शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

माकडांच्या हैदोसाने गावकऱ्यांच्या नाकी नऊ

By admin | Updated: December 19, 2015 01:48 IST

परिसरातील शेतकरी दिवसभर कबाडकष्ट करून पिकांची लागवड करतात. परंतु माकडांच्या अतिउपद्रवामुळे पिकांची नासाडी तर होतच आहे.

रावणवाडी : परिसरातील शेतकरी दिवसभर कबाडकष्ट करून पिकांची लागवड करतात. परंतु माकडांच्या अतिउपद्रवामुळे पिकांची नासाडी तर होतच आहे. शिवाय घरावरील कवेलूंचीही मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे. यामुळे ग्रामीण जनतेला त्रास सहन करावा लागत असतानाच आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागत आहे. या परिसरातील गावांमध्ये बऱ्याच काळापासून माकडांचा वावर आहे. माकडांचे कळपच गावात शिरून उच्छाद घालतात. आजही ग्रामीण भागात कौलारू घरांची संख्या अधिक आहे. अशात माकडांचे कळप घरांच्या छतावर धिंगाणा घालतात व त्यामुळे कवेलूंची तोडमोड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परिणामी गावकऱ्यांना अतिरीक्त आर्थिक भुर्दंड सहन करावे लागत आहे. सध्याचा आधुनिक काळात देशी कवेलू बनविण्याचा व्यवसाय आधीच बंद पडल्यामुळे जनतेला आता त्या रिकाम्या जागी टीनपत्रे किंवा सिमेंट सीट घालणे भाग पडत आहे. आजही ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूरांकडे एवढा पैसा नसल्याने त्यांना घरावर एवढा खर्च करणे न परवडणारे होत आहे. हा प्रकार फक्त एवढ्यावरच थांबत नसून खाद्याच्या शोधात माकडांकडून शेतातील पिकांचीही मोठ्या प्रमाणात नुकसानी केली जाते. ज्या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान वन्यप्राणी करीत असतात. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जेवढे नुकसान झाले तेवढीच आर्थिक मदत वनविभागातर्फे देणे आवश्यक आहे. मात्र माकडांच्या उपद्रवामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वनविभागाकडून कधीच शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. (वार्ताहर)म्हणून शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली राहणारा शेतकरी वन्यप्राण्यांच्याकडून होणाऱ्या नुकसानीने पूरता खचून गेला आहे. एखाद्या शेतकऱ्याने शेतीच्या भोवताल विद्युत प्रवाहाचे कुंपन घातले. तर काही शेतकरी पिकांवर विष प्रयोग करतात. त्यामुळे एखाद्या वन्यप्राण्याचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीला वनविभागाकडून वन्यप्राणी सरंक्षण कायद्याचा धाक दाखवून कोर्टाच्या पायऱ्या चढायला भाग पाडतात. तर काही ठिकाणी वन्यप्राणी कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या मृत्युबाबद तुरूगांत डांबतात. अशावेळी शेतकऱ्यांनी करावे तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येऊन माकडांचा कायमचा बंदोबस्त करून संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येबाबद उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)