शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:00 IST

शुक्र वारी मध्यरात्रीनंतर तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यवृष्टी अर्जुनी मोरगाव महसूल मंडळात ४३.२ मि.मी.झाली. त्याखालोखाल बोंडगावदेवी येथे २८ मि.मी.तर नवेगावबांध महसूल मंडळात १२ मि.मी.पर्जन्यवृष्टी झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सध्या हरभरा पीक परिपक्व होऊन निघण्याच्या स्थितीत आहे.

ठळक मुद्देविजांचा कडकडाट व पर्जन्यवृष्टी । रबी पीक भुईसपाट

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील बोंडगावदेवी, अर्जुनी मोरगाव व नवेगावबांध या परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे कडधान्य भाजीपाला पीक व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी येत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.शुक्र वारी मध्यरात्रीनंतर तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यवृष्टी अर्जुनी मोरगाव महसूल मंडळात ४३.२ मि.मी.झाली. त्याखालोखाल बोंडगावदेवी येथे २८ मि.मी.तर नवेगावबांध महसूल मंडळात १२ मि.मी.पर्जन्यवृष्टी झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सध्या हरभरा पीक परिपक्व होऊन निघण्याच्या स्थितीत आहे. मात्र या पावसामुळे हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्याच्या काही भागात भाजीपाला शेती केली जाते.नवेगाव मंडळातील सावरटोला गावचे शेतकरी किशोर तरोणे यांच्या शेतातील भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतात पाणी साचलेले आहे. सध्या मिरचीचे पहिले पीक निघाले आहे. दुसरे पीक निघण्याच्या स्थितीत असताना झालेल्या अवकाळी पावसामुळे मिरची काळी पडण्याची चिन्ह दिसून येत आहेत. शुक्र वारी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याची कबुली तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी दिली. अद्याप नुकसानीचे क्षेत्र ठरले नसले तरी पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या अवकाळी पावसाचा टरबूज पिकालाही धोका असल्याचे सांगितले जाते.सध्या पावसाचा हंगाम नाही मात्र यावर्षी पावसाळा संपल्यानंतरही आजतागायत अवकाळी पावसाचे थैमान सुरूच आहे. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाने शेतकरी पुरता हवालदिल झाल्याचे चित्र आहे. सततचे ढगाळ वातावरण असल्याने ऊन्ह पडत नाही त्यामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. अजूनही अवकाळी पावसाचे संकट टळले नाही. या आठवड्यात शनिवार, मंगळवार व बुधवारला जिल्ह्यातील काही गावात पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तिवली आहे.यापूर्वीसुद्धा नोव्हेंबर महिन्यात धानपीक तोडणी झाल्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी धान पिकाचे मोठे नुकसान झाले होते. आ. मनोहर चंद्रिकापुरे व जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी भिवखिडकी परिसरात भेट देऊन पिकांची पाहणी केली होती. त्या दरम्यानच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. शेतकºयांना आसमानी व सुलतानी संकटाचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचे चित्र बघावयास मिळते. आॅगस्ट व सप्टेंबर २०१९ या महिन्यात अतिवृष्टी झाली होती. नाल्याच्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांना या पुराचा फटका बसला. त्यामुळे जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, गोंदिया व तिरोडा तालुक्यात सुमारे अडीच हजार हेक्टर शेत जमिनीतील धान पिकाचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे सर्वे, पंचनामे करण्यात आले.अहवाल जिल्हा मुख्यालयाला पाठविण्यात आला. त्यानंतर नागपूर विभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने ६९ कोटी रुपयांची भरीव मदत मंजूर केली. मात्र यात गोंदिया जिल्ह्याला वगळण्यात आले. नेमक्या याच कालावधीत गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचेही नुकसान झाले असताना का वगळण्यात आले.याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. मात्र अलीकडे वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह होणाऱ्या अवकाळी पावसामुळे विवाह समारंभावरही संकट उद्भवल्याचे दिसून येत आहे.पुन्हा वादळी पावसाचा इशाराहवामान विभागाने जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवारी अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना रब्बी हंगामाला मुकावे लागण्याची शक्यता असल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती