शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
2
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
3
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
4
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
5
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: 'एक्झिट पोल' थोड्याच वेळात; आकडे समोर येणार, देशाचा कल कळणार
6
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
7
"पाकव्याप्त काश्मीर आपलं नाही, ती परकीय भूमी"; पाकिस्तानची मोठी कबुली
8
पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
9
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
10
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
11
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
12
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
13
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
14
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
15
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
16
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
17
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
18
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
19
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
20
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय

आठ एकरात बागायती शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:18 AM

तालुक्यातील ग्राम हिरापूर येथील उच्च शिक्षित शेतकरी सुरेंद्र (बबलु) बिसेन यांनी नोकरी सोडून सन २००० पासून पारंपरिक भात शेतीला सुरु वात करु न धान मळणी यंत्र व १ ट्रॅक्टर विकत घेतला.

ठळक मुद्देहिरापूर येथील प्रयोग : कृृषी विभागाची बागायती शेतीकडे उदासीनता

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील ग्राम हिरापूर येथील उच्च शिक्षित शेतकरी सुरेंद्र (बबलु) बिसेन यांनी नोकरी सोडून सन २००० पासून पारंपरिक भात शेतीला सुरु वात करु न धान मळणी यंत्र व १ ट्रॅक्टर विकत घेतला. त्यासाठी त्यांनी बँकेतुन २५ लाखाचे कर्ज घेतले. हा तालुक्यातील पहीला यांत्रिक शेतीचा प्रयोग होता.सन २००७ मध्ये ७ एकर शेतीत ऊसाची लागवड केली. या पिकापासुन धानापेक्षा जास्त उत्पन्न मिळविले. तर सन २०१५ पासुन ऊसाच्या शेतीसोबतच आता ८ एकरात बागायती शेती करण्यासाठी कृषी विभागाकडे धाव घेतली आहे. मनात जिद्द असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील बागायतदार शेतकऱ्यांची भेट घेवून त्यांनी माहीती मिळविली. बागायती शेती ही शेंद्रीय शेती असावी यासाठी त्यांनी ६ दुधारी गायी विकत घेतल्या, शेतात १ विहीर व १ बोअरवेल तयार करु न ड्रीप पद्धतीने गोमुत्र व पाणी देण्याला सुरु वात करीत शेणखताचा प्रयोग सुरु केला. ४ एकरात डाळींब व ४ एक रात मोसंबी, दाळ निंबूची लागवड केली.कृषी विभागाने बागायती शेती विषयी मार्गदर्शन करावे यासाठी तालुका कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे बिसेन यांनी धाव घेतली. परंतु याकडे कृषी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.जिल्हात हिरापुर या गावी बागायतदार शेतकरी आहे अशी माहीती जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे यांना मिळताच त्यांनी दोन वेळा या बागायती शेतीला भेट देवून झाडे कशी लावावी त्याचे अंतर किती असावे तसेच या सुटलेल्या जागेत आंतरपीक घ्यावे अशी माहिती दिली होती.बागायती शेतीला वाव देण्याची गरजकृषी विभाग तंत्रज्ञान, शासकीय अनुदानाची माहीती देत नाही. तसेच अतीवृष्टी व वादळीवारा यापासुन बागायती शेतीला नुकसान झाले तर कृषी सेवक, तलाठी व ग्रामसेवक यांना नुकसानीच्या माहीती अभावी पंचनामा करता येत नाही. धानाला हमीभाव देण्यात येतो पण बागायती शेती पिकांना हमी भाव नाही. शासनाने बागायती शेंद्रीय शेतीसाठी बाजारपेठ सुरु करावी, शितगृह बांधावे हे उपलब्ध नसल्याने भाव मिळत नाही मोसंबी व अनार हे पीक नागपुरला विकण्यास न्यावे लागत आहे. हा खर्च परवडणारा नसल्याने उत्पन्नात घट होत आहे. याकरीता राष्ट्रीय बागवानी बोर्ड नागपुर, जिल्हा कृषी अधिकारी व बँकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. शेतकरी पारंपारीक भात शेती करतो, त्यामुळे आर्थिक अडचनीत असतो व बँकेची कर्ज परतफेड करु शकत नाही. त्यामुळे बँका बागायतदार शेतकरी यांना कर्ज देत नाही. आर्थिक मदतीशिवाय शेतकरी शेती करु शकत नाही. जिल्हात बागायती शेतीला वाव देणे गरजेचे आहे असे बिसेन यांनी सांगीतले.

टॅग्स :agricultureशेती