शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाहुणे निघाले परतीच्या प्रवासाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:10 IST

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे स्थानक आहे. तसेच येथून चारही दिशांकडे रेल्वेगाड्या धावतात.

ठळक मुद्देतिकिटांसाठी तासन्तास रांगेत : रेल्वेस्थानकावर खचाखच गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे स्थानक आहे. तसेच येथून चारही दिशांकडे रेल्वेगाड्या धावतात. शासकीय कर्मचाºयांच्या सध्या दिवाळी सुट्यांचे दिवस संपत आले आहेत. दिवाळीनिमित्त स्वगृही आलेले व पाहुणचारासाठी आलेले पाहुणे आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यामुळे गाड्या सध्या भरभरून चालत आहेत.धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा व भाऊबीज हे दिवाळीचे पाच दिवस. शाळांना सुटी असल्याने विद्यार्थी सहकुटुंब नातलगांकडे जातात. शासकीय कर्मचाºयांना सुटी असल्यामुळे तेसुद्धा फिरण्यासाठी इतरत्र जातात. मात्र आता पाच दिवसांची दिवाळी संपण्याच्या मार्गावर असताना पाहुणे परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. प्रवास करण्यासाठी रेल्वेला प्रथम पसंती दिली जाते. त्यामुळे जिल्ह्यात मोडणाºया अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. गोंदिया रेल्वे स्थानक हे जंक्शन आहे. येथून बालाघाट-जबलपूर, रायपूर-बिलासपूर, चांदाफोर्ट-चंद्रपूर व नागपूर अशा चारही दिशांनी रेल्वेगाड्या धावतात. गोंदिया स्थानकातून आपल्या कोणत्याही गंतव्यस्थळी जाणे सुगम असते. त्यामुळे जिल्ह्यात आलेले अनेक गावांतील बहुतांश पाहुणे गोंदिया रेल्वे स्थानकातूनच आपला परतीचा प्रवास करतात.यामुळे सद्यस्थितीत गोंदिया रेल्वे स्थानक गर्दीने खचाखच भरलेले दिसून येत आहे. येथील तिकीट काऊंटरवर लोकांची गर्दी उसळलेली दिसते. त्यामुळे प्रवाशांना तासनतास रांगेत उभे राहून तिकिटे खरेदी करावी लागत आहेत. ट्रेन निघण्याची वेळ झाली असतानाही अनेकांना तिकिटे मिळत नाही, त्यांना रांगेतच राहून पुढील ट्रेनची तिकिटे घ्यावी लागत असल्याचे चित्र स्थानकावर दिसून येत आहे. तसेच दिवाळीत घरी आलेल्यांना परतीचा प्रवास करताना रेल्वे गाड्यांत आरक्षण मिळाले नाही.परिणामी प्रवाशांना पुणे, मुंबईकडे जाताना तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. नोकरी, व्यवसाय, खासगी कामानिमित्त पुणे, मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, हैदराबाद, सूरत आदी प्रमुख शहरात असलेल्यांनी दिवाळीत घर गाठले होते. घरी दिवाळी उत्सवाला जायचे म्हणून कसातरी प्रवास केला. मात्र दिवाळीनंतर परतीचा प्रवास फारच बिकट झाला आहे.२३ आॅक्टोबर रोजी कार्यालयात रूजू व्हायचे असल्याने मिळेल त्या जागी प्रवास करण्याची अनेकांची तयारी पाहावयास मिळाली. रविवारी एक दोन तरी विशेष रेल्वे गाड्या सुरु होतील, अशी अपेक्षा होती. परंतु रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या या आशेवर पाणी फेरल्याचे दिसून आले. गत चार ते पाच दिवसांपासून रेल्वे आरक्षण खिडक्यांवर प्रचंड रांग, तरीदेखील क्षणात तात्काळचे आरक्षण अनेकांना न मिळाल्याचे चित्र बघावयास मिळाले.काही जणांनी तीन ते चार महिन्यांपूर्वीच दिवाळीदरम्यान रेल्वे गाड्यांचे आरक्षण करून ठेवले होते. मात्र ज्यांनी वेळेवर दिवाळीत घर गाठले त्यांना अनेक समस्यांचा सामना करून प्रवास करावा लागला आहे. रेल्वे तिकीट दलालांकडेही रविवारचे बोलू नका, हेच उत्तर प्रवाशांना मिळाले.खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांचे फावलेमुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, बिलासपूर, औरंगाबादकडे जाणाºया प्रवाशांची उसळलेली गर्दी बघून खासगी ट्रॅव्हल्स संचालकांनी प्रवाशांच्या खिशावर अक्षरश: डल्ला मारला आहे. त्यांनी वाढीव प्रवासभाडे घेतल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सच्या चालक-मालकांनी मोठी कमाई केली आहे. मात्र या प्रकाराने प्रवाशांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला.पाकिटमारांची भीती प्रवाशांनारेल्वे व बस स्थानकावर गर्दीचा लाभ घेत पाकिटमारी करणारे असामाजिक तत्व सक्रीय झाले आहेत. याशिवाय महिलांच्या अंगावरील सोन्याचांदीचे दागिने लंपास करणाºया टोळ्यासुद्धा आहेत. प्रवाशांच्या सुटकेस व बॅग्स पळवून नेण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. आता दिवाळी संपण्याच्या मार्गावर असताना अतिथी परतीच्या प्रवासाला लागले असल्याने गोंदिया रेल्वे स्थानक गर्दीने खचाखच भरले आहे. त्यामुळे पाकिटमारांची भीती प्रवाशांना असल्याने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकीट खिडक्या ते सर्वच प्लॅटफॉर्मवर पोलीस संरक्षणाची सुविधा द्यावी, अशी चर्चा या प्रवाशांमध्ये आहे.