शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
4
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
5
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
6
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
7
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
8
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
9
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
10
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
11
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
12
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
13
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
14
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
15
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
16
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
17
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
18
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
19
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
20
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?

रेती माफियांकडून ६.७४ कोटींचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

जिल्हा पोलीस विभागामार्फत जिल्ह्यातील अवैध रेती वाहतूक मोडीस काढण्याच्या दृष्टीने गुन्हे नोंद करण्यासोबतच महसूली कारवाई करण्यात येत आहे. अवैध रेती वाहतूक प्रकरणातील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व त्यांच्या वाहतुकीच्या वेळेचा अभ्यास करून पोलीस अधीक्षकांनी विशेष पथकामार्फत तसेच स्थानिक पोलीस ठाणे स्तरावर चालू वर्षात १०३ गुन्हे दाखल करविले आहेत. त्यांच्याकडून सहा कोटी ७४ लाख ५७ हजार ४०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हा पोलिसांची कारवाई : १०३ गुन्ह्यात १८५ जणांना केले अटक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रेती घाटांचा लिलाव न झाल्यामुळे गरज पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत आहे. अशात रेतीची चोरी करणाऱ्यांवर साडे सहा महिन्यांत १०३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात १८५ आरोपींना रेती चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.या रेती माफियांकडून जिल्हा पोलिसांनी सहा कोटी ७४ लाख ५७ हजार ४०० रूपयांचा माल जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी दिली आहे.जिल्हा पोलीस विभागामार्फत जिल्ह्यातील अवैध रेती वाहतूक मोडीस काढण्याच्या दृष्टीने गुन्हे नोंद करण्यासोबतच महसूली कारवाई करण्यात येत आहे. अवैध रेती वाहतूक प्रकरणातील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व त्यांच्या वाहतुकीच्या वेळेचा अभ्यास करून पोलीस अधीक्षकांनी विशेष पथकामार्फत तसेच स्थानिक पोलीस ठाणे स्तरावर चालू वर्षात १०३ गुन्हे दाखल करविले आहेत. त्यांच्याकडून सहा कोटी ७४ लाख ५७ हजार ४०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.रेती चोरून नेणारे ट्रॅक्टर चालक आपल्यावर कारवाई होऊ नये तसेच आपण पोलीस किंवा महसूल विभागाच्या हातात लागू नये यासाठी आपले वाहन भरधाव वेगाने हाकून रेती चोरी करतात. परंतु भरधाव वेगात वाहन चालविण्याच्या नादात मोठ्या प्रमाणात अपघात होतात. या अपघातांमध्ये अनेकांचा नाहक बळी जातो.हे प्रकार घडू नयेत व रेती चोरून नेणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करता यावी यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी रेती घाटाजवळ वाहतूक मार्गावर चर खोदून ठेवले आहे. यातून वाहतुकीस अडथळा निर्माण केला जातोे.घाट लिलाव न झाल्यानेच होते चोरीजिल्ह्यातील रेती घाटांचा लिलावच न झाल्याने घरकुलांचे काम कसे करावे हा प्रश्न लोकांपुढे आहे. आपल्या घराचे काम पूर्ण करण्याकरिता रेतीसाठी अव्वाचे सव्वा पैसे मोजण्याची तयारी लोकांची दिसून येते. त्यामुळे अधिक नफा कमविण्यासाठी रेती माफीयांकडून अवैधरित्या रेतीचा उपसा केला जातो. परिणामी यात अनेक महसूल अधिकाऱ्यांचे हात ओले होतात. परिणामी कारवाई झालीच तर थातूर- मातूर केली जाते. जिल्हा प्रशासनाने यंदा रेतीच्या घाटाचे लिलाव न केल्यामुळे कोट्यवधीचा महसूल बुडाला आहे. घाट लिलाव झाले नाही त्यामुळे रेती चोरीचे प्रमाण वाढले. परिणामी चोरीच्या रेतीचे दरही गगणाला भिडले आहेत.रस्त्यांची वाताहतरेती चोरांकडून कच्च्या रस्त्यानेही जड वाहतूक केली जाते. परिणामी ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडतात. एक खड्डा वाचविण्याच्या नादात आपला तोल दुसऱ्या खड्यात जातो. परिणामी दुचाकी चालकांचेही त्या रस्त्याने जातांना अपघात होतात. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेती अवैधरित्या वाहून नेली जात आहे. पावसाळा सुरू झाला असला तरी जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस न आल्यामुळे आताही रेती चोरी सुरूच आहे.

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया