शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

थेट सरपंच निवडीने ग्रामपंचायत निवडणुकीत वाढली आहे चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2022 21:18 IST

स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहे. ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत रस घेतला आहे.  निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच सरपंच आणि सदस्यपदासाठी कोणते उमेदवार सरस ठरू शकतात याची चाचपणी  करण्यास सुरुवात केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक  कार्यक्रम बुधवारी जाहीर केला. सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस वाढली आहे. स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहे. ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत रस घेतला आहे.  निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच सरपंच आणि सदस्यपदासाठी कोणते उमेदवार सरस ठरू शकतात याची चाचपणी  करण्यास सुरुवात केली आहे. ग्रामपंचायतची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली  तरी स्थानिक स्तरावर पॅनल तयार करून या निवडणुका राजकीय पक्षांच्या  नेतृत्वात लढविल्या जातात. त्यातच सरपंचाची  निवड ही थेट जनतेतून करण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे. निवडणुका जाहीर  झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकारण तापले असून गावातील चावडीवर आता निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्याचे चित्र आहे. 

१८ डिसेंबरला होणार मतदान ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २८ नाेव्हेंबर ते २ डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. दाखल उमेदवारी अर्जाची छाननी ५ डिसेंबरला होणार आहे, तर दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर आहे. त्यानंतर निवडणूक रिंगणात उभे असणाऱ्या उमेदवारासाठी १८ डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे, तर २० डिसेंबरला झालेल्या मतदानाची मतमोजणी केली जाणार आहे.निकालासाठी करावी लागणार दोन दिवस प्रतीक्षानिकालासाठी करावी लागणार दोन दिवस प्रतीक्षा जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे तर २० डिसेंबरला प्रत्येक तालुकास्तरावर मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे गावचा पुढारी आणि सदस्य कोण हे जाणून घेण्यासाठी गावकऱ्यांना दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

भूमिपूजन व राजकीय कार्यक्रमांना ब्रेक - निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या तारखेपासून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या सभा,  बैठका, भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमांना ब्रेक लागला आहे. मंडई उत्सवातून संपर्क- जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवाळीनंतर मंडई उत्सवाला सुरुवात होते. सध्या मंडई उत्सव जोरात सुरू असून याच दरम्यान  ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने मंडई उत्सवाच्या माध्यमातून भावी उमेदवार जनसंपर्क वाढवित असल्याचे चित्र  ग्रामीण भागात दिसून येत आहे. भाऊ रामरामला झाली सुरुवात - ग्रामपंचायत निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे. भावी उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भावी उमेदवारांनी भाऊ रामराम म्हणण्यास सुरुवात झाली आहे. कधी रामराम न घेणारे आता आर्वजून रामराम घेत आहेत.भावी उमेदवार ॲक्टिव्ह मोडवर- ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भावी उमेदवारांनी सर्वप्रथम मतदार याद्या गोळा करून आपल्या वॉर्डात किती मतदार आहेत. यापैकी किती जणांचे मतदान आपल्याला मिळू शकते याचा अंदाज घेत सरपंच की सदस्य  पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा याची तयारी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. गुरुवारी तहसील कार्यालयात  ग्रामपंचायत  क्षेत्रातील मतदारांच्या याद्या घेण्यासाठी भावी उमेदवारांची गर्दी दिसून आली. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक