शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
4
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
5
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
6
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
7
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
8
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
9
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
10
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
11
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
12
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
13
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
14
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
15
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
16
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
17
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
18
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
19
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
20
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

३१ मे रोजी सर्वाधिक तापमानाची नोंद

By admin | Updated: June 4, 2014 23:50 IST

विदर्भात उष्णतेच्या लाटेने जनजीवन प्रभावीत झाले असताना यावर्षी गोंदियात सुद्धा पारा जास्तच वर चढत आहे. यावर्षी शनिवारी ३१ मे रोजी तापमान तब्बल ४५.१ अंश सेल्सिअस असल्याची नोंद सरकारी यंत्रणेने घेतली.

गोंदिया : विदर्भात उष्णतेच्या लाटेने जनजीवन प्रभावीत झाले असताना यावर्षी गोंदियात सुद्धा पारा जास्तच वर चढत आहे. यावर्षी शनिवारी ३१ मे रोजी  तापमान तब्बल ४५.१ अंश सेल्सिअस असल्याची नोंद सरकारी यंत्रणेने घेतली. या तापमानामुळे घराबाहेर पडणे कठीण झाल्याने शहरासह ग्रामीण भागात अघोषित संचारबंदी असल्यासारखे चित्र निर्माण होत आहे.उन्हाळ्य़ाच्या सुरूवातीला पाऊस व गारपीटीने काही दिवस गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे उन्हाळ्य़ाच्या खर्‍या चटक्यांची चव लागायची होती. त्यानंतर मात्र एप्रिलच्या सुरूवातीच्या पंधरवड्यानंतर उन्हाळा आपल्या रंगात आला. तर मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली. यावर्षीचे सर्वाधिक तापमान ४५.१ अं.से. पेक्षा जास्त नोंदविण्यात आले. यामुळे उष्णतेच्या लाटेने जनजीवनावर तीव्र परिणाम झाला. दुपारी १२ वाजतानंतर घराबाहेर पडणे नागरिकांनी बंद केले आहे. शहरातील रस्ते व बाजारपेठ १२ ते ५ या वेळेत सामसूम असते. एकंदरीत शहरात अघोषित संचारबंदी असते. गेल्या आठ दिवसांपासून सतत गोंदियाचे तापमान ४३ अंशांपेक्षा जास्त राहत असल्यामुळे दुपारी १२ वाजतानंतर कोणीच घराबाहेर पडताना दिसत नाही.उष्णतेचा हा कहर सुरू असतानाच नवतपा चांगलाच तापला. नवतपाच ३१ मे रोजी सर्वाधीक ४५.१ अं.से.तापमानाची नोंद घेण्यात आली. उष्णतेच्या या लाटेने गोंदिया चांगलाच तापत असून अशात कुलर सुद्धा काम करीत नसल्याचे नागरिक बोलू लागले आहेत. उष्णतेचा कोप सुरू असतानाच त्यात वेळी अवेळी होत असलेले भारनियमन जखमेवर मिठाचे काम करीत आहे. उकाड्याने अंगाची लाही-लाही होत असल्याने नागरिक बाहेर निघणे टाळत आहेत. तर भारनियमनामुळे घरात जीव गुदमरू लागला असून नागरिकांसाठी इकडे-आड व तिडके विहीर अशी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.  सुर्याच्या कोपामुळे कार्यालयीन कर्मचारी व  व्यावसायिक सुद्धा दुपारच्या वेळी घरी जाण्याचे टाळत आहेत. मजुरांना बाहेर पडणे अनिवार्य असल्याने तीव्र उष्णतेपासून बचाव करण्यासाठी स्कार्फ व उष्णतारोधक कापडांचा वापर करीत आहेत. वाढत्या उकाड्यात गारवा मिळण्यासाठी शहरातील विविध चौकात व सार्वजनिक ठिकाणी शीतपेयाची दुकाने लागली आहेत. तर कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांना गळा कोरडा पडल्यास पोणपोई सोयीची ठरत आहे.  शेतकरी बांधव सुद्धा उन्हाच्या चटक्यांपासून बचाव करण्यासाठी पहाटेलाच उठून शेतातील कामे ११ वाजतापूर्वी पूर्ण करीत आहेत. वाढत्या तापमानाचा फटका व्यावसायिकांना देखील बसला आहे. दुपारनंतर बाजारपेठ ग्राहकाविना ओस पडलेली असते. वाढत्या उन्हामुळे ग्रामीण व शहरी भागातील रस्ते पूर्णत सामसूम दिसत आहेत. (शहर प्रतिनिधी)