शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
3
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
4
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
5
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
6
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
7
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
8
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
9
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
10
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
11
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
12
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
13
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
14
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

२५ वर्षांपासून खमाटा बायपास रस्त्याची उपेक्षा

By admin | Updated: January 28, 2015 23:36 IST

गोंदिया-भंडारा या दोन जिल्ह्याला जोडणारा बहुचर्चीत खमाटा मार्ग कोसमतोंडीजवळ अडलेला आहे. कोसमतोंडीच्या बाहेरुन जाणारा प्रस्तावित असलेल्या खमाटा मार्गाची मागील २५ वर्षापासून उपेक्षा होत आहे.

कोसमतोंडी : गोंदिया-भंडारा या दोन जिल्ह्याला जोडणारा बहुचर्चीत खमाटा मार्ग कोसमतोंडीजवळ अडलेला आहे. कोसमतोंडीच्या बाहेरुन जाणारा प्रस्तावित असलेल्या खमाटा मार्गाची मागील २५ वर्षापासून उपेक्षा होत आहे.या मार्गावर कोसमतोंडी जवळील नाल्यावर दीर्घ प्रतिक्षेनंतर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनाची वर्दळ वाढलेली आहे. परंतु कोसमतोंडीच्या बाहेरुन जाणाऱ्या खमाटा बायपासचे काम का अडलेले आहे असा प्रश्न या परिसरातील जनतेला पडलेला आहे. शासनाने या रस्त्याच्या बांधकामासाठी कोट्यवधी रुपये दिले होते. परंतु अजूनपर्यंत या रस्त्याचे बांधकाम प्रत्यक्षात पूर्ण झाले नाही. त्यामुळे हा रस्ता अधिकारी व राजकीय पदाधिकारी मिळून कागदावरच तर पूर्ण केला नाही ना, अशी शंका जनतेकडून व्यक्त केल्या जात आहे.२५ वर्षापूर्वी खमाटा बायपास रस्त्याचा आराखडा कोसमतोंडी गावाच्या बाहेरुन प्रस्तावित करण्यात आला. याला संबंधित विभागाची मंजुरीही मिळाली. काही ठिकाणी नालीचे काम पण झाले. त्यानंतर मात्र काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. खरे पाहता या रस्त्याच्या कामात ज्या शेतकऱ्यांची जमीन अधिगृहित करण्यात आली त्यांना शासनाकडून मोबदला मिळाला आहे. जमीन हस्तांतरणाची प्रक्रियाही पूर्ण झाली. मात्र प्रत्यक्ष कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पावणी मुरते कुठे? असा प्रश्न कोसमतोंडी परिसरातील जनतेसमोर आहे. बायपास रस्त्याअभावी जड वाहनेसुद्धा गावातून जातात. त्यामुळे लहान मोठे अपघात नेहमीच घडत असतात. सतत वाढत असलेल्या वाहनाच्या वर्दळीमुळे ग्रामपंचायतच्या नाल्यांचे मोठे नुकसान होत आहे व वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी बस गावाबाहेरच थांबते. त्यामुळे प्रवाशांना पायी चालत गावात यावे लागते. धानोरी, लेंडेझरी व मुरपार येथे बस जातच नाही. त्यामुळे येथील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तीन वर्षापूर्वी या रस्त्याच्या वाहनांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू करण्यात येत असल्याचा दावा संबंधित विभागाकडून करण्यात आला. मात्र अजूनपर्यंत या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे सदर बायपास कधी पूर्ण होणार अशा प्रश्न येथील जनतेला पडलेला आहे. (वार्ताहर)