शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

गोंदियात दिव्याखाली अंधार

By admin | Updated: November 13, 2014 23:03 IST

गेल्या अनेक वर्षापासून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर वसलेल्या गोंदिया शहरवासियांसाठी ‘स्वच्छ आणि सुंदर गोंदिया’ हे अखेरपर्यंत स्वप्नच राहणार का? असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे.

स्वच्छ गोंदियाचे स्वप्न धुळीस : न.प. प्रशासनाच्या उदासीनतेने गाठला कळसगोंदिया : गेल्या अनेक वर्षापासून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर वसलेल्या गोंदिया शहरवासियांसाठी ‘स्वच्छ आणि सुंदर गोंदिया’ हे अखेरपर्यंत स्वप्नच राहणार का? असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे. पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या निमित्ताने तरी गोंदियातील हे चित्र बदलेल अशी अपेक्षा सर्वांना आहे. मात्र नगर परिषद प्रशासनाच्या उदासीनतेमुळे स्वच्छ गोंदियाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणे तर दूर, त्या दृष्टीने प्रयत्नही होताना दिसत नाही, ही कटू सत्य गोंदियावासीयांना स्वीकारावे लागत आहे.दिवसभरात कोणत्याही वेळी फेरफटका मारला तरी शहराच्या अनेक भागात कचऱ्यांचे ढिगारे रस्त्याच्या कडेला साचल्याचे आणि नाल्या तुंबल्याचे चित्र कायम दिसून येते. त्यामुळे नगर परिषदेला स्वच्छता कर्मचारी आहेत की नाही असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. शहरातील रेल्वे स्थानकाबाहेर परिसर, प्रभू रोड, भाजीबाजार, बाई गंगाबाई रुग्णालयाबाहेरील परिसर, पोलीस ठाण्याच्या समोरील आणि मागील परिसर, तहसील कार्यालयाबाहेरील परिसर, नेहरू चौक, जयस्तंभ चौक, मूर्री रोड अशा कितीतरी भागातील नागरिक आणि व्यावसायिकांसाठी स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या भागात फेरफटका मारला तरी चार दिवसांपूर्वी टाकलेला कचरा तिथे तसाच पडून दिसतो. त्यामुळे स्वच्छता कर्मचारी नेमके करतात तरी काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.स्वच्छ भारत अभियानाचे सोडा, पण जिकडेतिकडे डासांचे उत्पत्ती झाली आहे. डेंग्यूसारख्या आजाराने शहरातही हातपाय पसरले आहे. तरीही नगर परिषदेला जाग का येत नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे. नागरिकांना स्वच्छतेचे महत्व कळत नाही, असे म्हणून अनेक वेळा नगर परिषद प्रशासन आपली जबाबदार झटकण्याचा प्रयत्न करीत असले तरी नगर परिषदेचे कर्मचारीही आपले कर्तव्य पार पाडत नाही हे कटूसत्य आहे. त्यांच्यावर नगर परिषद प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)