शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गोंदियात प्राध्यापक, शिक्षक चालले रोजगार हमीच्या कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 12:32 IST

तिरोडा तालुक्यातील आठ ते दहा शिक्षक शिक्षिका मनरेगाच्या कामावर जात असल्याचे धक्कादायक बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देवीस वर्षांपासून वेतनाविनाशासन आणि शिक्षण विभागाचे वेळकाढू धोरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील १६३८ विनाअनुदानीत विद्यालयांमध्ये कार्यरत शिक्षकांना मागील वीस वर्षांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र यानंतर शासनाने त्यांची दखल घेतली नसल्याने विनाअनुदानीत विद्यालयात कार्यरत प्राध्यापक व शिक्षकांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजेनच्या कामावर जावून आपला उदरनिर्वाह करावा लागत असल्याची धक्कादायक तिरोडा तालुक्यात उघडकीस आली आहे.

राज्यातील १६३८ विनाअनुदानीत शाळांमध्ये २२ हजार ५०० शिक्षक मागील २० वर्षांपासून कार्यरत आहे.या शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. त्यामुळे या शिक्षकांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या शिक्षकांनी आपल्या मागण्यांकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी आत्मक्लेष आणि कुटुंबीयांसह अन्नत्याग आंदोलन केले. मात्र यानंतरही शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही.त्यामुळेच त्यांनी आता आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मनरेगाच्या कामाचे जाब कार्ड तयार करुन त्या कामावर जाण्यास सुरूवात केली आहे. तिरोडा तालुक्यातील आठ ते दहा शिक्षक शिक्षिका मनरेगाच्या कामावर जात असल्याचे धक्कादायक बाब पुढे आली आहे.

शासनाने दुर्लक्षित धोरणामुळे त्यांना मनरेगाचा आधार घेत आपल्या कुटुंबांचा सांभाळ करावा लागत असल्याचे बिकट चित्र आहे. शासनाने २८ फेब्रुवारी २०१८ ला राज्यातील १४६ उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय आणि १३ सप्टेंबर २०१९ ला १६३८ उच्च माध्यमिक कनिष्ठ विद्यालयांना १ एप्रिल २०१९ पासून अनुदानाची घोषणा केली. त्यासंबंधि २४ फेब्रुवारी २०२० च्या राज्याच्या आर्थिक अधिवेशनात १०६ कोटी ७२ लाख ७६ हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली. मात्र यासंबंधिचा शासन आदेश काढण्यासाठी विलंब केला जात आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानीत कृती संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी शासन स्तरावर अनेकदा पाठपुरावा केला पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. मे महिन्यातच या शिक्षकांनी आत्मक्लेष आणि कुटुंबीयांसह अन्नत्याग आंदोलन सुध्दा केले होते. त्याची अद्यापही शिक्षण मंत्र्यांनी दखल घेतली नाही.

मागील वीस वर्षापासून वेतनाविना कार्यरत असलेल्या शिक्षक प्राध्यापकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी किमान २० टक्के तरी वेतन देण्यात यावा अशी मागणी टिव्टर आणि आणि फेसबुकच्या माध्यमातून केली. पण त्याकडेही शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले. राज्यात सर्वत्र मागील तीन महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊन आहे. अशात विनाअनुदानीत शिक्षकांची मोठी परवड होत आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काही शिक्षक शेती करीत आहेत तर मनरेगाच्या कामांवर जावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.

जिल्ह्यात सहाशे विनाअनुदानीत शिक्षकशासनाने विनाअनुदानीत शिक्षकांना मागील वीस वर्षांपासून वेतन दिले नसले तरी हे शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान दानाचे कार्य अखंडीतपणे करीत आहेत.गोंदिया जिल्ह्यात सहाशेवर विनाअनुदानीत शिक्षक असून शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे त्यांच्यावर आज मोठे आर्थिक संकट कोसळले असून त्यांच्या पदाला लाजेवल असे काम करावे लागत आहे.

मागील वीस वर्षांपासून विनाअनुदानीत शिक्षकांना वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुलांचे शिक्षण आणि कुटुंबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी उच्च शिक्षित शिक्षक आणि प्राध्यापकांना मनरेगाच्या कामावर जाण्याची वेळ शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळेच ओढावली आहे. किमान आतातरी शासनाने या शिक्षकांची दखल घ्यावी.- कैलास बोरकर, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्यविनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती संघटना गोंदिया.

टॅग्स :Teacherशिक्षक