शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

कर्मचाऱ्यांच्या संपाने सरकारी कार्यालये ठप्प

By admin | Updated: September 2, 2016 23:58 IST

केंद्र आणि राज्य शासनामध्ये नवीन सरकार येऊनही पूर्वीच्याच सरकारची धोरणे राबवित आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : हजारो कर्मचाऱ्यांचा संपात सहभागगोंदिया : केंद्र आणि राज्य शासनामध्ये नवीन सरकार येऊनही पूर्वीच्याच सरकारची धोरणे राबवित आहेत. कामगार कायद्यात बदल करण्याच्या नावावर कर्मचाऱ्यांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत असा आरोपी करीत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वात विविध कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन शुक्रवारी (दि.२) एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. यामुळे सुटीचा दिवस नसतानाही सरकारी कार्यालयांमध्ये सुटीप्रमाणे चित्र दिसत होते.सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मैदानावर एकत्र झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सहसचिव लिलाधर पाथोडे यांनी संबोधित केले. भांडवलदारांसाठी पोषक व मालक धार्जिणे कायदे करण्यात येत आहेत. रेल्वे, संरक्षण, वित्तीय संस्थांमध्ये अमर्याद विदेशी गुंतवणूक, भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा या योजनांमध्ये बदल करण्यात येत आहे, हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी कर्मचारी नेत्यांनी दिला.या आंदोलनाचे नेतृत्व राज्य सरचिटणीस लिलाधर पाथोडे यांच्यासह कार्याध्यक्ष एम.सी. चुऱ्हे, पी.जी. शहारे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षित, आनंद पुंजे, संजय धार्मिक, विठ्ठल भरणे, वनरक्षक वनपाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष एल.एस. भुते, प्रा.ज्योतिक ढाले, लिलाधर जसूजा, आर.आर. मिश्रा, लिलाधर तिबुडे, नरेंद्र रामटेककर, सुलभा खाडे आदींनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)कार्यालयात शुकशुकाट\कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा लाक्षणिक संप असल्याने शुक्रवारी जिल्ह्यातील बहुतांश सरकारी कार्यालयात शुकशुकाट होता. तान्हा पोळा (मारबत)चा दिवस असल्याने नागरिकांनी सरकारी कार्यालय गाठले नाही. अनेक नागरिकांनी तर आज सरकारी सुटी असल्याचे समजून कार्यालयाकडे फिरकणेच टाळले. काही जण आले, पण कार्यालय उघडे असले तरी एखादा कोणीही वगळता कोणीही कर्मचारी-अधिकारी कार्यालयात नव्हते.अशा आहेत प्रमुख मागण्याया आंदोलनात विविध मागण्यांचा समावेश होता. त्यात सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी व ६ टक्के महागाई भत्ता १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात यावा, जुनी पेंशन योजना सर्वांना लागू करावी, केंद्राप्रमाणे वाहतूक भत्ता, शैक्षणिक भत्ता, हॉस्टेल भत्ता कर्मचाऱ्यांना लागू करावा, राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे, उत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी पूर्ववत कराव्या, २ वर्षाची बालसंगोपण रजा मंजूर करावी, ५ दिवसांचा आठवडा करण्यात यावा, अश्या विविध ३० मागण्यांचा समावेश होता.