शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

उष्ण लहरींनी जिल्ह्याला झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 20:52 IST

दोन दिवसांपूर्वी पावसाच्या सरी व गारपिटीने गारवा निर्माण करणारे वातावरण आता चटकन बदलले असून उष्ण लहरींना आता जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. उन्हाळ्याचा हा खरा चटका जिल्हावासीयांना मंगळवारी (दि.२३) अनुभवता आला.

ठळक मुद्देतीन दिवस तीव्र लाट : हवामान खात्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दोन दिवसांपूर्वी पावसाच्या सरी व गारपिटीने गारवा निर्माण करणारे वातावरण आता चटकन बदलले असून उष्ण लहरींना आता जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. उन्हाळ्याचा हा खरा चटका जिल्हावासीयांना मंगळवारी (दि.२३) अनुभवता आला. हवामान खात्याने २३ ते २६ तारखेपर्यंत उष्णतेच्या तिव्र लाटेचे संकेत दिले असून मंगळवारी त्यांचा अंदाज खरा ठरत असल्याचे दिसून आले.अरबी सागर ते बंगालच्या खाडीपर्यंत गत १० दिवसांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वातावरण निर्माण होवून पावसाच्या सरी कोसळल्या. आता दाब कमी होवून वाऱ्याची गती संथ झाली आहे. त्यामुळे वातावरणात प्रतिकूल अशा प्रमाणात दाब निर्माण होवून तापमान वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. अशात विदर्भातील सहा जिल्ह्यात तापमानात वाढ होवून २३ ते २६ तारखेदरम्यान उष्ण लहरी प्रवाहीत होणार असा अंदाज आहे.हवामान खात्याने वर्तविलेल्या हा अंदाज मंगळवारपासून (दि.२३) असून त्यांचा अंदाज खरा ठरत असल्याची अनुभुती दिसून आली. मंगळवारी सकाळपासूनच रखरखत्या उन्हामुळे वातावरण चांगलेले दिसले.मागील चार-पाच दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे तापमान ३७ ते ३८ डिग्रीच्या घरात तापमान मंगळवारी वाढून ४० च्या घरात गेले होते. शिवाय उष्ण लहरींमुळे उकाडा वाढून अंगाची लाहीलाही होवू लागली होती. मंगळवारपासून सुरू झालेल्या उष्ण लहरींनी पहिल्याच दिवशी रंग दाखविल्याने आणखी दोन दिवसांना घेऊन त्याचा सर्वांना धसकाच बसला आहे.आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनउष्ण लहरींमुळे घराच्या आत बसून अंग भाजत असल्याचे वाटत असतानाच या तीन दिवसांत आरोग्याची काळजी घेण्याचे वाहन हवामान व आरोग्य खात्याने केले आहे. या तीन दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळणे हा सर्वात रामबाण उपाय आहे. याशिवाय, आरोग्य विभागाकडून उन्हापासून बचावासाठी देण्यात आलेल्या टिप्सचे पालन करणे आता गरजेचे झाले आहे.

टॅग्स :weatherहवामान