शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

शासकीय कर्मचाऱ्यांनो, रेशनचा लाभ घेऊ नका; नाहीतर नियमानुसार होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 16:21 IST

७२ टक्के सीधापत्रीका धारकांनी केली केवायसी पूर्ण : रेशनकार्डही होते रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्वस्त धान्याचा लाभ गरिबांना असतो. कोणताही शासकीय कर्मचारी या धान्याचा लाभ घेऊ शकत नाही. शासकीय कर्मचारी स्वस्त धान्याचा लाभघेत असेल आणि ते निदर्शनास आले तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यात २ लाख ३४४६४ रेशनकार्डधारक आहेत. यापैकी आतापर्यंत ७२.५७ कार्डधारकांनी 'केवायसी' पूर्ण केली असून, उर्वरित कार्डधारकांनी केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने दर महिन्याला स्वस्त धान्य लाभार्थ्यांची तपासणी केली जाते. एखाद्या लाभार्थ्यांचे निधन झाले असेल तर त्याचे नाव त्यातून वगळण्यात येते. याचबरोबर स्वस्त धान्य दुकानदारांना कळविण्यात येते. यासाठी काही ठरावीक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकही कर्मचारी स्वस्त धान्याचा लाभ घेत नाही.

रेशनकार्डधारकांनो ईकेवायसी करास्वस्त धान्य दुकानातून धान्याची उचल करण्यासाठी रेशनकार्डधारकांना २८ फेब्रुवारीपूर्वी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. आतापर्यंत ७२.५७टक्के रेशनकार्डधारकांनी ईकेवायसी पूर्ण केली. तर अद्यापही २८ टक्के रेशनकार्डधारक शिल्लक असून त्यांनी या तारखेपूर्वी ईकेवायसी करून घ्यावी अन्यथा त्यांना रेशनकार्डवरून लाभ घेता येणार नाही असे जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा पुरवठा अधिकारी सतीश अगडे व सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

केवायसीबाबत सूचना केलीरेशनकार्डधारकांनी केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत ७लाख २० हजार २३७ जणांनी केवायसी पूर्ण केली आहे. शासनाकडून जशा सूचना येतील, त्याप्रमाणे त्याचे पालनही केले जाते. धान्य मिळत नसल्यास त्याबाबत पुरवठा विभागाला कळवावे.

२७२०६ जणांचे कार्ड रद्दगोंदिया जिल्ह्यात सन २०२४ या वर्षात २७२०६ जणांचे रेशन कार्ड विविध कारणांनी रद्द करण्यात आले आहेत.

रेशनकार्डधारकांचे रेशन बंद होणारकेवायसी नसेल तर रेशन देणे शक्य होणार नाही. नववर्षात ३ लाख ३८ हजार ८९७ जणांचे 'केवायसी' अभावी रेशन बंद होऊ शकते, असे जानेवारी महिन्यात कळविले आहे. तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्यांची 'केवायसी' लवकरात लवकर करून घ्यावी. काही अडचण असेल तर तसे पुरवठा विभागाला कळवावे.

"स्वस्त धान्याचा कोणत्याही कर्मचाऱ्याला लाभ घेता येत नाही. हे धान्य केवळ गरिबांसाठी आहे. एवढ्यावरही कोणी स्वस्त धान्य घरात आणत असेल तर नियमानुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते."- सतीष अगडे, जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :gondiya-acगोंदिया