शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

मी आत्महत्या करतोय.... पत्नीशी संवाद साधत गुलाबने आवळला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 05:00 IST

अति मद्य सेवन करून त्याने घराची वाट न धरता आपल्या शेतशिवाराची वाट धरली. कोणतेही टेन्शन, त्रास, कर्जबाजारीपणा नसताना सुद्धा गुलाबने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेऊन शेतामध्ये गेला. गळफास घेण्यापूर्वी त्याने पत्नी आशाला मोबाईलवरून फोन करून ‘हे माझे शेवटचे बोलणे आहे. मी मरतो... मरणाले ये जो एवढे बोलून गुलाबने आपल्या लहान २ मुलांचा, पत्नीचा विचार न करता शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपविली. 

ठळक मुद्दे ‘हे माझे आता शेवटचे बोलणे..’ भाऊ शेतात पोहोचेपर्यंत प्राणज्योत मालवली

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : पत्नी, २ मुले व आई सोबत एकत्र राहून संसाराचा गाडा ओढणारा गुलाब एकाएकी दारूच्या आहारी गेला. गुण्यागोविंदाने त्यांचा संसार फुलत होता. या सुखी संसाराला काळाची नजर लागली. अत्र्यांच्या ‘एकच प्याला’ नाटकाप्रमाणे गुलाबने आपल्या सुखी संसाराची राखरांगोळी केली. गळफास घेण्यापूर्वी गुलाबने पत्नीशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला. हे माझे शेवटचे बोलणे. ‘मी आता मरतो,... मरणाला येशील’ असे बोलून स्वत:च्या शेतशिवारातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली. मन हेलावणारी ही घटना मंगळवारी (दि. २४) अर्जुनी माेरगाव तालुक्यातील येरंडी विहीरगाव येथे घडली. गुलाब महादेव हेमणे (३७ वर्षे) असे त्या गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहित युवकाचे नाव आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी विहीरगाव या गावात ही मनाला सुन्न करणारी दुर्दैवी घटना आहे. येरंडी येथील महादेव हेमणे यांना मंगेश व गुलाब अशी दोन मुले, दोघांचेही लग्न होऊन वैवाहिक जीवन जगत आहेत. वडिलोपार्जित ४ एकर जमीन. दोन भावांचे वेगवेगळे कुटुंब, गुलाब हा लहान मुलगा असल्याने आई वडिलांसोबत पत्नी व २ मुलांसह स्वतंत्र राहत होता. जुलै २०२१ मध्ये वडिलांचा मृत्यू झाला. गुलाबकडे ३ एकर शेतजमीन होती. पत्नी आशा, मुलगा सूरज (११), सोहम (७) व आई असे ५ जणांच्या कुटुंबाचा गुलाब हा कर्ता पुरुष. दही-दूध विकणे, शेती करून कुटुंबाची घडी बऱ्यापैकी बसवली होती. घरामध्ये सर्व आनंदीमय वातावरण. सर्व व्यवस्थित कारभार सुरू होता. सासुरवाडी परसटोला (एकोडी) येथे वैवाहिक कार्यक्रम असल्याने गुलाब आपल्या कुटुंबासह गावाला गेला होता. रब्बीच्या हंगामातील धानाचे पीक कापणीला आल्याचे सांगून पत्नी व मुलांना सासुरवाडीमध्ये ठेवून सोमवारी रात्रीपर्यंत गुलाब स्वगावी परतला. मोठा भाऊ मंगेशकडे रात्रीचे जेवण केले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळच्या वेळी तेंदूपत्त्याचे १५०० रुपये फळी मुन्शीकडून मागून घेतले. घराशेजारील गावातील ओळखीच्या बाईला ‘मरनाले येशील’ असे म्हणून गुलाब घरातून बाहेर निघून गेला. 

 ‘हे माझे आता शेवटचे बोलणे..’ - मंगळवारी घटनेच्या दिवशी गावाजवळील बाक्टी येथे गेला, काहींचे उधार पैसे त्यांनी दिले. अति मद्य सेवन करून त्याने घराची वाट न धरता आपल्या शेतशिवाराची वाट धरली. कोणतेही टेन्शन, त्रास, कर्जबाजारीपणा नसताना सुद्धा गुलाबने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेऊन शेतामध्ये गेला. गळफास घेण्यापूर्वी त्याने पत्नी आशाला मोबाईलवरून फोन करून ‘हे माझे शेवटचे बोलणे आहे. मी मरतो... मरणाले ये जो एवढे बोलून गुलाबने आपल्या लहान २ मुलांचा, पत्नीचा विचार न करता शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपविली. 

 भाऊ शेतात पोहोचेपर्यंत प्राणज्योत मालवली 

- जीवाला आघात पोहोचविणारा फोन येताच पत्नीने गुलाबच्या मोठ्या भावाला लगेच फोन करून माहिती सांगितली. फोन येताच मंगेश हेमणे यांनी दोघांना सोबतीला घेऊन शेतीकडे धाव घेतली. घटनास्थळी पोहोचेपर्यंत गुलाबची प्राणज्योत मालवली होती. घटनेची माहिती पोलीस स्टेशनला देण्यात आली. प्रेताची उत्तरीय तपासणी करून येरंडी गावात सायंकाळी गुलाबवर अंतिम संस्कार करण्यात आले. 

 

टॅग्स :Deathमृत्यू