शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

चक्रीवादळ गारपिटीचा चिचगड परिसराला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक पाऊस गारपिटीसह चक्रीवादळाला सुरूवात झाली. चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा येथील वनविभागाच्या वसाहतीला बसला झाली.वनक्षेत्राधिकारी निवासस्थान आणि वनरक्षकाचे निवासस्थानाचे संपूर्ण छत उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण : घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड

लोकमत न्यूज नेटवर्कचिचगड : देवरी तालुक्यातील चिचगड परिसरात मंगळवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास आलेल्या चक्रीवादळ आणि गारपिटीचा फटका या परिसरातील रब्बी पिके आणि घरांना मोठ्या प्रमाणात बसला. चक्रीवादळामुळे अनेक घरांचे छत उडाले तर काही प्रमाणात घरांची पडझड सुध्दा झाली आहे. यामुळे गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक पाऊस गारपिटीसह चक्रीवादळाला सुरूवात झाली. चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा येथील वनविभागाच्या वसाहतीला बसला झाली.वनक्षेत्राधिकारी निवासस्थान आणि वनरक्षकाचे निवासस्थानाचे संपूर्ण छत उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. चक्रीवादळामुळे वनपरिक्षेत्राधिकारी शासकीय निवासस्थानचे छत पूर्ण उडाले व त्यावर निंबाचे झाड कोसळल्याने अधिक नुकसान झाले. वायरलेस टॉवर पडून कार्यालयाचे नुकसान झाले. चक्रीवादामुळे चिचगड येथील अनेक घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे गावकऱ्यांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दिवस उजाडताच अनेक शेतकºयांनी आपल्या शेताकडे धाव नुकसानीची पाहणी केली. हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील दोन दिवस गारपीट आणि पावसाचा इशारा दिला असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.अर्जुनी मोर. तालुक्यातील तीन गावांचे नुकसानमंगळवारी आलेल्या चक्रीवादळ आणि गारपिटीचा फटका अर्जुनी मोरगाव तालुक्यातील रामपुरी, एलोडी, जांभळी या गावांना बसला. या तिन्ही गावातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. तलाठी आणि कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरूवात केली आहे.जिल्हाधिकाºयांनी दिले सर्वेक्षणाचे नुकसानदेवरी व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील काही गावांना मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसला. यामुळे मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली असून रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाºयांना दिले आहे.

टॅग्स :Rainपाऊस