शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

‘पाणी समस्या’ करणार शासनाच्या दाव्याची ‘पोल खोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 22:16 IST

यावर्षी पावसाने दगा दिल्याने सर्वांनाच यावर्षी भीषण पाणी समस्येचे संकट सासावे लागेल, याची शक्यता आतापासूनच दिसून येत आहे. अशात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांवर सर्वांची नजर राहणार आहे.

ठळक मुद्दे२ हजार ८६४ कामे पूर्ण : जलयुक्त शिवार योजनेवर कोट्यवधींचा खर्च

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यावर्षी पावसाने दगा दिल्याने सर्वांनाच यावर्षी भीषण पाणी समस्येचे संकट सासावे लागेल, याची शक्यता आतापासूनच दिसून येत आहे. अशात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांवर सर्वांची नजर राहणार आहे. या अभियानातून साकार झालेल्या कामांतून जर पाणी समस्येवर तोडगा काढता येईल तर ठीक, अन्यथा यावर्षीची ‘पाणी समस्या’ शासनाने केलेल्या दाव्याची निश्चितच ‘पोल खोल’ करणारी ठरणार आहे.जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. तसेच मे महिन्यासारखी उन्ह तापत आहे. तीव्र उकाड्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. अशात कृषी विभागाच्यावतीने सन २०१६-१७ मध्ये २० हजार ५१४.५६ टीएमसी पाणी संग्रह क्षमतेचे क्षेत्र जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तयार करण्यात आल्याची हमी दिली जात आहे. परंतु जर पाणीच उपलब्ध नाही तर एवढ्या मोठ्या रकमेच्या खर्चाच्या उपयोगितेवर संशय व्यक्त केला जात आहे.विशेष म्हणजे, जलयुक्त शिवार अभियानात आर्थिक वर्ष २०१६-१७ दरम्यान कृषी विभागाने एक हजार ८४९, लघू पाटबंधारे विभाग जि.प.ने २१२, लघू पाटबंधारे (जलसंधारण) विभागाने ३१, वन विभागाने ५१२ व पंचायत समितीने १५८ जलयुक्त शिवारच्या कामांना मंजूर केले. मंजूर करण्यात आलेल्या ७७ गावांच्या दोन हजार ७७२ कामांपैकी दोन हजार ४८६ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. आता १८० कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांवर ८०.५६ कोटी रूपये खर्च करण्याची तरतूद असून आतापर्यंत ३२.५१ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.याशिवाय जिल्ह्यातील ६३ गावांमध्ये सन २०१७-१८ दरम्यान जलयुक्त शिवार योजनेत दोन हजार १८६ कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यावर ८७.४६ कोटी रूपये खर्च करण्याची तरतूद आहे. प्रत्यक्षात ३७८ कामे पूर्ण झालेली आहेत व आतापर्यंत १.९० कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. उर्वरित कामे शक्यतो पावसाळ्यानंतर सुरू होऊ शकतात. या योजनेच्या उपयोगितेवर शेतकरी संशय व्यक्त करीत आहेत. या योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे बोलले जात आहेत. कृषी विभागाचे अधिकारीसुद्धा ‘माहितीचा अधिकार’ कार्यकर्त्यांकडून त्रस्त झाले आहेत.आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ७०० मिमी. पाऊस झाला आहे. हे अत्यल्प आहे. परंतु काही ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेमुळे जलसंग्रह झालेला आहे व याचा लाभ भातपिकांना झालेला आहे. परंतु जसा लाभ मिळायला हवा होता, पावसाच्या अभावाने मिळू शकला नाही.-अनिल इंगळे,जिला अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया.