शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गोंदियात प्राध्यापक, शिक्षक चालले रोजगार हमीच्या कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 12:32 IST

तिरोडा तालुक्यातील आठ ते दहा शिक्षक शिक्षिका मनरेगाच्या कामावर जात असल्याचे धक्कादायक बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देवीस वर्षांपासून वेतनाविनाशासन आणि शिक्षण विभागाचे वेळकाढू धोरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील १६३८ विनाअनुदानीत विद्यालयांमध्ये कार्यरत शिक्षकांना मागील वीस वर्षांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र यानंतर शासनाने त्यांची दखल घेतली नसल्याने विनाअनुदानीत विद्यालयात कार्यरत प्राध्यापक व शिक्षकांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजेनच्या कामावर जावून आपला उदरनिर्वाह करावा लागत असल्याची धक्कादायक तिरोडा तालुक्यात उघडकीस आली आहे.

राज्यातील १६३८ विनाअनुदानीत शाळांमध्ये २२ हजार ५०० शिक्षक मागील २० वर्षांपासून कार्यरत आहे.या शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. त्यामुळे या शिक्षकांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या शिक्षकांनी आपल्या मागण्यांकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी आत्मक्लेष आणि कुटुंबीयांसह अन्नत्याग आंदोलन केले. मात्र यानंतरही शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही.त्यामुळेच त्यांनी आता आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मनरेगाच्या कामाचे जाब कार्ड तयार करुन त्या कामावर जाण्यास सुरूवात केली आहे. तिरोडा तालुक्यातील आठ ते दहा शिक्षक शिक्षिका मनरेगाच्या कामावर जात असल्याचे धक्कादायक बाब पुढे आली आहे.

शासनाने दुर्लक्षित धोरणामुळे त्यांना मनरेगाचा आधार घेत आपल्या कुटुंबांचा सांभाळ करावा लागत असल्याचे बिकट चित्र आहे. शासनाने २८ फेब्रुवारी २०१८ ला राज्यातील १४६ उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय आणि १३ सप्टेंबर २०१९ ला १६३८ उच्च माध्यमिक कनिष्ठ विद्यालयांना १ एप्रिल २०१९ पासून अनुदानाची घोषणा केली. त्यासंबंधि २४ फेब्रुवारी २०२० च्या राज्याच्या आर्थिक अधिवेशनात १०६ कोटी ७२ लाख ७६ हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली. मात्र यासंबंधिचा शासन आदेश काढण्यासाठी विलंब केला जात आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानीत कृती संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी शासन स्तरावर अनेकदा पाठपुरावा केला पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. मे महिन्यातच या शिक्षकांनी आत्मक्लेष आणि कुटुंबीयांसह अन्नत्याग आंदोलन सुध्दा केले होते. त्याची अद्यापही शिक्षण मंत्र्यांनी दखल घेतली नाही.

मागील वीस वर्षापासून वेतनाविना कार्यरत असलेल्या शिक्षक प्राध्यापकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी किमान २० टक्के तरी वेतन देण्यात यावा अशी मागणी टिव्टर आणि आणि फेसबुकच्या माध्यमातून केली. पण त्याकडेही शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले. राज्यात सर्वत्र मागील तीन महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊन आहे. अशात विनाअनुदानीत शिक्षकांची मोठी परवड होत आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काही शिक्षक शेती करीत आहेत तर मनरेगाच्या कामांवर जावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.

जिल्ह्यात सहाशे विनाअनुदानीत शिक्षकशासनाने विनाअनुदानीत शिक्षकांना मागील वीस वर्षांपासून वेतन दिले नसले तरी हे शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान दानाचे कार्य अखंडीतपणे करीत आहेत.गोंदिया जिल्ह्यात सहाशेवर विनाअनुदानीत शिक्षक असून शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे त्यांच्यावर आज मोठे आर्थिक संकट कोसळले असून त्यांच्या पदाला लाजेवल असे काम करावे लागत आहे.

मागील वीस वर्षांपासून विनाअनुदानीत शिक्षकांना वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुलांचे शिक्षण आणि कुटुंबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी उच्च शिक्षित शिक्षक आणि प्राध्यापकांना मनरेगाच्या कामावर जाण्याची वेळ शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळेच ओढावली आहे. किमान आतातरी शासनाने या शिक्षकांची दखल घ्यावी.- कैलास बोरकर, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्यविनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती संघटना गोंदिया.

टॅग्स :Teacherशिक्षक