शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतचा वाजला बिगुल, आता झेडपीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १५ जुलैला संपला मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून जिल्हा परिषद आणि प्रशासकराज सुरु आहे. वीस दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने जि.प.च्या सर्कल निहाय आरक्षणावर आक्षेपाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे आता जिल्हा परिषदेची निवडणूक सुध्दा लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देतालुक्यात सर्वाधिक ग्रा.पं.ची निवडणूक : मोर्चेबांधणीला झाली सुरुवात

n  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने मुदत पूर्ण झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर शुक्रवारी जाहीर केला. यातंर्गत जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा सुध्दा कार्यकाळ ६ महिन्यापूर्वीच संपला असून आता त्यांच्या निवडणुका केव्हा जाहीर होतात याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १५ जुलैला संपला मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून जिल्हा परिषद आणि प्रशासकराज सुरु आहे. वीस दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने जि.प.च्या सर्कल निहाय आरक्षणावर आक्षेपाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे आता जिल्हा परिषदेची निवडणूक सुध्दा लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. सभा, बैठका आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. तर नेत्यांचे दौरे सुध्दा वाढले असून निवडणुकीसाठी सज्ज राहण्यास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगितले जात आहे. त्यातच आता ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्ल्याने यात अजून रंगत वाढली आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यास दोन्ही निवडणुकीच्या निमित्ताने गुलाबी थंडीत राजकीय वातावरण मात्र तापणार असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायत ही राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी असून येथूनच पुढील राजकीय वाटचालीला सुरुवात होते. शिवाय १४ व्या वित्त आयाेगामुळे ग्रामपंचायतींचे महत्व सुध्दा वाढले आहे. त्यामुळे यासाठी अनेकांनी गुडघ्याला बांशिग आधीपासून बांधून ठेवले आहे.  ग्रामीण भागावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत ही गाव विकासाचा कणा असते शिवाय यात स्थानिकांचा थेट संपर्क येतो. याच माध्यमातून ग्रामीण भागावर पकड मजबूत करुन पुढील इतर निवडणुकांचे गड सर करणे शक्य होत असते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुका या कुठल्या पक्षाच्या चिन्हाखाली लढविल्या जात नसल्यातरी अप्रत्यक्षपणे त्यावर कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाचा पगडा असतोच.  

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद