शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

घरगुती कारणातून गळा दाबून बायकोला केले ठार, खून करण्यापूर्वी सासऱ्याला केला फाेन; म्हणाला...

By नरेश रहिले | Updated: December 20, 2023 19:47 IST

आरोपी केवल सितलाल नेवरा (३८, रा. टोयागोंदी) यांचा पत्नी आशा नेवरा यांच्यासोबत घरगुती कारणातून वाद झाला. या वादाला घेऊन असलेल्या रागात केवल नेवरा याने पत्नी आशा नेवरा यांचा गळा दाबून त्यांना ठार केले.

गोंदिया : घरातील क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीची बचावाची झाल्याने नवऱ्याने बायकोचा गळा दाबून खून केल्याची घटना १९ डिसेंबर रोजी दुपारी १:३० वाजतादरम्यान सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम टोयागोंदी येथे घडली. आशा केवल नेवरा (३२, रा. टोयागोंदी) असे मृत महिलेचे नाव आहे.

आरोपी केवल सितलाल नेवरा (३८, रा. टोयागोंदी) यांचा पत्नी आशा नेवरा यांच्यासोबत घरगुती कारणातून वाद झाला. या वादाला घेऊन असलेल्या रागात केवल नेवरा याने पत्नी आशा नेवरा यांचा गळा दाबून त्यांना ठार केले.

आशाचे लग्न सन २०१३ मध्ये झाले होते. आशाला केवल पासून एक मुलगा ९ वर्ष व एक तीन वर्षाची मुलगी आहे. आशाही आठ दिवसापूर्वी माहेरी राहून १० डिसेंबर रोजी सासरी टोयागोंदी येथे आली. १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता आरोपी केवलने आपले सासरे गोपाल सूरदेव निर्मलकर यांना फोन करून आशाला आठ-पंधरा दिवसांसाठी तुमच्याकडे पाठवत आहे, असे म्हटल्यावर कोणासोबत पाठवता, असे सासऱ्याने विचारले. बस्स.. मी पाठवतो असे बोलून केवल गप्प राहीला. त्यावर सासरा गोपाल निर्मलकर यांनी माझ्या मुलीला एकटी पाठवू नका; आपण सोडून द्या असे म्हटले. एवढे बोलल्यावर केवलने आशाला फोन दिला.

 गोपाल यांनी आशा सोबत चर्चा केल्यावर मला एकटीच माहेरी जायला सांगत आहेत आणि माझ्या मुलांनाही माझ्यासोबत पाठवत नाही असे आपल्या वडीलाला सांगितले. मुले कुठे आहेत हे विचारल्यावर त्या मुलांना सासू फिरायला घेऊन गेली असे आशाने सांगितले. त्यानंतर गोपाल यांनी फोन आपल्या पत्नी रमौतीन यांच्याकडे फाेन दिला. मायलेकीच्या बोलण्यातही मुलांसोबत पाठवतील तर मी माहेरी येईल अन्यथा मी माहेरी येणार नाही असे आशाने म्हटले. दुपारी ३:१५ वाजता आशाच्या सासऱ्याने नवीन नंबरने फोन करून आशाचा खून झाल्याची माहिती दिली. आशाचे माहेरचे मंडळी रात्री ९ वाजता टोयागोंदी येथे पोहचल्यावर दुपारी दीड वाजता आशाचा गळा दाबून खून केल्याची माहिती पुढे आली. आशाचे वडील गोपाल सूरदेव निर्मलकर (६५, रा. उरई-डबरी, डोंगरगड- छत्तीसगड) यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी या घटनेसंदर्भात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक अरविंद राऊत करीत आहेत.

सितलालच्या संवादातून त्यांच्या घरात वाद झाल्याचा संशयआशाचे सासरे सितलाल नेवरा यांनी आशाचे वडील गोपाल यांच्याशी फोनवर संवाद केला त्या संवादात नेवरा कुटुंबियांत वाद झाला असावा असा संशय घटनेच्या पूर्वीच गोपाल यांना आला होता. परंतु काही विचारणार यापूर्वीच आशाच्या सासऱ्याने फोन लगेच बंद केला. त्यामुळे आशाघरी काय घडले, कशामुळे जावई मुलीला माहेरी पाठविण्याची गोष्ट करतो हे काहीच कळले नाही. परिणामी खून झाल्याची बातमीच कानावर पडली.

सहा तासातच मुलीच्या खुनाची बातमीसकाळी ९ वाजता तब्बल १० ते १५ मिनीटे संवाद झाल्यानंतर त्यांच्या घरात वाद झाल्याची कुणकुण लागली. संवाद झाला, जावई ऐकेना, तिचा सासरा बोलेना, सासू लहान मुलांना घेऊन घराबाहेर गेली आणि आशाला अश्रृ आवरत नव्हते. या एकंदरीत प्रकरणावर वेळेनुसार प्रकरण शांत होईल असे माहेरच्यांना वाटत होते. परंतु तब्बल सहा तासाने मुलीचा खून झाल्याची बातमी कानावर पडली अन् माहेरच्या सर्व लोकांना अश्रृ अनावर झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस