शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

‘पाणी समस्या’ करणार शासनाच्या दाव्याची ‘पोल खोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 22:16 IST

यावर्षी पावसाने दगा दिल्याने सर्वांनाच यावर्षी भीषण पाणी समस्येचे संकट सासावे लागेल, याची शक्यता आतापासूनच दिसून येत आहे. अशात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांवर सर्वांची नजर राहणार आहे.

ठळक मुद्दे२ हजार ८६४ कामे पूर्ण : जलयुक्त शिवार योजनेवर कोट्यवधींचा खर्च

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यावर्षी पावसाने दगा दिल्याने सर्वांनाच यावर्षी भीषण पाणी समस्येचे संकट सासावे लागेल, याची शक्यता आतापासूनच दिसून येत आहे. अशात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांवर सर्वांची नजर राहणार आहे. या अभियानातून साकार झालेल्या कामांतून जर पाणी समस्येवर तोडगा काढता येईल तर ठीक, अन्यथा यावर्षीची ‘पाणी समस्या’ शासनाने केलेल्या दाव्याची निश्चितच ‘पोल खोल’ करणारी ठरणार आहे.जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. तसेच मे महिन्यासारखी उन्ह तापत आहे. तीव्र उकाड्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. अशात कृषी विभागाच्यावतीने सन २०१६-१७ मध्ये २० हजार ५१४.५६ टीएमसी पाणी संग्रह क्षमतेचे क्षेत्र जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तयार करण्यात आल्याची हमी दिली जात आहे. परंतु जर पाणीच उपलब्ध नाही तर एवढ्या मोठ्या रकमेच्या खर्चाच्या उपयोगितेवर संशय व्यक्त केला जात आहे.विशेष म्हणजे, जलयुक्त शिवार अभियानात आर्थिक वर्ष २०१६-१७ दरम्यान कृषी विभागाने एक हजार ८४९, लघू पाटबंधारे विभाग जि.प.ने २१२, लघू पाटबंधारे (जलसंधारण) विभागाने ३१, वन विभागाने ५१२ व पंचायत समितीने १५८ जलयुक्त शिवारच्या कामांना मंजूर केले. मंजूर करण्यात आलेल्या ७७ गावांच्या दोन हजार ७७२ कामांपैकी दोन हजार ४८६ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. आता १८० कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांवर ८०.५६ कोटी रूपये खर्च करण्याची तरतूद असून आतापर्यंत ३२.५१ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.याशिवाय जिल्ह्यातील ६३ गावांमध्ये सन २०१७-१८ दरम्यान जलयुक्त शिवार योजनेत दोन हजार १८६ कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यावर ८७.४६ कोटी रूपये खर्च करण्याची तरतूद आहे. प्रत्यक्षात ३७८ कामे पूर्ण झालेली आहेत व आतापर्यंत १.९० कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. उर्वरित कामे शक्यतो पावसाळ्यानंतर सुरू होऊ शकतात. या योजनेच्या उपयोगितेवर शेतकरी संशय व्यक्त करीत आहेत. या योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे बोलले जात आहेत. कृषी विभागाचे अधिकारीसुद्धा ‘माहितीचा अधिकार’ कार्यकर्त्यांकडून त्रस्त झाले आहेत.आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ७०० मिमी. पाऊस झाला आहे. हे अत्यल्प आहे. परंतु काही ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेमुळे जलसंग्रह झालेला आहे व याचा लाभ भातपिकांना झालेला आहे. परंतु जसा लाभ मिळायला हवा होता, पावसाच्या अभावाने मिळू शकला नाही.-अनिल इंगळे,जिला अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया.