शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

१ लाख ५ हजार शेतकऱ्यांना मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 22:08 IST

सन २०१७ च्या खरीप हंगामाच्या धान पिकावर कीडीच्या प्रादूर्भावामुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधीत गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मदतीपोटी ४१५०.६८ लक्ष रुपये शासनाने मंजूर केले आहे.

ठळक मुद्देकिडीचा प्रादुर्भाव : ४१ कोटी ५० लाख ६५ हजार ९५ रुपयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : सन २०१७ च्या खरीप हंगामाच्या धान पिकावर कीडीच्या प्रादूर्भावामुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधीत गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मदतीपोटी ४१५०.६८ लक्ष रुपये शासनाने मंजूर केले आहे.कीडीच्या प्रादुर्भावाने गोंदिया जिल्ह्यातील ३४ हजार १७१ हेक्टर धान पिकांचे नुकसान झाले होते. यात बाधीत शेतकऱ्यांची जिल्ह्यातील संख्या १ लाख ५ हजार ६८८ होती.या कीडीच्या प्रादुर्भावाने बाधीत शेतकऱ्यांचे ४१ कोटी ५० लाख ६५ हजार ९५ रुपयांचे नुकसान झाल्याचे शासनाला पाठविलेल्या जिल्हा कृषी विभागाने प्रस्तावात म्हटले होते.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४४५१ शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे. या बाबतचा शासन आदेश ८ मे रोजी निघाला आहे. मदतीची रक्कम बाधीत शेतकऱ्यांचा बँक खात्यात (आधार संलग्न) थेट हस्तांतर पध्दतीने जमा केली जाणार आहे.२०१७ खरीप हंगामातील धान पिकांवर तुळतुळ्या सारख्या कीडीचा प्रादुर्भाव झाला होता. यात धान पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. याला कंटाळून देवलगाव येथील दोन शेतकऱ्यांनी शेतातील उभे धानपिक जाळून टाकले होते.गोंदिया जिल्ह्यात इतरत्रही अशा घटना घडल्या होत्या. कीडीच्या प्रादुर्भावाने अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४ हजार ४५१ शेतकºयांचे ८६३ हेक्टर क्षेत्र बाधीत झाले होते. कृषी विभाग व महसूल विभागाने संयुक्तरित्या विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून पंचनामे केले होते.गोंदिया जिल्ह्यातील १ लाख ५ हजार ६८८ शेतकऱ्यांचे ३४ हजार १७१ हेक्टर धान पिकांचे नुकसान झाले होते. या कीडीच्या प्रादुर्भावाने बाधीत शेतकऱ्यांचे ४१ कोटी ५० लाख ६५ हजार ९५ रुपयांचे नुकसान झाल्याचे शासनाला पाठविलेल्या जिल्हा कृषी विभागाने प्रस्तावातून कळविले आहे. तुळतुळ्यासारखे कीडीच्या प्रादुर्भावाने धानपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने ४१ कोटी ५० लाख ६८ हजार रुपयाची मदत मंजूर केला आहे.या संबधीत निघालेल्या ८ मे च्या आदेशात धान पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. मदतीच्या रक्कमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसूली करू नये असे नमूद केले आहे.संबंधीत जिल्ह्यांना ही मदतीची रक्कम तीन हप्त्यात देण्यात येणार आहे. शेतकºयांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम एकाचवेळी जमा करण्याचे निर्देश शासनाने जिल्हा कृषी विभागाला दिले आहे. त्यामुळे कृषी विभाग किती तत्परतेने ही रक्कम जमा करते याकडे लक्ष लागले आहे.शेतकरी वंचित राहू नयेबाधीत शेतकऱ्यांना द्यावयाची मदतीची रक्कम संबंधीत शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतर पद्धतीने जमा करण्यात यावी. परंतु एखाद्या शेतकऱ्यांकडे आधार क्रमांक नसेल तर त्यासाठी अशा शेतकऱ्यांच्या अन्य पर्यायी व व्यवहार्य पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र, वाहन परवाना, पॅनकार्ड, बँकेची खाते पुस्तक, पारपत्र या पुराव्याची पडताळणी करावी. शेतकरी ओळखपत्राच्या पुराव्याअभावी या मदतीपासून वंचीत राहता कामा नये, असेही शासनाच्या आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी