शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
3
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
4
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
5
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
6
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
7
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
8
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
9
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
10
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
11
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
13
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
14
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
15
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
16
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
17
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
18
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
19
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
20
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
Daily Top 2Weekly Top 5

गृहिणींसमोर घर खर्चाचा प्रश्न, महागाईने कोलमडले सर्वांचेच बजेट

By admin | Updated: August 12, 2014 23:50 IST

सतत वाढत असलेल्या महागाईमुळे सर्व सामान्यांचे अंदाजपत्रक बिघडले आहे. शेतकरी, शेतमजूर, अल्प भूधारक व विविध क्षेत्रातील कामगार कुटुंबांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.

रावणवाडी : सतत वाढत असलेल्या महागाईमुळे सर्व सामान्यांचे अंदाजपत्रक बिघडले आहे. शेतकरी, शेतमजूर, अल्प भूधारक व विविध क्षेत्रातील कामगार कुटुंबांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.केंद्र सरकारने डिझेल आणि पेट्रोल वरील नियंत्रण सैल केले आहे. त्यामुळे वर्षभरापासून पेट्रोल डिझेलचे दर वाढतच आहेत. या दरवाढीचा सर्वच बाबींवर परिणाम होऊन महागाई सतत वाढत चालली आहे. दैनंदिन उपयोगात येणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे दर ही वाढतच आहेत. सोबतच बांधकाम साहित्याचे भाव ही गगणाला भिडले आहेत. त्याप्रमाणे विविध क्षेत्रात काम करण्याऱ्या कामगारांच्या मजूरीत वाढ होताना दिसत नाही. सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेटच बिघडून टाकले आहे. मानवी जीवनात जीवनावश्यक असलेल्या वस्तंूचे दर दिवशी दर वाढतच आहेत. त्याचा सर्वाधीक परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे.दिवसें-दिवस वाढत्या महागाईने सर्व सामान्य गृहिणींचे स्वयंपाक घरातील आर्थिक बजेट कोलमडले आहे. अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबाचे या महागाईने जगणेच कठीण झाले आहे. कष्टकरी शेतकरी शेतमजूरांची कांदा-भाकरीही या महागाईने जेवणात वापरणे कठीण झाले आहे. सध्या कांद्याचे भाव ३० ते ३५ रुपये किलो असल्याने यावेळी कांदाही डोळ्यात अश्रू आणत आहे. दैनंदिन बहू उपयोगासाठी वापरण्यात येणारे भाजीपाल्याचे भावही गगणाला भिडले आहे. सध्या भाजी बाजारात ६० ते ८० रुपये प्रती किलो दरात भाजीपाला विक्री केला जात आहे.त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना भाजीपाला खरेदी करणे ही अशक्य झाले आहे. वाढत्या महागाईने दैनंदिन गरजा कशा भागवायच्या व संसाराचा गाडा कसा चालवावा असे विविध प्रश्न नागरिकांपुढे उपस्थित होत आहे. शासनाने यावर उपाय योजना करावी असे सर्व सामान्य नागरिकांचे बोलने आहे.