शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
दुधाचे दात पडण्याआधी कॉम्प्युटर शिकले, शाळेत शिकताना बनले सर्वात तरुण सीईओ...
9
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
10
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
11
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
12
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
13
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
14
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
15
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
16
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
17
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
18
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
19
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
20
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!

गोंदिया जिल्ह्यात २२ हजार हेक्टरमधील धानपिकाला अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 2:19 PM

गोंदिया जिल्ह्यात धान पिकाची स्थिती चांगली असताना मागील दोन दिवसापासून असलेले ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा धानाला फटका असून शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकीडरोगाचा प्रादुर्भाव वाढला शेतकऱ्यांवर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामानंतर उन्हाळी धानाची लागवड केली जाते. यंदा २२ हजार हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली आहे. धान पिकाची स्थिती चांगली असताना मागील दोन दिवसापासून असलेले ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा धानाला फटका असून शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने पूर्व विदर्भात पुढील तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. सोमवारी आणि मंगळवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. परिणामी वातावरणात अचानक बदल झाल्याने त्याचा पिकांवर परिणाम झाला आहे. वादळी पावसामुळे सर्वाधिक फळबागांचे नुकसान झाले. आब्यांची देखील मोठ्या प्रमाणात पडझड झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसला.गोंदिया जिल्ह्यात खरीपात १ लाख ७८ हजारावर तर रब्बीमध्ये ४६ हजारावर धानाची लागवड केली जाते. खरीप व रब्बी हंगामातील धान निघाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. ते शेतकरी उन्हाळी धानाची लागवड करतात. यंदा जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली. धान पिकासाठी अनुकुल वातावरण मिळाल्याने धान पीक जोमात आले होते.मात्र सोमवार आणि मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाचा उन्हाळी धानाला फटका बसला. तर ढगाळ वातावरण असल्याने धान पिकांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने सुध्दा पुन्हा दोन तीन दिवस ढगाळ वातावरण राहिल्यास कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. खरीप व रब्बीनंतर शेतकरी वर्षभराचा खर्च भरुन काढण्यासाठी उन्हाळी धानाची लागवड करतात. याची शेतकऱ्यांना बरीच मदत होत असते. मात्र अवकाळी पाऊस आणि कीडरोगांमुळे शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

फळबागांना फटकाअवकाळी पाऊस आणि वादळाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील आंब्याच्या बागांना बसला आहे. वादळामुळे आंब्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून बागधारकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.ढगाळ वातावरणामुळे धानावर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तर अवकाळी पावसामुळे धानासह इतर पिकांना फटका बसू शकतो.- नंदकिशोर नयनवाड, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.

टॅग्स :agricultureशेती