शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 22:06 IST

भंडारा-गोंदिया हे दोन्ही जिल्हे धान उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जाते. पारंपारीक धान शेती टिकविण्यासाठी या जिल्ह्यातील शेतकरी राब-राब राबून खरीप आणि रब्बी हंगामात धान पिकाची लागवड करतात. मात्र केंद्र सरकारने नुकतेच विविध पिकांचे हमीभाव जाहीर केले.

ठळक मुद्देहमीभावात केवळ ८५ रुपयांची वाढ। शेतकऱ्यांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : भंडारा-गोंदिया हे दोन्ही जिल्हे धान उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जाते. पारंपारीक धान शेती टिकविण्यासाठी या जिल्ह्यातील शेतकरी राब-राब राबून खरीप आणि रब्बी हंगामात धान पिकाची लागवड करतात. मात्र केंद्र सरकारने नुकतेच विविध पिकांचे हमीभाव जाहीर केले. त्यात धानाच्या हमीभावात केवळ ८५ रुपयांनी वाढ करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे.उत्पादन खर्चाच्या दीडपट आधारभूत हमीभाव देण्याची घोषणा हवेतच विरली असून लागवड खर्चाच्या तुलनेत धानाच्या हमीभावात क्विंटल मागे ८५ रुपये वाढवून शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर आणि शेतीनिष्ठ शेतकरी विनोद गहाणे यांनी केला आहे. निवडणुकापूर्वी शासनाने शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करुन हरितक्रांतीचे दिवास्वप्ने दाखवून शासनाने शेतकºयांची दिशाभूल केली आहे.सन २०१६-१७ या वर्षात प्रती क्विंटल मागे २०० रुपयाने वाढ करुन दिली होती. त्यावेळेस निवडणुका पुढे होत्या आता निवडणुका संपताच धानाच्या हमी भावात फक्त ८५ रुपयांनी वाढ करुन धान उत्पादक शेतकºयांची थट्टा केली आहे. वास्तविक पूर्वी जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा आताचे दर वाढवून देणे अपेक्षीत होते. पुर्वीच्या हमीभाव दरापेक्षा नुकत्याच जाहीर केलेल्या धानाच्या भावात कमी दर असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती असंतोषाची भावना निर्माण होत आहे.सध्याच्या खताच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याप्रमाणात धानाचे भाव कमी आहेत. त्यामुळे धानाची लागवड करणे परवडणारे सारखे राहिले नाही. पारंपारीक धान शेती सोडण्याच्या मार्गावर आहेत.याकडे शासनाने लक्ष देवून धानाचे हमीभाव प्रती क्विंटल मागे ५०० रुपयाने वाढविण्याची मागणी शेतीनिष्ठ शेतकरी गहाणे यांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी