शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

प्रत्येक आठवड्याला होतोय जिल्ह्यात महिलांचा छळ; गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 17:22 IST

घटनाही घडताहेत : महिला-मुलींच्या अपहरणात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठी समस्या बनलेली आहे. यातच महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही अधून-मधून घडत असतात. महिलांच्या बाबतीतील एकूण गुन्हे कमी झाले असले तरी अत्याचार व अपहरणाच्या गुन्ह्यांत वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.

देशभरात अत्याचाराच्या घटनांनी संताप व्यक्त होत आहे. या व्यवस्थेत महिलांना सुरक्षितता मिळत नाही. यातूनच नराधमांची वाकडी नजर महिला, मुलींवर पडत असल्याचे चित्र आहे. समाजात विकृती वाढत असून, संस्कारक्षम पिढी घडविण्यात कुठे तरी आपण कमी पडतो, हे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा जरब निर्माण करणारी यंत्रणा कुचकामी ठरत आहे. सुरक्षित वातावरण देण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. हे होत नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खुनामध्ये लक्षणीय वाढ पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवायांचे सत्र राबविणे सुरू केले तरीही खुनांचे गुन्हे वाढतच आहेत. जानेवारी ते आतापर्यंत १७ खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात ४२ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

गुन्हेगार निर्धावत आहेत पोलिसांकडून महिला अत्याचार विरोधातील गुन्ह्यांचा तपास जलदगतीने होतो. यातील आरोपींना निष्पन्न करून त्यांच्या विरोधात अटकेची कारवाईही केली आहे. ही सकारात्मक बाब असली तरी यामुळे महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण झालेले नाही. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे सातत्याने वाढत आहे. यावर प्रतिबंध ठेवण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे.

कोण काय म्हणतंय.... "नारीशक्त्ती म्हणून स्त्रीचा गौरव केला जातो. दुसरीकडे मात्र तिच्यावर अत्याचार होतात. समाजातील विकृती दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांचा वचक नाही. सत्ताधाऱ्यांचा यंत्रणेवर अंकुश नाही. महिलांना आर्थिक मदत देण्यापेक्षा त्यांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. लहान मुले, मुली, महिला सुरक्षित नाहीत."- ममता पाऊलझगडे, सामाजिक कार्यकर्ती, किडंगीपार

कौटुंबिक हिंसाचारात चार महिलांचा बळीसासरच्या मंडळींकडून विविध कारणाने छळ झाल्यामुळे विवाहित महिलेला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते. या गुन्ह्यात त्या विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून सासरच्या मंडळीविरोधात गुन्हे दाखल होतात. मागील वर्षी व यंदा सात महिन्यांच्या कालावधीत अशा प्रकारच्या आत्महत्येच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. कौटुंबिक हिंसाचार हा सुद्धा महिलांवरचा मोठा आघात होताना दिसत आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया