्याप्रमाणे शासनाच्या आणेवारी पद्धतीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे शासनाच्या कृषी ओलीत क्षेत्राची व्याख्या बदलावी, अशी आपली मागणी असून याबाबत हिवाळी अधिवेशनात मागणी लावून धरणार असल्याची माहिती आ.विजय रहांगडाले यांनी दिली.तिरोडा क्षेत्रात ३० हजार हेक्टर कृषी क्षेत्र असून त्यात २३ हजार हेक्टर शेतीत खरीप व रबी हंगामात पिक घेतले जाते. ७ हजार हेक्टर शेती कोरडवाहू म्हटल्या जाते. मागील वर्षी धापेवाडा उपसा सिंचन योजनेमध्ये भारनियमनात परिवर्तन करुन सिंचन क्षेत्र वाढविण्यात सफलता प्राप्त करण्यात आली होती.भंडारा-गोंदिया जिल्हा हा लहान तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. या तलावात १५ ते २० दिवसाच्या पावसाची साठवणूक क्षमता असून २५ वर्ष जुनी क्षमता लक्षात घेतली जाते. राजस्व विभागाच्या रेकॉर्डनुसार ७/१२ वर ओलीत क्षेत्र नमूद केले असल्याने विविध योजनांचा लाभ घेता येत नाही. ७/१२ वरील ओलीत क्षमता ही ३ महिने, ६ महिने की १२ महिने याचा उल्लेख नसतो. फक्त १५ दिवस शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देवून महसूल व सिंचन विभाग ओलीत क्षेत्र दाखवून आणेवारी पद्धतीप्रमाणे ओलीत क्षेत्राची सुद्धा फसवणूक करीत आहे. त्यामुळे ज्यांना १५ दिवस पाणी मिळते त्यांना सुद्धा ओलीत समजून विविध योजनांपासून त्यांना वंचित ठेवण्यात येत आहे. मात्र याचे निकष बदलविल्यास शेतकऱ्यांना निश्चितपणे त्याचा फायदा होणार असल्याने आ.रहांगडाले यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उचलून ओलीत क्षेत्राच्या व्याख्येत परिवर्तनाची मागणी करणार असल्याचे आ.विजय रहांगडाले यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)