शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
4
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
5
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
6
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
7
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
8
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
9
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
10
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
11
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
12
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
13
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
14
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
15
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
16
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
17
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
18
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
19
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
20
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
Daily Top 2Weekly Top 5

२५ वर्षांपासून खमाटा बायपास रस्त्याची उपेक्षा

By admin | Updated: January 28, 2015 23:36 IST

गोंदिया-भंडारा या दोन जिल्ह्याला जोडणारा बहुचर्चीत खमाटा मार्ग कोसमतोंडीजवळ अडलेला आहे. कोसमतोंडीच्या बाहेरुन जाणारा प्रस्तावित असलेल्या खमाटा मार्गाची मागील २५ वर्षापासून उपेक्षा होत आहे.

कोसमतोंडी : गोंदिया-भंडारा या दोन जिल्ह्याला जोडणारा बहुचर्चीत खमाटा मार्ग कोसमतोंडीजवळ अडलेला आहे. कोसमतोंडीच्या बाहेरुन जाणारा प्रस्तावित असलेल्या खमाटा मार्गाची मागील २५ वर्षापासून उपेक्षा होत आहे.या मार्गावर कोसमतोंडी जवळील नाल्यावर दीर्घ प्रतिक्षेनंतर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनाची वर्दळ वाढलेली आहे. परंतु कोसमतोंडीच्या बाहेरुन जाणाऱ्या खमाटा बायपासचे काम का अडलेले आहे असा प्रश्न या परिसरातील जनतेला पडलेला आहे. शासनाने या रस्त्याच्या बांधकामासाठी कोट्यवधी रुपये दिले होते. परंतु अजूनपर्यंत या रस्त्याचे बांधकाम प्रत्यक्षात पूर्ण झाले नाही. त्यामुळे हा रस्ता अधिकारी व राजकीय पदाधिकारी मिळून कागदावरच तर पूर्ण केला नाही ना, अशी शंका जनतेकडून व्यक्त केल्या जात आहे.२५ वर्षापूर्वी खमाटा बायपास रस्त्याचा आराखडा कोसमतोंडी गावाच्या बाहेरुन प्रस्तावित करण्यात आला. याला संबंधित विभागाची मंजुरीही मिळाली. काही ठिकाणी नालीचे काम पण झाले. त्यानंतर मात्र काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. खरे पाहता या रस्त्याच्या कामात ज्या शेतकऱ्यांची जमीन अधिगृहित करण्यात आली त्यांना शासनाकडून मोबदला मिळाला आहे. जमीन हस्तांतरणाची प्रक्रियाही पूर्ण झाली. मात्र प्रत्यक्ष कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पावणी मुरते कुठे? असा प्रश्न कोसमतोंडी परिसरातील जनतेसमोर आहे. बायपास रस्त्याअभावी जड वाहनेसुद्धा गावातून जातात. त्यामुळे लहान मोठे अपघात नेहमीच घडत असतात. सतत वाढत असलेल्या वाहनाच्या वर्दळीमुळे ग्रामपंचायतच्या नाल्यांचे मोठे नुकसान होत आहे व वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी बस गावाबाहेरच थांबते. त्यामुळे प्रवाशांना पायी चालत गावात यावे लागते. धानोरी, लेंडेझरी व मुरपार येथे बस जातच नाही. त्यामुळे येथील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तीन वर्षापूर्वी या रस्त्याच्या वाहनांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू करण्यात येत असल्याचा दावा संबंधित विभागाकडून करण्यात आला. मात्र अजूनपर्यंत या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे सदर बायपास कधी पूर्ण होणार अशा प्रश्न येथील जनतेला पडलेला आहे. (वार्ताहर)