शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

बोथली येथे भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 22:24 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील बोथली येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून गावकऱ्यांना पाण्यासाठी १ कि.मी.अंतरापर्यंत पायपीट करावी लागत आहे. गावापासून काही अंतरावर असलेल्या खजरी येथील शेतातील विहिरीचे पाणी आणून गावकऱ्यांना आपली तहान भागवावी लागत आहे. तर पाणी टंचाईवर उपाय योजना करण्यात स्थानिक प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

ठळक मुद्देशेतातील विहिरींचा आधार : नळ योजनेचे पाणी मिळत नसल्याने संकट

लोकमत न्यूज नेटवर्कखजरी : सडक अर्जुनी तालुक्यातील बोथली येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून गावकऱ्यांना पाण्यासाठी १ कि.मी.अंतरापर्यंत पायपीट करावी लागत आहे. गावापासून काही अंतरावर असलेल्या खजरी येथील शेतातील विहिरीचे पाणी आणून गावकऱ्यांना आपली तहान भागवावी लागत आहे. तर पाणी टंचाईवर उपाय योजना करण्यात स्थानिक प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे.बोथली येथे धसांराम भोयर यांच्या घराजवळ विहीर असून त्यांच्या विहिरीत मारलेल्या बोअरच्या सहाय्याने पाणी काढून पाणी टॉकी भरुन पाणी वाटप केले जात आहे. मात्र मागील आठवडाभरापासून पाणी टंचाईच्या समस्येत पुन्हा वाढ झाली आहे. या गावात ९ बोअरवेल असून त्या सुध्दा कोरड्या पडल्या आहेत. एक सौर उर्जा प्रकल्प असून त्याव्दारे वॉर्डात पाणी वाटप केले जाते. टुनेश्वर मेश्राम यांच्या घराजवळील सौर उर्जा प्रकल्प बंद पडला आहे. गावात बेनीराम ठाकरे, ठाणेश्वर ठाकरे, केशोराव चव्हाण, कुंवरलाल मांदाळे यांच्या बोर गावात ३०० फुटापेक्षा जास्त खोदल्या आहेत. व त्या बोअरवेलमधून पाणी काढून उन्हाळी धानपिक काढल्या जात आहे. त्यामुळे परिसरातील सार्वजनिक विंधन विहिरी बंद कोरड्या पडल्या आहेत. गावात निर्माण झालेली पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता शेतीसाठी पाण्याचा उपसा न करण्याच्या सूचना शेतकºयांना देण्यात आल्या आहे. गावातील सार्वजनिक विहिरींनी सुध्दा तळ गाठला आहे तर नळ योजनेव्दारा सुध्दा दिवसातून केवळ एकच वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे गावातील महिलांना पाण्यासाठी पहाटेपासून भटकंती करावी लागत आहे.बोथली येथे मागील वर्षी सुद्धा पाण्याची समस्या होती. त्यात यावर्षी पुन्हा वाढ झाली आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एक खासगी बोअरवेल अधिग्रहीत करण्यात आली आहे. टंचाईच्या समस्येवर उपाय योजना करण्यासाठी तहसील कार्यालयाकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगितले होते. मात्र निधी दिला नाही त्यामुळे ग्रामपंचायतच्या १४ व्या वित्त आयोगाचा निधी द्यावा लागला.- नरेश चव्हाण सरपंच, बोथली.गावातील पाण्याची समस्या दूर करण्याकरिता शासन दरबारी पत्र व्यवहार केला. समस्या दूर केल्या जातील अशी वरिष्ठ अधिकाºयाकडून अपेक्षा.- गिरीष भेलावे, ग्रामसेवक, बोथली

टॅग्स :water shortageपाणीटंचाई