शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख ५ हजार शेतकऱ्यांना मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 22:08 IST

सन २०१७ च्या खरीप हंगामाच्या धान पिकावर कीडीच्या प्रादूर्भावामुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधीत गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मदतीपोटी ४१५०.६८ लक्ष रुपये शासनाने मंजूर केले आहे.

ठळक मुद्देकिडीचा प्रादुर्भाव : ४१ कोटी ५० लाख ६५ हजार ९५ रुपयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : सन २०१७ च्या खरीप हंगामाच्या धान पिकावर कीडीच्या प्रादूर्भावामुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधीत गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मदतीपोटी ४१५०.६८ लक्ष रुपये शासनाने मंजूर केले आहे.कीडीच्या प्रादुर्भावाने गोंदिया जिल्ह्यातील ३४ हजार १७१ हेक्टर धान पिकांचे नुकसान झाले होते. यात बाधीत शेतकऱ्यांची जिल्ह्यातील संख्या १ लाख ५ हजार ६८८ होती.या कीडीच्या प्रादुर्भावाने बाधीत शेतकऱ्यांचे ४१ कोटी ५० लाख ६५ हजार ९५ रुपयांचे नुकसान झाल्याचे शासनाला पाठविलेल्या जिल्हा कृषी विभागाने प्रस्तावात म्हटले होते.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४४५१ शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे. या बाबतचा शासन आदेश ८ मे रोजी निघाला आहे. मदतीची रक्कम बाधीत शेतकऱ्यांचा बँक खात्यात (आधार संलग्न) थेट हस्तांतर पध्दतीने जमा केली जाणार आहे.२०१७ खरीप हंगामातील धान पिकांवर तुळतुळ्या सारख्या कीडीचा प्रादुर्भाव झाला होता. यात धान पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. याला कंटाळून देवलगाव येथील दोन शेतकऱ्यांनी शेतातील उभे धानपिक जाळून टाकले होते.गोंदिया जिल्ह्यात इतरत्रही अशा घटना घडल्या होत्या. कीडीच्या प्रादुर्भावाने अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४ हजार ४५१ शेतकºयांचे ८६३ हेक्टर क्षेत्र बाधीत झाले होते. कृषी विभाग व महसूल विभागाने संयुक्तरित्या विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून पंचनामे केले होते.गोंदिया जिल्ह्यातील १ लाख ५ हजार ६८८ शेतकऱ्यांचे ३४ हजार १७१ हेक्टर धान पिकांचे नुकसान झाले होते. या कीडीच्या प्रादुर्भावाने बाधीत शेतकऱ्यांचे ४१ कोटी ५० लाख ६५ हजार ९५ रुपयांचे नुकसान झाल्याचे शासनाला पाठविलेल्या जिल्हा कृषी विभागाने प्रस्तावातून कळविले आहे. तुळतुळ्यासारखे कीडीच्या प्रादुर्भावाने धानपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने ४१ कोटी ५० लाख ६८ हजार रुपयाची मदत मंजूर केला आहे.या संबधीत निघालेल्या ८ मे च्या आदेशात धान पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. मदतीच्या रक्कमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसूली करू नये असे नमूद केले आहे.संबंधीत जिल्ह्यांना ही मदतीची रक्कम तीन हप्त्यात देण्यात येणार आहे. शेतकºयांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम एकाचवेळी जमा करण्याचे निर्देश शासनाने जिल्हा कृषी विभागाला दिले आहे. त्यामुळे कृषी विभाग किती तत्परतेने ही रक्कम जमा करते याकडे लक्ष लागले आहे.शेतकरी वंचित राहू नयेबाधीत शेतकऱ्यांना द्यावयाची मदतीची रक्कम संबंधीत शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतर पद्धतीने जमा करण्यात यावी. परंतु एखाद्या शेतकऱ्यांकडे आधार क्रमांक नसेल तर त्यासाठी अशा शेतकऱ्यांच्या अन्य पर्यायी व व्यवहार्य पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र, वाहन परवाना, पॅनकार्ड, बँकेची खाते पुस्तक, पारपत्र या पुराव्याची पडताळणी करावी. शेतकरी ओळखपत्राच्या पुराव्याअभावी या मदतीपासून वंचीत राहता कामा नये, असेही शासनाच्या आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी