शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST

जिल्ह्यात शुक्र वारी दुपारी १२ वाजतापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सकाळी या धरणाचे १२ दरवाजे ०.९० मीटरने उघडण्यात आले होते. तर या तालुक्यातील कावराबांधसह काही गावात पुराचे पाणी साचल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती.

ठळक मुद्देनदी, नाले तुडुंब : अनेक मार्ग बंद : वस्त्यांमध्ये साचले पाणी, पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडले, गेल्या २४ तासांत १०१.८१ मिमी.

पावसाची नोंदलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील २-३ दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. गुरूवारी (दि.२०) सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.२१) दुपारी १२ वाजतापर्यंत कायम होता. त्यामुळे मागील २४ तासांत १०१.८१ मिमी पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले भरून वाहत होते. त्यामुळे सालेकसा आणि आमगाव तालुक्यातील काही गावांचा संपर्क तालुका मुख्यालयाशी तुटला होता.जिल्ह्यात शुक्र वारी दुपारी १२ वाजतापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सकाळी या धरणाचे १२ दरवाजे ०.९० मीटरने उघडण्यात आले होते. तर या तालुक्यातील कावराबांधसह काही गावात पुराचे पाणी साचल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. पावसामुळे सालेकसा ते तिरखेडी, सालेकसा ते नानव्हा, भजेपार ते सालेकसा, भजेपार ते साखरीटोला, बोरकन्हार अंजोरा, देवरी ते आमगाव हे मार्ग बंद झाले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक शुक्रवारी दुपारपर्यंत ठप्प झाली होती. गोंदिया ते कोहमारा मार्गावर सुद्धा पाणी असल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली होती. तिरोडा ते तुमसर मार्गावरील बिरसी येथील पूल पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे तिरोडा तालुक्याचा तुमसरशी संपर्क तुटला होता. गोंदिया बालाघाट मार्गावरील रजेगाव नदीवरील जुना पूल पाण्याखाली आता होता. तर पाणी पातळीत सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावातील नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील नदी नाले तुडूंब भरून वाहत होते. शेतांमधील पाणी रस्त्यांवरु न वाहू लागल्याने रस्त्यालगत असलेल्या घरांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. तर आमगाव शहरातील ३-४ वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते.

टॅग्स :Rainपाऊस