शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
3
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
4
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
5
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
6
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
7
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
8
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
9
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
10
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
11
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
12
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
13
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
14
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
15
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
16
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
17
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
18
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
19
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

संततधार पावसाने शेकडो घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 22:19 IST

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनर्रागमन झाले असून मंगळवारी रात्री झालेल्या संततधार पावसामुळे चार तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेकडो घरांची पडझड झाली. तर पावसामुळे अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातील काही मार्ग बंद झाले होते.

ठळक मुद्देचार तालुक्यात अतिवृष्टी : तिरोडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस, काही मार्ग बंद, शेतकऱ्यांना दिलासा, रोवणीला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनर्रागमन झाले असून मंगळवारी रात्री झालेल्या संततधार पावसामुळे चार तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेकडो घरांची पडझड झाली. तर पावसामुळे अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातील काही मार्ग बंद झाले होते. बुधवारी सकाळी ११ वाजतापर्यंत पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाचे चार दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले. पावसामुळे घरे आणि गोठे कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात बुधवारी सकाळी ८ वाजतापर्यंत सरासरी ६५.५१ मि.मी.पावसाची नोंद झाली.दुपारनंतर पावसाने उघडीप घेतली होती.सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचे पुनर्रागमन झाले. मंगळवार आणि बुधवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता.त्यामुळे जिल्ह्यातील काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते.अर्जुनी मोरेगाव तालुक्यातील बोरी-मांडोखाल,इटखेडा-सिरोली, बोरी ते कोरंभीटोला मार्गावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत हे मार्ग बंद होते. तर या भागात पावसाची रिपरिप कायम होती. मंगळवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे गोरेगाव ६७.४०, तिरोडा ११६, अर्जुनी मोरगाव ७२.९६ आणि सडक अर्जुनी तालुक्यात ७२.५३ मि.मी.पावसाची नोंद झाल्याने या तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे या तालुक्यातील नदी नाले भरुन वाहत होते. शेतातील बांध्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रोवणीची कामे सुध्दा शेतकऱ्यांना बंद ठेवावी लागली. या चार तालुक्यांच्या तुलनेत गोंदिया ४९.५७, देवरी ३५.७०, सालेकसा ४७.५३, आमगाव तालुक्यात ४०.५० मि.मी.पावसाची नोंद झाली. या तालुक्यात कमी प्रमाणात पाऊस झाला.संततधार पावसामुळे अर्जुनी मोरगाव, तिरोडा, सडक अर्जुनी व गोरेगाव या तालुक्यात ३३६ घरे आणि गोठ्यांची पडझड झाली. यात ६ घरे पूर्णत: कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.महसूल विभागाने प्राथमिक सर्वेक्षण करून पडझड झालेल्या ३३६ घरे आणि गोठ्यांपैकी १६५ घरे आणि गोठे मदतीस पात्र ठरविले.जिल्ह्यात पावसाची रिपरिप कायम असल्याने पुजारीटोला धरणाचे चार दरवाजे ०.३० मिटरने उघडण्यात आले होते.धरणातून पाणी सोडल्याने बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठा लगतच्या गावकऱ्यांना सर्तकतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला होता.जिल्ह्यात आत्तापर्यंत ७७ टक्के पाऊसजून आणि जुलै महिन्यात पाऊस न झाल्याने पावसाची तूट वाढली होती.त्यामुळेच दमदार पावसानंतरही सरासरी गाठलेली नाही.जिल्ह्यात मागील वर्षी १४ आॅगस्टपर्यंत ८२ टक्के पाऊस झाला होता. यंदा याच तारखेपर्यंत ६६९.५५ मि.मी.म्हणजे ७७ टक्के पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात याच तारखेपर्यंत ८६९.६९ मि.मी.सरासरी पाऊस पडतो. मात्र आत्तापर्यंत केवळ ७७ टक्के पाऊस झाल्याने पावसाची तूट कायम आहे.रोवणीसाठी होणार मदतजिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने रोवणीच्या कामाला वेग आला आहे. तसेच यापूर्वी केलेल्या रोवण्यांना देखील या पावसाची मदत होणार आहे. दमदार पावसामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.धरणातील पाणीसाठ्यात वाढजिल्ह्यात जून जुलै महिन्यात पाऊस झाला नव्हता त्यामुळे सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा शिल्लक होता.त्यामुळे पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र मागील आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली असून सिंचन प्रकल्पांमध्ये सरासरी ५० टक्के पाणीसाठा आहे.नुकसानीच्या सर्वेक्षणाला सुरूवातमंगळवारी रात्रीच्या सुमारास अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने या तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरे आणि गोठ्यांची पडझड झाली. पावसामुळे पडलेल्या घरे आणि गोठ्यांचे नुकसानीचे सर्वेक्षण करण्यास महसूल विभागाने सुरूवात केली आहे.तिरोडा तालुक्यात सर्वाधिक पाऊसतिरोडा तालुक्यात बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सर्वाधिक ११६ मि.मी.पावसाची नोंद झाली होती.त्यामुळे या तालुक्यातील नदी नाले भरुन वाहत होते. तर काही नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत होते.या पावसाळ्यातील सर्वाधिक पावसाची तिरोडा तालुक्यात नोंद झाली आहे.

टॅग्स :RainपाऊसDamधरण