शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

पडीक जमिनीच्या शेतकºयांना मदतीचा हात द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 21:47 IST

तालुक्यातील ८० टक्के जनता शेतीच्या भरवशावर जीवन जगत आहे. यंदा जिल्ह्यात सर्वत्र अल्प प्रमाणात पाऊस झाला.

ठळक मुद्देशेतकºयांची मागणी : अधिकारी-कर्मचाºयांची नियोजनशून्यता

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : तालुक्यातील ८० टक्के जनता शेतीच्या भरवशावर जीवन जगत आहे. यंदा जिल्ह्यात सर्वत्र अल्प प्रमाणात पाऊस झाला. पावसाच्या अवकृपेमुळे सडक-अर्जुनी तालुक्यातील बºयाच शेतकºयांची जमीन पडीक राहिली. या पडीक शेतजमीन असलेल्या शेतकºयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ५५ हजार ४६१ हेक्टर आर आहे. तर पिकाखालील क्षेत्र २५ हजार ७८७ हेक्टर आर आहे. त्यात रब्बी पिकाखाली पाच हजार सातशे नऊ हेक्टर आर क्षेत्र आहे. तालुक्यातील बाम्हणी, खडकी, मनेरी, कनेरी,घोटी, म्हसवानी, सडक-अर्जुनी, केसलवाडा, वडेगाव, रेंगेपार, डोंगरगाव, खजरी, डव्वा, म्हसवानी, पांढरी, मालीजुंगा, खाडीपार, गोंगले, गिरोला, हेटी, सौंदड, राका, खडकी, जांभळी, पाटेकुर्रा आदी गावांजवळून वाहणाºया नदीवरील साधे बंधारे, कोल्हापुरी बंधारे यांना पाट्या किंवा माती अडवून पाणी थांबविले असते तर शेतकºयांना काही प्रमाणात पिके वाचविणे शक्य झाले असते. पण बांधकाम विभागाच्या अधिकाºयांचे व कर्मचाºयांच्या नियोजनशून्यतेमुळे धानाची शेती वाचविता आली नाही.यावर्षी पाऊस अत्यल्प पडल्यामुळे तालुक्यातील बंधाºयांचे पाणी अडविण्याची गरज होती. पण कोणत्याही अधिकाºयांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे नदीला सरळ पाणी वाहून निघून गेले. ते पाणी अडले असते तर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली नसती. दरवर्षी मार्च महिन्यातच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीे.तालुक्यातील ज्या शेतकºयांचे जमीन पडीक राहिली त्या शेतकºयांना हरभरा, गहू, वाटाणा, ज्वारी, सूर्यफुल आदींच्या बियाणांचे मोफत वाटप करणे गरजेचे होते. पण शासनाचे तसे कुठलेही आदेश तहसील कार्यालय किंवा कृषी विभाग यांना दिले नसल्याची माहिती आहे. ज्या शेतकºयांची शेती पडीक राहिली, त्या शेतकºयांकरिता मदतीचा हात शासनाने देणे आवश्यक आहे. पण कसलेही आदेश नसल्यामुळे शेतकºयांची मुले शहराच्या दिशेने रोजगाराच्या शोधात पलायन करीत असल्याचे चित्र आहे.यावर्षी रबी पीक होणार काय ?पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे रबी पिके होतील की नाही हे सांगता येत नाही. रब्बी पिके घ्यायचे किंवा नाही अशी सूचना न आल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.