शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

शहरात वाढती गर्दी देत आहे ‘धोक्याची घंटा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

गोंदिया : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा ग्राफ कमी होत असल्याचे बघून जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल करताच शहरवासी रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहे. ...

गोंदिया : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा ग्राफ कमी होत असल्याचे बघून जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल करताच शहरवासी रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहे. यामुळेच शहरातील रस्त्यांवर दुपारी २ वाजतापर्यंत गर्दी होत असून कोरोना पूर्णपणे जिल्ह्यातून गेल्याचे वाटत आहे. मात्र मागील वर्षीही शिथिलता मिळाल्यानंतर शहरवासीयांनी अतिरेक केला होता. त्यानंतर कोरोना कहराचा सामना करावा लागला होता. शहरात वाढत चाललेली गर्दी आता ‘धोक्याची घंटा’ देत असून, यंदा मात्र त्या परिस्थितीची पुनरावृत्ती नको असल्यास तेव्हा झालेली चूक करता कामा नये.

मागील वर्षी कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली होती. दुकाने उघडण्यास परवानगी देत हळूहळू त्यांची वेळ वाढवून देण्यात आली होती. यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मागील वर्षापेक्षा जास्त कहर केला असून, त्याची दहशत आजही कित्येकांच्या मनात कायम आहे. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे बघून व्यापारी व नेते मंडळी बाजार व दुकान उघडण्यासाठी जोर देऊ लागले. परिणामी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यात आता सर्वच दुकाने व बाजारासाठी दुपारी २ वाजतापर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली आहे.

मात्र दिलेली ही सूट नागरिकांना कोरोना जिल्ह्यातून पूर्णपणे गेल्यामुळे दिल्यासारखी वाटत आहे. हेच कारण आहे की, शहरातील रस्ते आता गर्दीने खचाखच भरू लागले आहेत. बाजारात दुपारी २ वाजतापर्यंत पाय ठेवायला जागा नसते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. यात पुरुषांसोबतच आता महिलांचीही गर्दी वाढू लागली आहे. विशेष म्हणजे, कित्येक जण आता दोन महिन्यांपासून घरात कोंडल्याने विनाकारण बाहेर फिरण्यासाठी पडत असल्याचेही दिसते. मात्र ही गर्दी ‘धोक्याची घंटा’ असून कोरोनाचा कहर पुन्हा वाढू नये यासाठी आताच आपली चूक सुधारण्याची गरज आहे.

---------------------------

नियमांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष

व्यापाऱ्यांना दुकान उघडण्यासाठी दुपारी २ वाजतापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. मात्र यासोबतच कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र वास्तवात कुणीही नियमांचे पालन करताना दिसत नाही. ग्राहक आला तोच देव पावला, असे व्यापाऱ्यांना वाटत असून नियमांची धुडकावणी सुरू आहे. विशेष म्हणजे प्रशासनाच्या कोणताही विभाग वा पथकाचे याकडे लक्ष नाही.

----------------------------------

एकाच व्यक्तीने बाहेर पडावे

घरातील सामान आणण्यासाठी घराबाहेर पडावे लागते यात शंका नाही. मात्र वारंवार एक-एक सामान आणण्यासाठी बाहेर पडणे हे सयुक्तिक नाही. शिवाय कुण्या एका व्यक्तीनेच सामान आणले तरी चालते. मात्र शहरात बघता कित्येक जण सामानाच्या नावावर नुसते फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. यात महिलांचीही कमी बाजारात दिसून येत नाही. मात्र आपल्या सुरक्षेसाठी गांभीर्याने घेण्याची गरज आहे.