शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

खाद्य पदार्थांमुळे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: March 6, 2015 01:38 IST

ग्रामीण भागातील बहुतांश हॉटेल, रेस्टॉरेट व्यवसायिक नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ ग्राहकांच्या माथी मारत आहेत.

रावणवाडी : ग्रामीण भागातील बहुतांश हॉटेल, रेस्टॉरेट व्यवसायिक नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ ग्राहकांच्या माथी मारत आहेत. कच्या सामग्रीपासून वेगवेगळे पदार्थ बनविण्यात येत असताना अन्न औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) अधिकारी मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत झोेपेचे सोंग घेऊन बसले आहेत.केवळ सणासुदीच्या दिवसात हॉटेल, मिठाई व्यवसायीकांकडे मोजक्या दिवसासाठी तपासणी मोहीम राबविणारे एफडीएचे अधिकारी वर्षभर मात्र बेफिकीर असतात. या विभागातील अधिकारीच ग्रामीण भागातील व्यावसायिकांना निकृष्ट खाद्यपदार्थ विकण्याची मुभा देत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. हॉटेल व्यवसायात अन्न पदार्थ, विविध व्यंजने तयार करण्यासाठी असणाऱ्या नियमावलींची अंमलबजावणीच केली जात नाही. तरीही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. दररोज हजारो रुपयांचा व्यवसाय करणारे हॉटेल मालक ग्राहकांच्या आरोग्याची मात्र कोणतीही काळती घेत नाहीत.निकृष्ट दर्जाच्या साहित्यापासून तयार करण्यात येणार व्यंजन सर्रास विकल्या जात आहे. मात्र सामान्य ग्राहकांच्या त्याच्या दूष्परिणामाची कल्पनाच नसते. त्यामुळे ते पदार्थ बिनधास्तपणे खाऊन ग्राहक विविध आजाराला आमंत्रण देत असतात. ग्रामीण भागात दिवसेंदिवस हा व्यवसाय फोफावत चालला आहे. या सर्व प्रकारावर नियंत्रण आणण्याचे काम अन्न व औषध प्रशासनाचे असताना त्यांच्याकडून त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.हॉटेल व्यावसायिक वेगवेगळी शक्कल लढवित गोड मिठाईत अमर्याद साखरेचा उपयोग करून रासायनिक रंगाने आकर्षक करून विकतात. पण ग्रामीण भागात एफडीएच्या अधिकाऱ्यांनीही कधीही त्यांच्या हॉटेलमधील नमुने घेतल्याचे उदाहरण दिसून येत नाही. (वार्ताहर)