शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

तंटामुक्त गाव मोहिमेमुळे अवैध दारूविक्रेत्यांना लगाम

By admin | Updated: October 13, 2016 01:59 IST

गावातील अवैध दारूमुळे गावाचे वातावरण दूषित होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने एक आदेश काढून गावागावांत ...

भट्ट्यांना बसतोय आळा : अवैध दारूमुळे गावाचे वातावरण झाले होते दूषितगोंदिया : गावातील अवैध दारूमुळे गावाचे वातावरण दूषित होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने एक आदेश काढून गावागावांत चालणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यांच्या भट्ट्या बंद पाडून त्यांना पर्यायी रोजगाराकडे वळवावे, असे सांगितले. त्यानुसार जिल्ह्यातील ५५१ तंटामुक्त गाव समित्यांनी जिल्ह्यातील हजारो अवैध दारू विक्रेत्यांची दुकाने बंद पाडली. कालांतराने सुरू होणाऱ्या या दारू विक्रेत्यांना आता तुरुंगात डांबण्याची मोहीम सुरू केल्याने त्या दारू विक्रेत्याची माहिती पोलिसांना पुरुवण्यासाठी तंटामुक्त गाव मोहीम सक्रीय झाली आहे.गावातील अवैध दारूमुळे वाढणारे तंटे सोडविणे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला जड जात होते. हे पाहून महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने क्रमांक एम. आय. एस.१००७ /सी.आर.२३८ /पोल-८ दि. १९ जुलै २००७ व शासन निर्णय गृहविभाग एम. आय. एस.१००८/ सी.आर.४३/२००८ पोल-८ दि.१४ आॅगस्ट २००८ व वी.स.आ.१००८ /६६९/ प्र.क्र.८१ /0८ पोल-मंत्रालय मुंबई अनुसार २४ नोव्हेंबर २००८ रोजी अवैध धंद्यांना प्रतिबंध घालणे व त्याचे निर्मूलन करण्यासाठी निर्णय काढला. या निर्णयामुळे गावागावांत अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर गदा आली. परंतु त्या विक्रेत्यांना पर्यायी रोजगाराकडे वळविण्याचे कामही महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी केले. या अवैध दारूतून गावाचे वातावरण दूषित होऊन भांडणे होत होती. यामुळे आर्थिक नुकसानी बरोबर कुटुंबाची व समाजाची शांतता धोक्यात येत होती. त्या दृष्टीने गावात तंटे होणार नाही यासाठी अवैध दारूवर आळा घालण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने पोलिसांची मदत घेऊन आपल्या गावातील अवैध दारूविक्री बंद पाडली. प्रत्येक गावात मोहफुलांपासून दारू काढणाऱ्या भट्या बंद पाडल्या. गोंदिया जिल्ह्यातील जवळजवळ दीड हजार दारूभट्ट्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी बंद पाडल्या. या अवैध दारूविक्रीवर जे कुटुंब चालत होते, अशा कुटुंबांतील सदस्यांना समाजात सन्मानाने जगण्याची शिकवण देऊन त्यांना पर्यायी रोजगाराकडे वळविले. तंटामुक्त गाव समितीच्या या उपक्रमामुळे दररोज सायंकाळी होणारे तंटे शांत झाले. गावाचे वातावरण शांततेकडे वळू लागले. आता या समित्यांनी जुगाराच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. गावातील चौकाचौकांत किंवा अनेकांच्या घरी खेळले जाणारे जुगार त्यांच्या कुटुंबांना उघड्यावर आणते. त्यांच्यात कामाबद्दल उदासीनता वाढून काही न करता पैसे मिळावे, अशी धारणा निर्माण होते. म्हणून या जुगार अड्ड्यांवर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे कार्यकर्ते पोलिसांसोबत धाड घालून जुगार खेळणे बंद करणार आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या कार्यकर्त्यांच्या सक्रियेतेमुळे अनेक गावांतील अवैध दारूभट्ट्या बंद झाल्या आहेत. परंतु अनेक दारूभट्ट्या लपूनछपून अजूनही सुरू आहेत. काही गावांत पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध दारूविक्री जोमाने सुरू आहे. या अवैध दारूवर आळा घालण्यासाठी व तंटामुक्त गाव मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी पोलिसांनी समित्यांना सहकार्य करावे, अशी मागणी समित्यांचे कार्यकर्ते करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)