शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियाच्या मायलेकींनी अनुभवले नेपाळमध्ये भूकंपाचे ६० हादरे

By admin | Updated: April 28, 2015 00:58 IST

यात्रा करायला गेलेल्या गोंदियातील मायलेकींनी नेपाळ येथील भूकंपाचे ६० हादरे अनुभवले. नशिब बलवत्तर

६० हादऱ्यांनी जीव टांगणीला : भारतात सुखरूप दाखल, आज गोंदियात पोहोचणारगोंदिया : यात्रा करायला गेलेल्या गोंदियातील मायलेकींनी नेपाळ येथील भूकंपाचे ६० हादरे अनुभवले. नशिब बलवत्तर म्हणऊनच त्यांचा जीव वाचला. जीव मुठीत घेऊन बसलेल्या या मायलेकींसह त्यांच्यासोबतचे यात्रेकरून सुदैवाने भारतात सुखरूप परतले. मात्र तब्बल सात तास गोंदियातील गुप्ता परिवाराच जीव टांगणीला लागला होता. गोंदियातील शशिकांत गिरधरभाई कोटक (७४) यांच्या तीन विवाहित मुली आपापल्या कुटुंबीयांसह नेपाळच्या काठमांडू येथे फिरायला गेल्या होत्या. एक मुलगी छत्तीसगडच्या राजनांदगाव येथील प्रतीक्षा परेश सोनछात्रा (४२), अमरावती येथील राधा अमिषकुमार राजा (४०), अमित राजा (४५) त्यांची मुलगी दिशिता अमिषकुमार राजा (१६), तर गोंदियातील यामिनी विशाल गुप्ता (३८) व खुशी विशाल गुप्ता (७) हे सहा जण २२ एप्रिल रोजी नागपूरवरून गोरखपूरमार्गे काठमांडूसाठी रवाना झाले. २५ रोजी सकाळी दर्शनासाठी गेले असताना त्याचवेळी भूकंपाचे हादरे बसले. त्यावेळी ते स्वत:चा बचाव करीत पहाडीवरून बसच्या सहाय्याने खाली उतरले. त्यांनी ती रात्र मैदानात घालविली. रविवारी ते सकाळी ११ वाजतादरम्यान बसने पोखरा येथून निघाले. सकाळी ते गोरखपूरला आले. आता नागपूरला येण्यासाठी प्रवासातच आहेत. नेपाळ येथे एका-मागून एक असे अनेक हादरे त्यांनी अनुभवले. परिसरातील घर पडलेले काही ठिकाणी मृतदेह मलब्यात अडकलेले असा थरार त्यांनी अनुभवला. नेपाळमध्ये भूकंप आल्याची वार्ता कानी पडताच त्यांच्या नातेवाईकांनी टीव्हीवरील बातम्या सुरू करून नेपाळ येथे गेलेल्या नातेवाईकांना फोन वरून सतत संपर्क केला. कुणी देवाला साकडे घालायचे तर कुणी नवस फेडण्याची तयारी दर्शवायची. नातेवाईक एकमेकांना फोन लावून तुमचा संपर्क त्यांच्याशी झाला का हेच विचारणा करीत होते. तब्बल सात तासानंतर सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास त्यांच्याशी संपर्क झाला, ‘आम्ही सुरक्षित आहोत’ ही वार्ता कानी पडताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. परंतु सुखरूप भारतात परतत नाही तेव्हापर्यंत त्यांच्या मनात भितीच होती. सकाळी कानपूर येथे पोहोचले असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा श्वास सोडला. त्या यात्रेकरूंना जेवणाची सोय नाही, पाण्याची सोय नाही. जो तो भयभीत असलेले चित्र तिथे होते, असे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)रेल्वे कर्मचारी व गोरखपुरात मदतनेपाळ येथे गेलेल्या या गोंदियाकरांना नेपाळमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी व गोरखपूर येथे पप्पूभाई अग्रवाल नावाच्या व्यक्तीने बरीच मदत केली. जेवनापासून झोपण्यापर्यंतची सोय त्यांनी करून दिली. मात्र कानपूरपर्यंत या प्रवाश्यांंना कसलीही मदत मिळाली नव्हती.