शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पेयजल स्रोत झाले दुर्लक्षित

By admin | Updated: May 19, 2016 01:22 IST

शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात केली जात आहे.

बोअरवेल्सची दुरूस्ती सुरू : नगर परिषदेला उशिरा आली जागगोंदिया : शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात केली जात आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी टंचाई निर्माण झाली असून सर्वांना शहरातील विहिरी व बोअरवेल्सवर धाव घ्यावी लागत आहे. त्या जलस्त्रोतांची देखभाल दुरूस्ती होत नसल्यामुळे नागरिकांनी फजिती होत आहे. आधीच नगर परिषदेकडून दुरूस्त व स्वच्छता करण्यात आली असती तर या पाणी टंचाईचा सामना करण्यात अडचणी गेल्या नसत्या, मात्र आता ऐन पाणी टंचाईच्या काळात बोअरवेल्स दुरूस्तीचे काम नगर परिषदेने सुरू केले आहे.शहरात नगर परिषदेच्या ७०० बोअरवेल्स आहेत. त्यातील बऱ्याच चांगल्या असल्या तरी काही खराब आहेत. त्या युद्धस्तरावर दुरूस्ती केल्या जात आहे. नगर परिषदेजवळ दोन पाणी टँकर आहेत. परंतु ट्रॅक्टर एकच असल्यामुळे दोनपैकी एकाच पाण्याच्या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सद्यस्थितीत भाड्याने एक ट्रॅक्टर घेऊन दोन्ही टँकरंद्वारे गरजूंना पाणी पुरवठा करणे गरजेचे झाले आहे. नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन लोकांना बोअरवेल्स दुरूस्तीचे कंत्राट देण्यात आले आहे. मागील १५ दिवसांत जवळपास ७५ बोअरवेल्स दुरूस्त करण्यात आल्या आहेत. शहरात ७०० बोअरवेल्ससह नगर परिषदेच्या ५२ विहिरी आहेत. त्या सर्वांमध्ये पंप हाऊस लावले आहेत. पंपाद्वारे टाक्यांमध्ये पाणी भरण्यासाठी कर्मचारी नियुक्त आहेत. या पंपहाऊसचे निरीक्षण केल्यावर ते काम करीत असल्याचे दिसून येते, मात्र रखरखाव नसल्याचे स्पष्ट दिसून येते.छोटा गोंदियाच्या चावडी चौकातील पाणी टाकीच्या भिंतीमध्ये वडाचे लहान रोपटे उगवले आहे. हे रोपटे मोठे होवून पाणी टाकीला नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. त्यांना योग्यवेळी कापून घेणे गरजेचे आहे. गोरेगाव चौकातील विहिरीचे पाणी पूर्वी नागरिक पिण्यासाठी उपयोगात आणत असत. परंतु सध्याच्या दिवसांत या विहिरीचे पाणी एवढे घाण आहे की पाणी पिणे तर दुर त्या विहिरीकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही. त्या विहिरीच्या आतसुद्धा झाड उगविले आहेत. हे लहान झाड विहिरीला नुकसान करू शकते.प्रत्येक वर्षी मे महिन्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे पाण्याची कपात केली जाते. अशात नगर परिषदेने विहिरी व पाणी टाकींची स्वच्छता व देखभालीकडे वेळेपूर्वीच लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणीसुद्धा आहे. सूर्याटोला आंबेडकर चौक येथील रहिवाशांनी नगर परिषद पाणी विभागात त्यांच्या परिसरातील पंप खराब झाल्याचे सांगितले. न.प. कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांत दुरूस्त करू असे सांगितले आहे.(प्रतिनिधी)