शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

‘पाणी समस्या’ करणार शासनाच्या दाव्याची ‘पोल खोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 22:16 IST

यावर्षी पावसाने दगा दिल्याने सर्वांनाच यावर्षी भीषण पाणी समस्येचे संकट सासावे लागेल, याची शक्यता आतापासूनच दिसून येत आहे. अशात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांवर सर्वांची नजर राहणार आहे.

ठळक मुद्दे२ हजार ८६४ कामे पूर्ण : जलयुक्त शिवार योजनेवर कोट्यवधींचा खर्च

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यावर्षी पावसाने दगा दिल्याने सर्वांनाच यावर्षी भीषण पाणी समस्येचे संकट सासावे लागेल, याची शक्यता आतापासूनच दिसून येत आहे. अशात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांवर सर्वांची नजर राहणार आहे. या अभियानातून साकार झालेल्या कामांतून जर पाणी समस्येवर तोडगा काढता येईल तर ठीक, अन्यथा यावर्षीची ‘पाणी समस्या’ शासनाने केलेल्या दाव्याची निश्चितच ‘पोल खोल’ करणारी ठरणार आहे.जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. तसेच मे महिन्यासारखी उन्ह तापत आहे. तीव्र उकाड्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. अशात कृषी विभागाच्यावतीने सन २०१६-१७ मध्ये २० हजार ५१४.५६ टीएमसी पाणी संग्रह क्षमतेचे क्षेत्र जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तयार करण्यात आल्याची हमी दिली जात आहे. परंतु जर पाणीच उपलब्ध नाही तर एवढ्या मोठ्या रकमेच्या खर्चाच्या उपयोगितेवर संशय व्यक्त केला जात आहे.विशेष म्हणजे, जलयुक्त शिवार अभियानात आर्थिक वर्ष २०१६-१७ दरम्यान कृषी विभागाने एक हजार ८४९, लघू पाटबंधारे विभाग जि.प.ने २१२, लघू पाटबंधारे (जलसंधारण) विभागाने ३१, वन विभागाने ५१२ व पंचायत समितीने १५८ जलयुक्त शिवारच्या कामांना मंजूर केले. मंजूर करण्यात आलेल्या ७७ गावांच्या दोन हजार ७७२ कामांपैकी दोन हजार ४८६ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. आता १८० कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांवर ८०.५६ कोटी रूपये खर्च करण्याची तरतूद असून आतापर्यंत ३२.५१ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.याशिवाय जिल्ह्यातील ६३ गावांमध्ये सन २०१७-१८ दरम्यान जलयुक्त शिवार योजनेत दोन हजार १८६ कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यावर ८७.४६ कोटी रूपये खर्च करण्याची तरतूद आहे. प्रत्यक्षात ३७८ कामे पूर्ण झालेली आहेत व आतापर्यंत १.९० कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. उर्वरित कामे शक्यतो पावसाळ्यानंतर सुरू होऊ शकतात. या योजनेच्या उपयोगितेवर शेतकरी संशय व्यक्त करीत आहेत. या योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे बोलले जात आहेत. कृषी विभागाचे अधिकारीसुद्धा ‘माहितीचा अधिकार’ कार्यकर्त्यांकडून त्रस्त झाले आहेत.आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ७०० मिमी. पाऊस झाला आहे. हे अत्यल्प आहे. परंतु काही ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेमुळे जलसंग्रह झालेला आहे व याचा लाभ भातपिकांना झालेला आहे. परंतु जसा लाभ मिळायला हवा होता, पावसाच्या अभावाने मिळू शकला नाही.-अनिल इंगळे,जिला अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया.