शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

घरकुल मिळाले नसल्यास ॲपवर स्वतःच करा अर्ज आणि मिळवा आपल्या हक्काचे घरकुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 17:30 IST

गरजवंतांना मिळेल हक्काचा निवारा : स्वतःच सर्वेक्षण करा अन् द्या घोषणापत्र

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आम्हाला गरज असताना घरकूल दिले नाही, श्रीमंतांची नावे घरकुलाच्या यादीत आहेत, सरपंच, सचिवाने नाव यादीतून वगळले, अशी ओरड नेहमीच असते. यावरून अनेकदा वादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होतात. पण, आता ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. तर, घरकुलासाठी होणारी ओरड कायमची बंद होणार आहे. केंद्र सरकारने ज्यांना घरकूल मिळाले नाही, त्यांच्यासाठी 'आवास प्लस २०२४' हे अॅप जारी करून या अॅपवर घरकुलासाठी अर्ज करा अन् हक्काचे घरकूल मिळवा, असे जि. प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने २ कोटी घरे बांधण्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी सन २०२४-२५ ते २०२८-२९ या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ सुरू करण्याची घोषणा केली आहे. सन २०१८ मध्ये झालेल्या घरकुलाच्या सर्वेक्षणासंदर्भात मोठी ओरड होती. प्रतीक्षा यादीत समाविष्ट न झालेले किंवा सिस्टीमद्वारे अपात्र झालेल्या लोकांनाही घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. ज्यांनी घरकुलाचा लाभ यापूर्वी घेतला नाही आणि कच्या घरात ज्यांचे राहणे आहे, अशा लोकांना घरकुलाचा लाभ दिला जाणार आहे. आता घरकूल आम्हाला मिळाले नाही, अशी ओरड कायमची थांबणार आहे.

१ एप्रिल पासून होणार सुरुवातआपल्याला घरकूल हवा असेल, तर 'आवास प्लस २०२४' या अॅपवर जाऊन १ एप्रिल २९२५ पासून अर्ज करू शकता. त्या अर्जाची चाचणी होईल. हे अर्ज ग्रामीण भागातील नागरिकच करू शकतात. या योजनेचा लाभअधिक लोकांनी घ्यावे, असे आवाहन ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर यांनी केले आहे.

ग्राम पंचायत अधिकारी राहणार सर्वेअरआपल्या गावातील ग्राम पंचायत अधिकारी हा या घरकुलांचा सर्वेअर राहणार आहे. नागरिकांनी 'आवास प्लस २०२४' या अॅपवर स्वतः अर्ज करावे किंवा आपल्या गावातील ग्राम पंचायत अधिकारी यांच्याकडून अर्ज करून घ्यावे. पात्र असलेल्या आणि अचूक माहिती भरणाऱ्या नागरिकाला घरकुलाचा लाभ हमखास मिळणार आहे, असे विस्तार अधिकारी सांख्यिकी वैशाली खोब्रागडे यांनी सांगितले.

"जिल्ह्यातील गरजू नागरिकांना घरकूल देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायती सज्ज झाल्या आहेत. सर्व ग्राम पंचायतींनी ई-केवायसी केली असून, ग्राम पंचायत अधिकारी या घरकुलांचे सर्वेअर म्हणून काम पाहत आहेत. गरजूंनी स्वतः अॅपवर जाऊन अर्ज करावे किंवा ग्राम पंचायत अधिकाऱ्यामार्फत घरकुलासाठी अर्ज करावे."- एम. मुरूगानंथम, मुकाअ जि. प. गोंदिया.

"सन २०१८ च्या घरकुलाच्या यादीत ज्यांचे नाव घरकुलासाठी आले नाही आणि ज्यांना घरकुलाची गरज आहे. अशा सर्वांना केंद्र शासनाकडून घरकूल देण्यात येणार आहे. यासाठी गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी घरकुलासाठी सेल्फ अर्ज करावे किंवा आपल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे घरकुलासाठी अर्ज करावे."- लायकराम भेंडारकर, अध्यक्ष जि.प. गोंदिया.

टॅग्स :gondiya-acगोंदियाgovernment schemeसरकारी योजना