शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वाढती गर्दी देत आहे ‘धोक्याची घंटा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

गोंदिया : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा ग्राफ कमी होत असल्याचे बघून जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल करताच शहरवासी रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहे. ...

गोंदिया : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा ग्राफ कमी होत असल्याचे बघून जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल करताच शहरवासी रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहे. यामुळेच शहरातील रस्त्यांवर दुपारी २ वाजतापर्यंत गर्दी होत असून कोरोना पूर्णपणे जिल्ह्यातून गेल्याचे वाटत आहे. मात्र मागील वर्षीही शिथिलता मिळाल्यानंतर शहरवासीयांनी अतिरेक केला होता. त्यानंतर कोरोना कहराचा सामना करावा लागला होता. शहरात वाढत चाललेली गर्दी आता ‘धोक्याची घंटा’ देत असून, यंदा मात्र त्या परिस्थितीची पुनरावृत्ती नको असल्यास तेव्हा झालेली चूक करता कामा नये.

मागील वर्षी कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली होती. दुकाने उघडण्यास परवानगी देत हळूहळू त्यांची वेळ वाढवून देण्यात आली होती. यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मागील वर्षापेक्षा जास्त कहर केला असून, त्याची दहशत आजही कित्येकांच्या मनात कायम आहे. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे बघून व्यापारी व नेते मंडळी बाजार व दुकान उघडण्यासाठी जोर देऊ लागले. परिणामी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यात आता सर्वच दुकाने व बाजारासाठी दुपारी २ वाजतापर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली आहे.

मात्र दिलेली ही सूट नागरिकांना कोरोना जिल्ह्यातून पूर्णपणे गेल्यामुळे दिल्यासारखी वाटत आहे. हेच कारण आहे की, शहरातील रस्ते आता गर्दीने खचाखच भरू लागले आहेत. बाजारात दुपारी २ वाजतापर्यंत पाय ठेवायला जागा नसते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. यात पुरुषांसोबतच आता महिलांचीही गर्दी वाढू लागली आहे. विशेष म्हणजे, कित्येक जण आता दोन महिन्यांपासून घरात कोंडल्याने विनाकारण बाहेर फिरण्यासाठी पडत असल्याचेही दिसते. मात्र ही गर्दी ‘धोक्याची घंटा’ असून कोरोनाचा कहर पुन्हा वाढू नये यासाठी आताच आपली चूक सुधारण्याची गरज आहे.

---------------------------

नियमांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष

व्यापाऱ्यांना दुकान उघडण्यासाठी दुपारी २ वाजतापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. मात्र यासोबतच कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र वास्तवात कुणीही नियमांचे पालन करताना दिसत नाही. ग्राहक आला तोच देव पावला, असे व्यापाऱ्यांना वाटत असून नियमांची धुडकावणी सुरू आहे. विशेष म्हणजे प्रशासनाच्या कोणताही विभाग वा पथकाचे याकडे लक्ष नाही.

----------------------------------

एकाच व्यक्तीने बाहेर पडावे

घरातील सामान आणण्यासाठी घराबाहेर पडावे लागते यात शंका नाही. मात्र वारंवार एक-एक सामान आणण्यासाठी बाहेर पडणे हे सयुक्तिक नाही. शिवाय कुण्या एका व्यक्तीनेच सामान आणले तरी चालते. मात्र शहरात बघता कित्येक जण सामानाच्या नावावर नुसते फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. यात महिलांचीही कमी बाजारात दिसून येत नाही. मात्र आपल्या सुरक्षेसाठी गांभीर्याने घेण्याची गरज आहे.