शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

गूड न्यूज: गोंदियाला मिळाला यलो अलर्ट, गुरूवारी पावसाचे पुनरागमन

By कपिल केकत | Updated: August 17, 2023 19:14 IST

पावसामुळे वातावरणात गारवा

कपिल केकत, गोंदिया: मागील दहा-बारा दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचेही टेन्शन वाढले आहे. मात्र, गुरूवारी (दि. १७) पावसाचे पुनरागमन झाल्याने दिलासा मिळाला. त्यातच शुक्रवारपासून (दि. १८) पुढचे चार दिवस गोंदिया जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

४ ऑगस्टपर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली व ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यासारखा अनुभव येऊ लागला होता. पावसाने दडी मारल्यामुळे सर्वसामान्यांचा चिंता वाढली असतानाच शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. पाऊस नसल्यामुळे उकाडा प्रचंड वाढला होता. सर्वांनाच पावसाची गरज भासत होती. अशात गुरूवारी (दि. १७) पावसाचे पुनरागमन झाले व दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली.

विशेष म्हणजे, हवामान विभागाने शुक्रवारपासून येत्या सोमवारपर्यंत जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ दिला आहे. या काळात जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात आतापर्यंत ६९५.३ मिमी पाऊस बरसला आहे. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये सरासरी ३८२ मिमी पावसाची तूट आहे. आता हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे मुसळधार पाऊस झाल्यास ही तूट भरून निघू शकते.

पिकांना मिळणार जीवदान

मागील सुमारे पंधरवड्यापासून जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतजमिनीला तडा गेला आहे. त्यात प्रखर ऊन तापत असल्यामुळे पिके सुकण्याच्या स्थितीत आली आहेत. असे झाल्यास मात्र शेतकरी पार मोडून जाणार आहे. मात्र, गुरूवारच्या पावसाने त्यांना दिलासा मिळाला. शुक्रवारपासून पावसाने दमदार हजेरी लावली तर मात्र पिकांना जीवदान मिळणार व शेतकरी हसणार.

टॅग्स :Rainपाऊस