शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

पालकमंत्र्याच्या गृहक्षेत्रात घरकुलांचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 9:36 PM

केंद्र व राज्य शासनाच्यावतीने ग्रामीण भागातील नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून घरकुलांचे बांधकाम केले जाते.

ठळक मुद्दे५७० घरकुलांना प्रशासकीय मान्यता : नऊ वर्षापासून काम अपूर्णच

ऑनलाईन लोकमतगोंदिया : केंद्र व राज्य शासनाच्यावतीने ग्रामीण भागातील नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून घरकुलांचे बांधकाम केले जाते. यंदा गोंदिया जिल्ह्यात एक लाख कुटुंबांना घरकुल मंजूर करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु सडक-अर्जुनी तालुक्यात एकाही कुटुंबाने घरकूल बांधकामास सुरूवात केली नाही. त्यामुळे पालकमंत्री राजकुमार बडोले यांचा गृह तालुका असलेल्या भागातच घरकूल योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.पंचायत समिती सडक-अर्जुनी येथे विविध योजनांच्या माध्यमातून घरकुलांचे बांधकाम मंजूर झाले आहेत. परंतु इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून सन २०१३-१४ पासून सन २०१५-१६ पर्यंत ३३७ घरकुलांचे काम अपूर्ण दाखविण्यात आले आहे. रमाई आवास योजनेच्या माध्यमातून सन २०१२ -१३ ते २०१३-१४ पर्यंत रमाई आवास योजनेंतर्गत ७३३ घरकुलांच्या बांधकामांना मंजुरी देण्यात आली होती. यातील ३५ घरकुलांचे बांधकाम अपूर्ण दाखविण्यात आले आहेत. राजीव गांधी ग्रामीण निवास क्र. १ अंतर्गत सन २०१२-१३ ला ३०१ घरकुल मंजूर करण्यात आले होते. यातील १३ कामे अपूर्ण दाखविली आहेत.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये ५९९ कामे मंजूर करण्यात आली होती. यामधील ३२१ कामे अपूर्ण दाखविण्यात आली आहेत. रमाई योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये १०४ कामे मंजूर झाली. यातील ५५ कामे अपूर्ण आहेत. शबरी योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये ४८ घरकुल मंजूर झाले. त्यातील ४१ कामे अपूर्ण आहेत. सन २०१७-१८ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ७५७ कामांना मंजुरी देण्यात आली. पण प्रशासकीय मान्यता फक्त ५७० कामांना देण्यात आली. परंतु एकाही घरकुलाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही. सन २०१२-१३ व २०१३-१४ पासून सन २०१६-१७ पर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून तीन हजार ४०० घरकुलांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यातील ८०० घरकुलांची कामे अजूनही अपूर्ण आहेत.या घरकुलांच्या देयकाबाबत लाभार्थी सुद्धा वारंवार विचारणा करीत असतात. यावरुन ज्यांच्या घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेत. त्यांना सुद्धा घरकुलांचे देयक देण्यात आली की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे.कामात मोठा घोळ?सडक-अर्जुनी तालुक्यात घरकुल योजनेत मोठा घोळ झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील पाच वर्षापासून घरकुलाचे बांधकाम प्रलंबितच दाखविले जात असल्याने त्या लाभार्थ्यांचे पैसे गहाळ तर झाले नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील शिक्षकांचे कोट्यवधी रूपये लिपीक व शिक्षण विभागाच्या माध्यमातून हडपण्यात आले. तसाच प्रकार घरकुलासंदर्भात तर झाला नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे. यासंबंधीची तक्रार सुद्धा मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.