शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

गोंदियात दिव्याखाली अंधार

By admin | Updated: November 13, 2014 23:03 IST

गेल्या अनेक वर्षापासून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर वसलेल्या गोंदिया शहरवासियांसाठी ‘स्वच्छ आणि सुंदर गोंदिया’ हे अखेरपर्यंत स्वप्नच राहणार का? असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे.

स्वच्छ गोंदियाचे स्वप्न धुळीस : न.प. प्रशासनाच्या उदासीनतेने गाठला कळसगोंदिया : गेल्या अनेक वर्षापासून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर वसलेल्या गोंदिया शहरवासियांसाठी ‘स्वच्छ आणि सुंदर गोंदिया’ हे अखेरपर्यंत स्वप्नच राहणार का? असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे. पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या निमित्ताने तरी गोंदियातील हे चित्र बदलेल अशी अपेक्षा सर्वांना आहे. मात्र नगर परिषद प्रशासनाच्या उदासीनतेमुळे स्वच्छ गोंदियाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणे तर दूर, त्या दृष्टीने प्रयत्नही होताना दिसत नाही, ही कटू सत्य गोंदियावासीयांना स्वीकारावे लागत आहे.दिवसभरात कोणत्याही वेळी फेरफटका मारला तरी शहराच्या अनेक भागात कचऱ्यांचे ढिगारे रस्त्याच्या कडेला साचल्याचे आणि नाल्या तुंबल्याचे चित्र कायम दिसून येते. त्यामुळे नगर परिषदेला स्वच्छता कर्मचारी आहेत की नाही असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. शहरातील रेल्वे स्थानकाबाहेर परिसर, प्रभू रोड, भाजीबाजार, बाई गंगाबाई रुग्णालयाबाहेरील परिसर, पोलीस ठाण्याच्या समोरील आणि मागील परिसर, तहसील कार्यालयाबाहेरील परिसर, नेहरू चौक, जयस्तंभ चौक, मूर्री रोड अशा कितीतरी भागातील नागरिक आणि व्यावसायिकांसाठी स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या भागात फेरफटका मारला तरी चार दिवसांपूर्वी टाकलेला कचरा तिथे तसाच पडून दिसतो. त्यामुळे स्वच्छता कर्मचारी नेमके करतात तरी काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.स्वच्छ भारत अभियानाचे सोडा, पण जिकडेतिकडे डासांचे उत्पत्ती झाली आहे. डेंग्यूसारख्या आजाराने शहरातही हातपाय पसरले आहे. तरीही नगर परिषदेला जाग का येत नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे. नागरिकांना स्वच्छतेचे महत्व कळत नाही, असे म्हणून अनेक वेळा नगर परिषद प्रशासन आपली जबाबदार झटकण्याचा प्रयत्न करीत असले तरी नगर परिषदेचे कर्मचारीही आपले कर्तव्य पार पाडत नाही हे कटूसत्य आहे. त्यांच्यावर नगर परिषद प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)