शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शासन मालकीची जागा ग्रा.पं.ने दिली भाड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 20:43 IST

गंगेझरी येथील हॉट मिक्स डांबर प्लांटसाठी सोमलपूर ग्रामपंचायतने मासिक सभेत ठराव घेऊन शासन मालकीची जागा भाड्याने दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी आता काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देविशेष मासिक सभेचा ठराव : कारवाईकडे लागले नागरिकांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : गंगेझरी येथील हॉट मिक्स डांबर प्लांटसाठी सोमलपूर ग्रामपंचायतने मासिक सभेत ठराव घेऊन शासन मालकीची जागा भाड्याने दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी आता काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गोंदिया येथील अंकीत फत्तेसिंह चव्हाण यांनी हॉट मिक्स डांबर प्लांटसाठी सोमलपूर ग्रामपंचायतकडे जागेच्या मागणीकरिता अर्ज केला. सोमलपूर गट ग्रामपंचायत अंतर्गत मौजा गंगेझरी येथील शासकीय भूमापन क्र. १६ आराजी १.१० हे.आर. जागेपैकी ०.६० जागा या कामासाठी देण्याचे ग्रामपंचायतने निश्चित केले. यासाठी ५ फेब्रुवारी रोजी सोमलपूर ग्रामपंचायतने विशेष मासीक सभा बोलाविली.या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच लिलेश्वर खुणे व इतर नऊ सदस्य उपस्थित होते. सभेत ठराव क्रमांक २ नुसार चर्चा करण्यात आली. सदर शासकीय जागा ग्रामपंचायत क्षेत्रात येत असूनही जागे भाडे तत्वावर दिल्यास ग्रामपंचायतचे आर्थिक स्त्रोत बळकट होऊन उत्पादनात भर पडेल व आर्थिक उत्पन्नापासून लोकहितकारी व विकासात्मक कामे करुन जीवनमान उंचावण्यास मदत होईल. म्हणून २५ हजार रुपयेप्रमाणे पाच वर्षासाठी भाडेतत्वावर देण्याचा ठराव पारित करण्यात आला. याच सभेत ठराव क्र. १ नुसार अर्जदाराला ग्रामपंचायतकडून ना हरकरत प्रमाणपत्र देण्याचाही निर्णय घेण्यात आला.ही सभा आटोपल्यानंतर त्याच दिवशी सरपंच खुणे, ग्रामसेवक एन.एन. ब्राम्हणकर यांनी गोंदिया येथे जाऊन अंकीत चव्हाण यांना लेखी करारनामा करुन दिला. याच वेळी ४ फेब्रुवारी २०१९ ते ४ फेब्रुवारी २०२४ या ५ वर्षाच्या कालावधीसाठी ही जागा २५ हजार रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे भाड्याने देण्यात आली. पहिल्या वर्षाची अग्रीम राशी अंकीत चव्हाण यांच्याकडून धनादेश क्रमांक ८२६२७४ अन्वये ग्रामपंचायतला अदा करण्यात आली. सरपंच व ग्रामसेवकाकडून एकाच दिवशी हे सर्व सोपस्कार पार पाडण्यामागची नेमकी भूमिका कोणती हे अद्याप गुलदस्त्यात आहे.सातबारा उताऱ्यानुसार या जागेचा मालक सरकार आहे व इतर अधिकारात झाडांचा जंगल जि.प. नोंदीप्रमाणे सदर गट क्रमांक चराई करिता व निस्तार कटिबंधाकरिता राखून ठेवण्यात आला असल्याचा उल्लेख आहे. मात्र ही जागा ग्रामपंचायतला हस्तांतरीत झाली असल्याची कुठेही नोंद नाही. मग आपल्या मालकीची जागा नसतानाही ग्रामपंचायतने भाडे तत्वावर देण्याचे नेमके औचित्य काय? हा प्रश्न अजूनही कायम आहे. या संदर्भात बरीच राजकीय खलबते सुरु असून हे प्रकरण दडपण्यात येते की वरिष्ठ स्तरावरुन काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सदर जागा ही निस्तारासाठी आहे. या जागेवरील आमराईचा ग्रामपंचायतकडून यापूर्वी लिलाव व्हायचा. त्याच पद्धतीने ग्रामपंचायतचे उत्पन्नात वाढ होऊन अधिकाधिक विकासात्मक कामे व्हावीत यासाठी ग्रामपंचायतने भाडेतत्वावर दिली होती.- लीलेश्वर खुणे, सरपंच, सोमलपूर