शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मतदान झाले ईव्हीएमबंद, आता मतमोजणीचा मनाला घोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 18:34 IST

जिल्हा परिषदेच्या ४३, पंचायत समितीच्या ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी मंगळवारी (दि. २१) मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावून आपल्या मनातील उमेदवाराला मतदान केले.

ठळक मुद्देमहिनाभर करावी लागणार निकालाची प्रतीक्षा : आता लक्ष ३० जागांकडे

गोंदिया : ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून जिल्हा परिषदेच्या ४३, पंचायत समितीच्या ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी मंगळवारी (दि. २१) मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावून आपल्या मनातील उमेदवाराला मतदान केले. मात्र आता मतदारांनी नेमका कोणत्या उमेदवाराला कौल दिला याच्या निकालासाठी १९ जानेवारी म्हणजे तब्बल महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने या जागा वगळून मंगळवारी मतदान घेण्यात आले. त्यामुळे आता ओबीसी प्रवर्गाच्या जागा खुल्या करुन त्या ३० जागांसाठी १८ जानेवारीला निवडणूक घेण्यात येणार आहे. यानंतर सर्वांची एकत्रित मतमोजणी १९ जानेवारीला करण्यात येईल. तोपर्यंत उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. निकाल काय लागणार याचा उमेदवारांना आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना महिनाभर घोर राहणार आहे.

ओबीसी आरक्षणावरील सुनावणी लांबल्याने उमेदवारांना प्रचारासाठी फारच कमी कालावधी मिळाला. तरी या कमी कालावधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच उमेदवार आणि नेत्यांनी केला. पण यात कोण यशस्वी होतो हे मात्र १९ जानेवारीच्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

या जागांवर ठरणार सत्तेचे समीकरण

ओबीसी प्रवर्गाच्या जागा सर्वसाधारण करुन या जागांवर १८ जानेवारीला निवडणूक होत आहे. यात जिल्हा परिषदेच्या १० तर पंचायत समितीच्या २० जागांचा समावेश आहे. या ३० जागा महत्त्वपूर्ण असून यावर जिल्हा परिषदेच्या सत्तेचे समीकरण अवलंबून असणार आहे. त्यामुळे या जागा आपल्या पदरात पडाव्या यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचा भर आहे. त्यामुळे १८ जानेवारीची निवडणूक अधिक चुरसपूर्ण होण्याची शक्यता आहे.

प्रचारासाठी मिळणार भरपूर कालावधी

ओबीसी जागा सर्वसाधारण करण्यात आल्या असल्या तरी या जागेवर ओबीसी उमेदवारच देण्याचा निश्चय सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. त्यासाठी जवळपास सर्वच पक्षांचे उमेदवार देखील निश्चित झाले आहे. त्यामुळे उमेदवारांनी आतापासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांना प्रचारासाठी किमान महिनाभराचा कालावधी मिळणार आहे.

कोणते क्षेत्र होणार महिलांसाठी राखीव

ओबीसी जागा आता सर्वसाधारण करण्यात आल्या असून यात काही जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. यासाठी २३ डिसेंबरला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीनंतरच कोणते क्षेत्र महिलांसाठी राखीव आहे हे कळेल.

टॅग्स :Electionनिवडणूकzpजिल्हा परिषदZP Electionजिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समिती