शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

गूड न्यूज: गोंदियाला मिळाला यलो अलर्ट, गुरूवारी पावसाचे पुनरागमन

By कपिल केकत | Updated: August 17, 2023 19:14 IST

पावसामुळे वातावरणात गारवा

कपिल केकत, गोंदिया: मागील दहा-बारा दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचेही टेन्शन वाढले आहे. मात्र, गुरूवारी (दि. १७) पावसाचे पुनरागमन झाल्याने दिलासा मिळाला. त्यातच शुक्रवारपासून (दि. १८) पुढचे चार दिवस गोंदिया जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

४ ऑगस्टपर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली व ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यासारखा अनुभव येऊ लागला होता. पावसाने दडी मारल्यामुळे सर्वसामान्यांचा चिंता वाढली असतानाच शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. पाऊस नसल्यामुळे उकाडा प्रचंड वाढला होता. सर्वांनाच पावसाची गरज भासत होती. अशात गुरूवारी (दि. १७) पावसाचे पुनरागमन झाले व दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली.

विशेष म्हणजे, हवामान विभागाने शुक्रवारपासून येत्या सोमवारपर्यंत जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ दिला आहे. या काळात जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात आतापर्यंत ६९५.३ मिमी पाऊस बरसला आहे. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये सरासरी ३८२ मिमी पावसाची तूट आहे. आता हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे मुसळधार पाऊस झाल्यास ही तूट भरून निघू शकते.

पिकांना मिळणार जीवदान

मागील सुमारे पंधरवड्यापासून जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतजमिनीला तडा गेला आहे. त्यात प्रखर ऊन तापत असल्यामुळे पिके सुकण्याच्या स्थितीत आली आहेत. असे झाल्यास मात्र शेतकरी पार मोडून जाणार आहे. मात्र, गुरूवारच्या पावसाने त्यांना दिलासा मिळाला. शुक्रवारपासून पावसाने दमदार हजेरी लावली तर मात्र पिकांना जीवदान मिळणार व शेतकरी हसणार.

टॅग्स :Rainपाऊस