शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात सेल्फीच्या नादात दोन तरुणींना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 13:39 IST

बाघ नदीच्या पात्रालगत मैत्रिणीसह सेल्फी घेताना पाय घसल्याने दोन तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.३०) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनर्सिंगचे प्रशिक्षण घेत होत्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बाघ नदीच्या पात्रालगत मैत्रिणीसह सेल्फी घेताना पाय घसल्याने दोन तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.३०) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही तरुणींचे मृतदेह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूच्या मदतीने नदीतून बाहेर काढण्यात आले.मेघा सुखदेव शहारे (२१) रा.खमारी व समता कन्हैयालाल न्यायकरे (२०) रा. गिरोला दासगाव अशी मृत तरुणींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार गोंदियाच्या मरारटोली येथील युवा परिवर्तन संस्थेत नर्सिंगचे प्रशिक्षण घेत असलेल्या समता न्यायकरे, मेघा शहारे यांच्यासह त्यांच्या मैत्रिणी वर्ग सुटल्यानंतर बाघ नदीच्या कोरणी घाटावर फिरायला गेल्या होत्या. समता व मेघा नदीच्या काठावर एका दगडावर उभ्या राहून सेल्फी घेत होत्या.सेल्फी घेतांना दोघींचाही पाय घसरल्याने त्या नदीच्या खोल पाण्यात बुडाल्या. दूर उभ्या असलेल्या त्यांच्या मैत्रिणीनी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे नागरिक गोळा झाले. मात्र नदीत पाणी अधिक असल्याने त्यांचा शोध वेळीच घेता आला नाही.घटनेची माहिती गोंदियाचे तहसीलदार भंडारी व रावणवाडीचे ठाणेदार सचिन सांडभोर यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. दोन्ही विद्यार्थिनीचा शोध घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूची मदत घेण्यात आली. या घटनेमुळे खमारी व गिरोला गावात शोककळा पसरली आहे. रावणवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

धोकादायक स्थळी सेल्फी घेणे टाळाअलीकडे तरुणी-तरुणींमध्ये सेल्फी घेण्याची क्रेज प्रचंड वाढली आहे. नदीच्या काठावर व धरणाजवळ सेल्फी घेण्याच्या नादात अनेकांना जीव सुध्दा गमवावा लागला आहे. यानंतरही याबाबत युवक-युवती धडा घेत नसल्याचे दिसते. धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे टाळावे असा बोर्ड बाघ नदीच्या पात्रालगत सुध्दा लावण्यात आला आहे. मात्र यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

टॅग्स :Selfieसेल्फीDeathमृत्यू