शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

घरगुती कारणातून गळा दाबून बायकोला केले ठार, खून करण्यापूर्वी सासऱ्याला केला फाेन; म्हणाला...

By नरेश रहिले | Updated: December 20, 2023 19:47 IST

आरोपी केवल सितलाल नेवरा (३८, रा. टोयागोंदी) यांचा पत्नी आशा नेवरा यांच्यासोबत घरगुती कारणातून वाद झाला. या वादाला घेऊन असलेल्या रागात केवल नेवरा याने पत्नी आशा नेवरा यांचा गळा दाबून त्यांना ठार केले.

गोंदिया : घरातील क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीची बचावाची झाल्याने नवऱ्याने बायकोचा गळा दाबून खून केल्याची घटना १९ डिसेंबर रोजी दुपारी १:३० वाजतादरम्यान सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम टोयागोंदी येथे घडली. आशा केवल नेवरा (३२, रा. टोयागोंदी) असे मृत महिलेचे नाव आहे.

आरोपी केवल सितलाल नेवरा (३८, रा. टोयागोंदी) यांचा पत्नी आशा नेवरा यांच्यासोबत घरगुती कारणातून वाद झाला. या वादाला घेऊन असलेल्या रागात केवल नेवरा याने पत्नी आशा नेवरा यांचा गळा दाबून त्यांना ठार केले.

आशाचे लग्न सन २०१३ मध्ये झाले होते. आशाला केवल पासून एक मुलगा ९ वर्ष व एक तीन वर्षाची मुलगी आहे. आशाही आठ दिवसापूर्वी माहेरी राहून १० डिसेंबर रोजी सासरी टोयागोंदी येथे आली. १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता आरोपी केवलने आपले सासरे गोपाल सूरदेव निर्मलकर यांना फोन करून आशाला आठ-पंधरा दिवसांसाठी तुमच्याकडे पाठवत आहे, असे म्हटल्यावर कोणासोबत पाठवता, असे सासऱ्याने विचारले. बस्स.. मी पाठवतो असे बोलून केवल गप्प राहीला. त्यावर सासरा गोपाल निर्मलकर यांनी माझ्या मुलीला एकटी पाठवू नका; आपण सोडून द्या असे म्हटले. एवढे बोलल्यावर केवलने आशाला फोन दिला.

 गोपाल यांनी आशा सोबत चर्चा केल्यावर मला एकटीच माहेरी जायला सांगत आहेत आणि माझ्या मुलांनाही माझ्यासोबत पाठवत नाही असे आपल्या वडीलाला सांगितले. मुले कुठे आहेत हे विचारल्यावर त्या मुलांना सासू फिरायला घेऊन गेली असे आशाने सांगितले. त्यानंतर गोपाल यांनी फोन आपल्या पत्नी रमौतीन यांच्याकडे फाेन दिला. मायलेकीच्या बोलण्यातही मुलांसोबत पाठवतील तर मी माहेरी येईल अन्यथा मी माहेरी येणार नाही असे आशाने म्हटले. दुपारी ३:१५ वाजता आशाच्या सासऱ्याने नवीन नंबरने फोन करून आशाचा खून झाल्याची माहिती दिली. आशाचे माहेरचे मंडळी रात्री ९ वाजता टोयागोंदी येथे पोहचल्यावर दुपारी दीड वाजता आशाचा गळा दाबून खून केल्याची माहिती पुढे आली. आशाचे वडील गोपाल सूरदेव निर्मलकर (६५, रा. उरई-डबरी, डोंगरगड- छत्तीसगड) यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी या घटनेसंदर्भात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक अरविंद राऊत करीत आहेत.

सितलालच्या संवादातून त्यांच्या घरात वाद झाल्याचा संशयआशाचे सासरे सितलाल नेवरा यांनी आशाचे वडील गोपाल यांच्याशी फोनवर संवाद केला त्या संवादात नेवरा कुटुंबियांत वाद झाला असावा असा संशय घटनेच्या पूर्वीच गोपाल यांना आला होता. परंतु काही विचारणार यापूर्वीच आशाच्या सासऱ्याने फोन लगेच बंद केला. त्यामुळे आशाघरी काय घडले, कशामुळे जावई मुलीला माहेरी पाठविण्याची गोष्ट करतो हे काहीच कळले नाही. परिणामी खून झाल्याची बातमीच कानावर पडली.

सहा तासातच मुलीच्या खुनाची बातमीसकाळी ९ वाजता तब्बल १० ते १५ मिनीटे संवाद झाल्यानंतर त्यांच्या घरात वाद झाल्याची कुणकुण लागली. संवाद झाला, जावई ऐकेना, तिचा सासरा बोलेना, सासू लहान मुलांना घेऊन घराबाहेर गेली आणि आशाला अश्रृ आवरत नव्हते. या एकंदरीत प्रकरणावर वेळेनुसार प्रकरण शांत होईल असे माहेरच्यांना वाटत होते. परंतु तब्बल सहा तासाने मुलीचा खून झाल्याची बातमी कानावर पडली अन् माहेरच्या सर्व लोकांना अश्रृ अनावर झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस