शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

रेती माफियांकडून ६.७४ कोटींचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

जिल्हा पोलीस विभागामार्फत जिल्ह्यातील अवैध रेती वाहतूक मोडीस काढण्याच्या दृष्टीने गुन्हे नोंद करण्यासोबतच महसूली कारवाई करण्यात येत आहे. अवैध रेती वाहतूक प्रकरणातील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व त्यांच्या वाहतुकीच्या वेळेचा अभ्यास करून पोलीस अधीक्षकांनी विशेष पथकामार्फत तसेच स्थानिक पोलीस ठाणे स्तरावर चालू वर्षात १०३ गुन्हे दाखल करविले आहेत. त्यांच्याकडून सहा कोटी ७४ लाख ५७ हजार ४०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हा पोलिसांची कारवाई : १०३ गुन्ह्यात १८५ जणांना केले अटक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रेती घाटांचा लिलाव न झाल्यामुळे गरज पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत आहे. अशात रेतीची चोरी करणाऱ्यांवर साडे सहा महिन्यांत १०३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात १८५ आरोपींना रेती चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.या रेती माफियांकडून जिल्हा पोलिसांनी सहा कोटी ७४ लाख ५७ हजार ४०० रूपयांचा माल जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी दिली आहे.जिल्हा पोलीस विभागामार्फत जिल्ह्यातील अवैध रेती वाहतूक मोडीस काढण्याच्या दृष्टीने गुन्हे नोंद करण्यासोबतच महसूली कारवाई करण्यात येत आहे. अवैध रेती वाहतूक प्रकरणातील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व त्यांच्या वाहतुकीच्या वेळेचा अभ्यास करून पोलीस अधीक्षकांनी विशेष पथकामार्फत तसेच स्थानिक पोलीस ठाणे स्तरावर चालू वर्षात १०३ गुन्हे दाखल करविले आहेत. त्यांच्याकडून सहा कोटी ७४ लाख ५७ हजार ४०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.रेती चोरून नेणारे ट्रॅक्टर चालक आपल्यावर कारवाई होऊ नये तसेच आपण पोलीस किंवा महसूल विभागाच्या हातात लागू नये यासाठी आपले वाहन भरधाव वेगाने हाकून रेती चोरी करतात. परंतु भरधाव वेगात वाहन चालविण्याच्या नादात मोठ्या प्रमाणात अपघात होतात. या अपघातांमध्ये अनेकांचा नाहक बळी जातो.हे प्रकार घडू नयेत व रेती चोरून नेणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करता यावी यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी रेती घाटाजवळ वाहतूक मार्गावर चर खोदून ठेवले आहे. यातून वाहतुकीस अडथळा निर्माण केला जातोे.घाट लिलाव न झाल्यानेच होते चोरीजिल्ह्यातील रेती घाटांचा लिलावच न झाल्याने घरकुलांचे काम कसे करावे हा प्रश्न लोकांपुढे आहे. आपल्या घराचे काम पूर्ण करण्याकरिता रेतीसाठी अव्वाचे सव्वा पैसे मोजण्याची तयारी लोकांची दिसून येते. त्यामुळे अधिक नफा कमविण्यासाठी रेती माफीयांकडून अवैधरित्या रेतीचा उपसा केला जातो. परिणामी यात अनेक महसूल अधिकाऱ्यांचे हात ओले होतात. परिणामी कारवाई झालीच तर थातूर- मातूर केली जाते. जिल्हा प्रशासनाने यंदा रेतीच्या घाटाचे लिलाव न केल्यामुळे कोट्यवधीचा महसूल बुडाला आहे. घाट लिलाव झाले नाही त्यामुळे रेती चोरीचे प्रमाण वाढले. परिणामी चोरीच्या रेतीचे दरही गगणाला भिडले आहेत.रस्त्यांची वाताहतरेती चोरांकडून कच्च्या रस्त्यानेही जड वाहतूक केली जाते. परिणामी ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडतात. एक खड्डा वाचविण्याच्या नादात आपला तोल दुसऱ्या खड्यात जातो. परिणामी दुचाकी चालकांचेही त्या रस्त्याने जातांना अपघात होतात. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेती अवैधरित्या वाहून नेली जात आहे. पावसाळा सुरू झाला असला तरी जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस न आल्यामुळे आताही रेती चोरी सुरूच आहे.

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया