शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

शासन निर्णयाचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: May 13, 2016 01:51 IST

शासनाच्या कार्यपद्धतीची माहिती व सार्वजनिक बाबी कशा हाताळल्या जातात, याची माहिती नागरिकांना व्हावी,

मस्के यांचा आरोप: वसतिगृहाच्या गृहपालाने दिली अपूर्ण माहितीदेवरी : शासनाच्या कार्यपद्धतीची माहिती व सार्वजनिक बाबी कशा हाताळल्या जातात, याची माहिती नागरिकांना व्हावी, याकरिता माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा पारित केला. तरी शासन यंत्रणा उदासीन असून माहिती देण्यास अर्जदाराची दिशाभूल व टाळाटाळ करण्याचे काम शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृहातील गृहपाल (नवीन) यांच्याकडून करण्यात आल्याचे दिसून येते.सविस्तर असे की, आर.टी.आय. कार्यकर्ते भूपेंद्र मस्के यांनी शासन निर्णय संबंधीच्या एकूण सात मुद्यांची सन दिनांक ११ नोव्हेंबर २०११ च्या परिशीष्ट अ,ब,क ची माहिती मिळणेबाबद या शासन निर्णय संबंधीच्या एकूण सात मुद्यांची सन २०१३ ते २०१५ या कालावधीची माहिती मिळण्यासंबंधीचा अर्ज २ जानेवारी रोजी केला होता. मागितलेल्या माहितीमध्ये एकापेक्षा अधिक मुद्दे असल्याने प्रत्येक मुद्यासंबंधी स्वतंत्र अर्ज करण्यासंबंधी गृहपाल यांनी सुचवले होते. यावर अर्जदाराचे समाधान न झाल्यामुळे ६ फेबु्रवारी रोजी येथील प्रकल्प अधिकारी/ एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडे प्रथम अपील सादर केली. सदर अपिलाची सुनावनी २१ मार्च ठेवण्यात आली. यामध्ये झालेल्या चर्चेनुसार अपिलार्थी यांना त्यांना अर्जानुसार मागविण्यात आलेली माहिती २० मार्च पर्यंत पुरविण्याचे आदेश प्रथम अपिलीय अधिकारी मीनाक्षी उन्हाळे यांनी दिले. मात्र २२ एप्रिल रोजी मस्के यांना माहिती मिळाली ती माहिती अपूर्ण असून शासन निर्णयाची दिशाभूल करणारी आहे. मुद्देनिहाय मागितलेल्या माहितीत वस्तीगृहातील अद्ययावत ग्रंथालयाच्या पुस्तकांच्या सुचीऐवजी देयके व पोचपावती जोडलेली आहे. संगणक व प्रिंटरची संख्या यांची माहिती दिलीच नाही. शासन निर्णयानुसार शासकीय वसतीगृहामध्ये १० विद्यार्थ्यांसाठी १ संगणक इंटरनेट सुविधेसह उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आहेत. शिवाय स्नेह सम्मेलनाचा अहवाल व देयके त्यांनी उपलब्ध करुन दिली नाही. शासन निर्णयानुसार प्रति शासकीय वसतीगृह २५ हजार रूपयांची तरतुद केलेली आहे. छत्री, रेनकोट, गमबूट यांच्या नोंदी असलेल्या वह्यांच्या प्रति सुद्धा मिळालेल्या नाहीत. शासन निर्णयानुसार ५०० रूपयांची तरतूद केलेली आहे. क्रीडा साहित्यांची खरेदी प्रक्रिया नाही. जेवणाबाबदच्या अभिप्राय नोंद वहीत कुठलाही अभिप्राय नसतांना विद्यार्थी व गृहपालाच्या सह्या दिसून येतात. आजारी मुलांची नोंदवही व जडवस्तू संग्रह नोंद वही यांच्या साक्षांकित प्रति उपलब्ध करुन दिल्या नाही. संगणक शिक्षक व रोजंदारी कर्मचारी यांची देयके उपलब्ध करुन दिलेली नाही.प्राप्त माहितीवरुन असे दिसून येते की, शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृहात (नवीन) व विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये सुसूत्रता दिसून येत नाही. सदर शासन निर्णय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये सुसूत्रता आपल्याकरिता काढण्यात आलेला होता. यात वरिष्ठ कार्यालयीन अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचे निष्पन्न होते. सदर प्रकरणामध्ये अपिलीकरिता प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्यांनी आदेशामध्ये कुठलेही लेखी कारण नमूद न करता अपिलसाठी ४५ दिवस घेतले यावरुन माहितीच्या अधिकार संबंधाने प्रशासकीय यंत्रणा किती कर्तव्यदक्ष आहे हे दिसून येते.चार महिन्यांचा कालावधी लोटूनही अर्जदाराला परिपूर्ण माहिती मिळाली नाही. अर्जदाराला नाहक शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. सदर प्रकरणात न्यायासाठी द्वितीय अपिलीकरिता अर्ज राज्य माहिती आयोग नागपूर यांना करुन स्थानिक आमदार संजय पुराम व आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना प्रकरणाची गंभीरता लक्षात आणून देऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचा मानस मस्के यांनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)