शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो उमेदवार नामांकनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 21:33 IST

१६ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी लिंक फेल असल्याने जिल्ह्यातील हजारो उमेदवारांना नामांकन दाखल करता आले नाही.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : लिंक फेलचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : १६ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी लिंक फेल असल्याने जिल्ह्यातील हजारो उमेदवारांना नामांकन दाखल करता आले नाही. राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे. अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.निवडणूक आयोगाने यावर्षी आॅनलाईन पद्धतीने नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अवलंबली आहे. आदिवासी, नक्षलग्रस्त व ग्रामीण भागतील उमेदवारांची या प्रक्रियेमुळे चांगलीच दमछाक होताना दिसून आली. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी २२ ते २९ सप्टेंबरचा कालावधी निर्धारित करण्यात आला. सुरुवातीच्या काही दिवसांत तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे जात प्रमाणपत्र चालणार नाही, उपविभागीय अधिकाºयांच्या स्वाक्षरीचे हवे, शिवाय बारकोडेड जात प्रमाणपत्र पाहिजे असल्याच्या चर्चा परिसरात होत्या. त्यामुळे अनेकांनी सुरुवातीच्या काळात नामांकन दाखल केले नाही. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यातच बराच कालावधी निघून गेला. या संभ्रमामुळे अनेकांनी विना बारकोडेड जात प्रमाणपत्र सादर केले. नेमके ते कसे असायला पाहिजे, याविषयी मार्गदर्शनसुद्धा प्रशासनाकडून केले जात नव्हते.शेवटी उमेदवारांनी जे कागदपत्र उपलब्ध आहेत ते घेऊन शुक्रवारी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकच गर्दी केली. मात्र शुक्रवारी दुपारी १२ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत लिंक फेल होती. शिवाय भारनियमनाचाही फटका बसला. आॅफलाईन आवेदन पत्र स्वीकारण्यासंदर्भातही संभ्रम होता. तरी काही उमेदवारांनी आॅफलाईन अर्ज स्वीकारण्याची मागणी केली. लिंक फेल असल्याने नामांकन आॅनलाईन होत नव्हते. अशावेळी वेळ समाप्तीनंतरही साडे सहा वाजतापर्यंत नामांकन स्वीकारण्यात आले. दीड तासापर्यंत उशिरा नामांकन स्वीकारण्याचे आदेश होते काय, हा सुद्धा बचुकळ्यात टाकणारा प्रश्न आहे. लिंक फेल असल्याची संधी साधून अनेक संगणक चालक गायब होते, अशीही ओरड आहे. लिंक फेल असल्याने ज्या उमेदवारांचे नामांकन होऊ शकले नाही त्यांनी आॅफलाईन नामांकन स्वीकारण्याची अट तहसीलदारांना घातली. मात्र त्यांनी तक्रारकर्त्यांना निवडणूक अधिकाºयांकडे पाठविले. त्यांनी उमेदवारांना पुन्हा तहसीलदारांकडे पाठविले. या टोलवाटोलवीमुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. कार्यालय बंद झाल्यानंतरही रात्री ११ वाजेपर्यंत नामांकन दाखल करणारे उमेदवार वरांड्यात ठिय्या मांडून होते. अखेर त्यांचे नामांकन दाखल होऊ शकले नाही. निवडणूक आयोगाने जी वेळ नामांकनासाठी निर्धारित केली होती त्या कालावधीत तांत्रिक बिघाड येत असल्याने त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारुन नामांकनासाठी मुदतवाढ देण्याची मागणी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे. अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.