शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

खाद्य पदार्थांमुळे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: March 6, 2015 01:38 IST

ग्रामीण भागातील बहुतांश हॉटेल, रेस्टॉरेट व्यवसायिक नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ ग्राहकांच्या माथी मारत आहेत.

रावणवाडी : ग्रामीण भागातील बहुतांश हॉटेल, रेस्टॉरेट व्यवसायिक नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ ग्राहकांच्या माथी मारत आहेत. कच्या सामग्रीपासून वेगवेगळे पदार्थ बनविण्यात येत असताना अन्न औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) अधिकारी मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत झोेपेचे सोंग घेऊन बसले आहेत.केवळ सणासुदीच्या दिवसात हॉटेल, मिठाई व्यवसायीकांकडे मोजक्या दिवसासाठी तपासणी मोहीम राबविणारे एफडीएचे अधिकारी वर्षभर मात्र बेफिकीर असतात. या विभागातील अधिकारीच ग्रामीण भागातील व्यावसायिकांना निकृष्ट खाद्यपदार्थ विकण्याची मुभा देत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. हॉटेल व्यवसायात अन्न पदार्थ, विविध व्यंजने तयार करण्यासाठी असणाऱ्या नियमावलींची अंमलबजावणीच केली जात नाही. तरीही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. दररोज हजारो रुपयांचा व्यवसाय करणारे हॉटेल मालक ग्राहकांच्या आरोग्याची मात्र कोणतीही काळती घेत नाहीत.निकृष्ट दर्जाच्या साहित्यापासून तयार करण्यात येणार व्यंजन सर्रास विकल्या जात आहे. मात्र सामान्य ग्राहकांच्या त्याच्या दूष्परिणामाची कल्पनाच नसते. त्यामुळे ते पदार्थ बिनधास्तपणे खाऊन ग्राहक विविध आजाराला आमंत्रण देत असतात. ग्रामीण भागात दिवसेंदिवस हा व्यवसाय फोफावत चालला आहे. या सर्व प्रकारावर नियंत्रण आणण्याचे काम अन्न व औषध प्रशासनाचे असताना त्यांच्याकडून त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.हॉटेल व्यावसायिक वेगवेगळी शक्कल लढवित गोड मिठाईत अमर्याद साखरेचा उपयोग करून रासायनिक रंगाने आकर्षक करून विकतात. पण ग्रामीण भागात एफडीएच्या अधिकाऱ्यांनीही कधीही त्यांच्या हॉटेलमधील नमुने घेतल्याचे उदाहरण दिसून येत नाही. (वार्ताहर)