शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शेकडो उमेदवार नामांकनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 21:33 IST

१६ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी लिंक फेल असल्याने जिल्ह्यातील हजारो उमेदवारांना नामांकन दाखल करता आले नाही.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : लिंक फेलचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : १६ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी लिंक फेल असल्याने जिल्ह्यातील हजारो उमेदवारांना नामांकन दाखल करता आले नाही. राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे. अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.निवडणूक आयोगाने यावर्षी आॅनलाईन पद्धतीने नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अवलंबली आहे. आदिवासी, नक्षलग्रस्त व ग्रामीण भागतील उमेदवारांची या प्रक्रियेमुळे चांगलीच दमछाक होताना दिसून आली. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी २२ ते २९ सप्टेंबरचा कालावधी निर्धारित करण्यात आला. सुरुवातीच्या काही दिवसांत तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे जात प्रमाणपत्र चालणार नाही, उपविभागीय अधिकाºयांच्या स्वाक्षरीचे हवे, शिवाय बारकोडेड जात प्रमाणपत्र पाहिजे असल्याच्या चर्चा परिसरात होत्या. त्यामुळे अनेकांनी सुरुवातीच्या काळात नामांकन दाखल केले नाही. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यातच बराच कालावधी निघून गेला. या संभ्रमामुळे अनेकांनी विना बारकोडेड जात प्रमाणपत्र सादर केले. नेमके ते कसे असायला पाहिजे, याविषयी मार्गदर्शनसुद्धा प्रशासनाकडून केले जात नव्हते.शेवटी उमेदवारांनी जे कागदपत्र उपलब्ध आहेत ते घेऊन शुक्रवारी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकच गर्दी केली. मात्र शुक्रवारी दुपारी १२ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत लिंक फेल होती. शिवाय भारनियमनाचाही फटका बसला. आॅफलाईन आवेदन पत्र स्वीकारण्यासंदर्भातही संभ्रम होता. तरी काही उमेदवारांनी आॅफलाईन अर्ज स्वीकारण्याची मागणी केली. लिंक फेल असल्याने नामांकन आॅनलाईन होत नव्हते. अशावेळी वेळ समाप्तीनंतरही साडे सहा वाजतापर्यंत नामांकन स्वीकारण्यात आले. दीड तासापर्यंत उशिरा नामांकन स्वीकारण्याचे आदेश होते काय, हा सुद्धा बचुकळ्यात टाकणारा प्रश्न आहे. लिंक फेल असल्याची संधी साधून अनेक संगणक चालक गायब होते, अशीही ओरड आहे. लिंक फेल असल्याने ज्या उमेदवारांचे नामांकन होऊ शकले नाही त्यांनी आॅफलाईन नामांकन स्वीकारण्याची अट तहसीलदारांना घातली. मात्र त्यांनी तक्रारकर्त्यांना निवडणूक अधिकाºयांकडे पाठविले. त्यांनी उमेदवारांना पुन्हा तहसीलदारांकडे पाठविले. या टोलवाटोलवीमुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. कार्यालय बंद झाल्यानंतरही रात्री ११ वाजेपर्यंत नामांकन दाखल करणारे उमेदवार वरांड्यात ठिय्या मांडून होते. अखेर त्यांचे नामांकन दाखल होऊ शकले नाही. निवडणूक आयोगाने जी वेळ नामांकनासाठी निर्धारित केली होती त्या कालावधीत तांत्रिक बिघाड येत असल्याने त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारुन नामांकनासाठी मुदतवाढ देण्याची मागणी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे. अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.