शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
2
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
3
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
4
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
5
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
6
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
7
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
8
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी
9
स्टाइल मारणं महागात पडलं...! रीलसाठी तोंडात फोडले ६ फटाके, ७ वा सुतळी बॉम्ब फुटला अन् १८ वर्षांच्या तरुणाचा अख्खा जबडाच उडाला!
10
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
11
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!
12
स्वतः जेवण बनवले, मुक्कामी राहिले, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सातपुडा पर्वतरांगातील आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी
13
लय भारी! घरात तुळस लावल्याने काय होतं? आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितले जबरदस्त फायदे
14
सौदीसाठी भाड्याने लढणार २५ हजार पाकिस्तानी सैनिक; 'सीक्रेट डील'चा खुलासा, चीन, भारताचाही उल्लेख
15
Chhath Puja 2025: छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढांसह भाजपा नेते घेणार तयारीचा आढावा
16
दक्षिण आफ्रिकेच्या पाकिस्तानवरील विजयाने भारताला फायदा, WTCच्या गुणतक्त्यात मोठी उलथापालथ
17
VIDEO: लेहंगा घालून लंडनच्या रस्त्यावर निघाली भारतीय मुलगी, पुढे लोकांनी काय केलं पाहा
18
पत्नीचं नाव 'मोटी' म्हणून सेव्ह केलं, प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं अन् मग...!
19
बाल्कनीतून पाय घसरला, पती ग्रिलवर लटकला; वाचवण्यासाठी पत्नी धावली, पण नियतीने डाव साधला!
20
डोळे हे जुलमी गडे! सुंदर दिसण्याची हौस महागात, रोज लायनर, काजळ लावल्यास मोठं नुकसान

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ कसा घ्यावा? : अर्ज कुठे करावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:56 IST

अडीच हजारांची शिष्यवृत्ती : किमान ६० टक्के गुण आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे आर्थिक दुर्बल घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांसाठी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून विशेष प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.

विशेषतः मातंग समाजातील गुणवत्ताधारक, गरजू विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करावा. समाजातील हुशार, होतकरू विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असले तरी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ एकदाच मिळतो.

कागदपत्रे काय लागतात ?शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, मागील लगतच्या अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिका, पुढील वर्गात प्रवेशाबाबत पत्राच्या स्वयं साक्षांकित केलेल्या छायाप्रती जोडाव्यात, अर्जावर भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे क्रमप्राप्त आहे.

कोणाला किती?

  • दहावी : एक हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते.
  • बारावी: दीड हजार रुपये शिष्यवृत्तीची रक्कम आह
  • पदवी व पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
  • अभियांत्रिकी व वैद्यकीय: क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अडीच हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. 

प्राचार्यांचे हमीपत्रशासनाच्या अन्य शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. याबाबत संबंधित विद्यार्थी, प्राचार्यांचे एकत्रित हमीपत्र जोडणे आवश्यक आहे.

कोणाला लाभ घेता येतो?

  • महाविद्यालये-विद्यापीठ शैक्षणिक विभागातील अव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी
  • विद्यार्थ्यांच्या पालकांचे (कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित) वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थी भारतीय नागरिक असावा, त्यासाठी नागरिकत्वाचा साक्षांकित दाखला जोडणे आवश्यक आहे.

जिल्हानिहाय निवडशिष्यवृत्तीसाठी कमीत कमी ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय निवड केली जाते. उपलब्ध निधीच्या मर्यादेत शिष्यवृत्ती एकदाच दिली जाते.

अर्ज कोठे करायचा?अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ येथे करावा.

टॅग्स :gondiya-acगोंदियाgovernment schemeसरकारी योजना