शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

बोथली येथे भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 22:24 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील बोथली येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून गावकऱ्यांना पाण्यासाठी १ कि.मी.अंतरापर्यंत पायपीट करावी लागत आहे. गावापासून काही अंतरावर असलेल्या खजरी येथील शेतातील विहिरीचे पाणी आणून गावकऱ्यांना आपली तहान भागवावी लागत आहे. तर पाणी टंचाईवर उपाय योजना करण्यात स्थानिक प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

ठळक मुद्देशेतातील विहिरींचा आधार : नळ योजनेचे पाणी मिळत नसल्याने संकट

लोकमत न्यूज नेटवर्कखजरी : सडक अर्जुनी तालुक्यातील बोथली येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून गावकऱ्यांना पाण्यासाठी १ कि.मी.अंतरापर्यंत पायपीट करावी लागत आहे. गावापासून काही अंतरावर असलेल्या खजरी येथील शेतातील विहिरीचे पाणी आणून गावकऱ्यांना आपली तहान भागवावी लागत आहे. तर पाणी टंचाईवर उपाय योजना करण्यात स्थानिक प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे.बोथली येथे धसांराम भोयर यांच्या घराजवळ विहीर असून त्यांच्या विहिरीत मारलेल्या बोअरच्या सहाय्याने पाणी काढून पाणी टॉकी भरुन पाणी वाटप केले जात आहे. मात्र मागील आठवडाभरापासून पाणी टंचाईच्या समस्येत पुन्हा वाढ झाली आहे. या गावात ९ बोअरवेल असून त्या सुध्दा कोरड्या पडल्या आहेत. एक सौर उर्जा प्रकल्प असून त्याव्दारे वॉर्डात पाणी वाटप केले जाते. टुनेश्वर मेश्राम यांच्या घराजवळील सौर उर्जा प्रकल्प बंद पडला आहे. गावात बेनीराम ठाकरे, ठाणेश्वर ठाकरे, केशोराव चव्हाण, कुंवरलाल मांदाळे यांच्या बोर गावात ३०० फुटापेक्षा जास्त खोदल्या आहेत. व त्या बोअरवेलमधून पाणी काढून उन्हाळी धानपिक काढल्या जात आहे. त्यामुळे परिसरातील सार्वजनिक विंधन विहिरी बंद कोरड्या पडल्या आहेत. गावात निर्माण झालेली पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता शेतीसाठी पाण्याचा उपसा न करण्याच्या सूचना शेतकºयांना देण्यात आल्या आहे. गावातील सार्वजनिक विहिरींनी सुध्दा तळ गाठला आहे तर नळ योजनेव्दारा सुध्दा दिवसातून केवळ एकच वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे गावातील महिलांना पाण्यासाठी पहाटेपासून भटकंती करावी लागत आहे.बोथली येथे मागील वर्षी सुद्धा पाण्याची समस्या होती. त्यात यावर्षी पुन्हा वाढ झाली आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एक खासगी बोअरवेल अधिग्रहीत करण्यात आली आहे. टंचाईच्या समस्येवर उपाय योजना करण्यासाठी तहसील कार्यालयाकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगितले होते. मात्र निधी दिला नाही त्यामुळे ग्रामपंचायतच्या १४ व्या वित्त आयोगाचा निधी द्यावा लागला.- नरेश चव्हाण सरपंच, बोथली.गावातील पाण्याची समस्या दूर करण्याकरिता शासन दरबारी पत्र व्यवहार केला. समस्या दूर केल्या जातील अशी वरिष्ठ अधिकाºयाकडून अपेक्षा.- गिरीष भेलावे, ग्रामसेवक, बोथली

टॅग्स :water shortageपाणीटंचाई