शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 00:19 IST

मागच्या वर्षी देवरी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट होते. शासनाला मदत मागण्याकरीता ककोडी व इस्तारी

सहेषराम कोरोटे : ईस्तारी येथे क्लोज प्रौढ कबड्डी स्पर्धा व समाजप्रबोधन देवरी : मागच्या वर्षी देवरी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट होते. शासनाला मदत मागण्याकरीता ककोडी व इस्तारी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी पदयात्रा मोर्चा व शेतकरी मेळावा घेवून शासनातील विविध लोकप्रतिनिधींना आपल्या समस्यांबाबत निवेदन देऊन समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली होती. शासनाने दुष्काळ निधी घोषीत केला, परंतु ती निधीची रक्कम अजूनपर्यंत या कोणत्याही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ही घोषणा अद्याप पूर्ण न करता आता केंद्र सरकारने उत्तर प्रदेशातील निवडणुकीपूर्वी त्या प्रदेशातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. मग त्याच धरतीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे त्वरीत पूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहेषराम कोरोटे यांनी केली. तालुक्यातील ईस्तारी येथे आदिवासी गोंड समाज सेवा भावी संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त आयोजित क्लोज प्रौढ कबड्डी स्पर्धा व समाज प्रबोधन कार्यक्रमात ते उद्घाटनपर भाषण करीत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य मोतीराम सयाम होते. याप्रसंगी ईस्तारीचे सरपंच राजकुमार अटभैय्या, पोलीस पाटील अनिता अंबादे, पुर्व गोंड समाजाचे अध्यक्ष बिसराम सलामे, ककोडीचे सरपंच रियाजखान पठाण, चैनसिंग मडावी, बळीराम कोटवार, उपसरपंच जिवनलाल सलामे, पोलीस पाटील मीरा कुंभरे, भवर समाजाचे सचिव प्रकाश गंगाकाचूर, ग्रा.पं.सदस्य महेश बंसोड, मनोहर वालदे, पोअरसिंग आराम, डुकालू ताराम, रघु नरेटी, तुकाय ताराम, चंपा ताराम यांच्यासह ककोडी, ईस्तारी, मिसपीरी, गणूटोला परिसरातील समाजातील बहुसंख्य महिला, पुरूष, युवक व कबड्डी खेळाची चमू उपस्थित होताी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुलाराम कुमेटी यांनी तर मंच संचालन कुंजीलाल नरेटी यांनी केले. उपस्थितांचे आभार मोहन हियामी यांनी मानले. या बाबुराव हिळको, उपाध्यक्ष पुलाराम नरेटी, सचिव मोहन हियामी, सहसचिव मानकर, कुंभरे, कोषाध्यक्ष दुरूराम ताराम, प्रकाश गंगाकपूर, युवा अध्यक्ष संतोष नेताम, चंपा ताराम व सखाराम कोरेटी यांच्यासह या संस्थेचे इतर पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)