शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

शहरात वाढती गर्दी देत आहे ‘धोक्याची घंटा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

गोंदिया : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा ग्राफ कमी होत असल्याचे बघून जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल करताच शहरवासी रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहे. ...

गोंदिया : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा ग्राफ कमी होत असल्याचे बघून जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल करताच शहरवासी रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहे. यामुळेच शहरातील रस्त्यांवर दुपारी २ वाजतापर्यंत गर्दी होत असून कोरोना पूर्णपणे जिल्ह्यातून गेल्याचे वाटत आहे. मात्र मागील वर्षीही शिथिलता मिळाल्यानंतर शहरवासीयांनी अतिरेक केला होता. त्यानंतर कोरोना कहराचा सामना करावा लागला होता. शहरात वाढत चाललेली गर्दी आता ‘धोक्याची घंटा’ देत असून, यंदा मात्र त्या परिस्थितीची पुनरावृत्ती नको असल्यास तेव्हा झालेली चूक करता कामा नये.

मागील वर्षी कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली होती. दुकाने उघडण्यास परवानगी देत हळूहळू त्यांची वेळ वाढवून देण्यात आली होती. यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मागील वर्षापेक्षा जास्त कहर केला असून, त्याची दहशत आजही कित्येकांच्या मनात कायम आहे. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे बघून व्यापारी व नेते मंडळी बाजार व दुकान उघडण्यासाठी जोर देऊ लागले. परिणामी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यात आता सर्वच दुकाने व बाजारासाठी दुपारी २ वाजतापर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली आहे.

मात्र दिलेली ही सूट नागरिकांना कोरोना जिल्ह्यातून पूर्णपणे गेल्यामुळे दिल्यासारखी वाटत आहे. हेच कारण आहे की, शहरातील रस्ते आता गर्दीने खचाखच भरू लागले आहेत. बाजारात दुपारी २ वाजतापर्यंत पाय ठेवायला जागा नसते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. यात पुरुषांसोबतच आता महिलांचीही गर्दी वाढू लागली आहे. विशेष म्हणजे, कित्येक जण आता दोन महिन्यांपासून घरात कोंडल्याने विनाकारण बाहेर फिरण्यासाठी पडत असल्याचेही दिसते. मात्र ही गर्दी ‘धोक्याची घंटा’ असून कोरोनाचा कहर पुन्हा वाढू नये यासाठी आताच आपली चूक सुधारण्याची गरज आहे.

---------------------------

नियमांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष

व्यापाऱ्यांना दुकान उघडण्यासाठी दुपारी २ वाजतापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. मात्र यासोबतच कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र वास्तवात कुणीही नियमांचे पालन करताना दिसत नाही. ग्राहक आला तोच देव पावला, असे व्यापाऱ्यांना वाटत असून नियमांची धुडकावणी सुरू आहे. विशेष म्हणजे प्रशासनाच्या कोणताही विभाग वा पथकाचे याकडे लक्ष नाही.

----------------------------------

एकाच व्यक्तीने बाहेर पडावे

घरातील सामान आणण्यासाठी घराबाहेर पडावे लागते यात शंका नाही. मात्र वारंवार एक-एक सामान आणण्यासाठी बाहेर पडणे हे सयुक्तिक नाही. शिवाय कुण्या एका व्यक्तीनेच सामान आणले तरी चालते. मात्र शहरात बघता कित्येक जण सामानाच्या नावावर नुसते फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. यात महिलांचीही कमी बाजारात दिसून येत नाही. मात्र आपल्या सुरक्षेसाठी गांभीर्याने घेण्याची गरज आहे.