शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
3
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
5
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
6
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
7
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
8
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
9
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
10
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
11
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
13
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
15
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
16
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
17
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
18
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
19
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
20
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST

जिल्ह्यात शुक्र वारी दुपारी १२ वाजतापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सकाळी या धरणाचे १२ दरवाजे ०.९० मीटरने उघडण्यात आले होते. तर या तालुक्यातील कावराबांधसह काही गावात पुराचे पाणी साचल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती.

ठळक मुद्देनदी, नाले तुडुंब : अनेक मार्ग बंद : वस्त्यांमध्ये साचले पाणी, पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडले, गेल्या २४ तासांत १०१.८१ मिमी.

पावसाची नोंदलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील २-३ दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. गुरूवारी (दि.२०) सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.२१) दुपारी १२ वाजतापर्यंत कायम होता. त्यामुळे मागील २४ तासांत १०१.८१ मिमी पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले भरून वाहत होते. त्यामुळे सालेकसा आणि आमगाव तालुक्यातील काही गावांचा संपर्क तालुका मुख्यालयाशी तुटला होता.जिल्ह्यात शुक्र वारी दुपारी १२ वाजतापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सकाळी या धरणाचे १२ दरवाजे ०.९० मीटरने उघडण्यात आले होते. तर या तालुक्यातील कावराबांधसह काही गावात पुराचे पाणी साचल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. पावसामुळे सालेकसा ते तिरखेडी, सालेकसा ते नानव्हा, भजेपार ते सालेकसा, भजेपार ते साखरीटोला, बोरकन्हार अंजोरा, देवरी ते आमगाव हे मार्ग बंद झाले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक शुक्रवारी दुपारपर्यंत ठप्प झाली होती. गोंदिया ते कोहमारा मार्गावर सुद्धा पाणी असल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली होती. तिरोडा ते तुमसर मार्गावरील बिरसी येथील पूल पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे तिरोडा तालुक्याचा तुमसरशी संपर्क तुटला होता. गोंदिया बालाघाट मार्गावरील रजेगाव नदीवरील जुना पूल पाण्याखाली आता होता. तर पाणी पातळीत सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावातील नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील नदी नाले तुडूंब भरून वाहत होते. शेतांमधील पाणी रस्त्यांवरु न वाहू लागल्याने रस्त्यालगत असलेल्या घरांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. तर आमगाव शहरातील ३-४ वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते.

टॅग्स :Rainपाऊस