शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

 गोंदिया जिल्ह्यात नऊ दिवसात वाढले २४३३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 10:51 IST

गोंदिया शहरात मागील तीन दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा दररोज ३०० वर निघत आहे.

ठळक मुद्दे३५ कोरोना बाधितांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा संसर्ग झपाटयाने वाढत असून जिल्ह्यात तिनशेचा पाढा सुरू झाला आहे. मागील तीन दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा दररोज ३०० वर निघत आहे. तर सर्वाधिक रुग्ण हे गोंदिया शहरात आढळत आहे. शुक्रवारी (दि.२५) सुध्दा जिल्ह्यात ३३२ कोरोना बाधितांची नोंद झाली तर पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे वेळीच सावध होत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. अन्यथा परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना तुम्हाला बाहेर पडण्यापासून थांबविण्यापूर्वी तुम्हीच त्याला हद्दपार करण्याचा संकल्प करा.

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ आहे. दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यात दररोज दीडशे कोरोना बाधितांची नोंद होत होती. तर मागील नऊ दिवसांपासून त्यात वेगाने वाढ झाली आहे. आता तिनशे रुग्ण आढळत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा तिनशेचा पाढा सुरू झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात १६ ते २५ सप्टेंबर दरम्यान २४३३ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. नऊ दिवसांच्या कालावधी ३५ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मागील नऊ दिवसात सरासरी दररोज २८७ कोरोना बाधित आढळत आहेत तर ४ कोरोना बाधितांचा मृत्यू होत आहे. कोरोना बाधितांचा ग्राफ दररोज वाढत असल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली असून आरोग्य यंत्रणेवरील ताण सुध्दा वाढला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सुध्दा आता स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे. याकडे थोडेही दुर्लक्ष करणे आता नागरिकांनाच महाग पडू शकते. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, मास्कचा नियमित वापर करावा, गर्दीच्या ठिकाणीे जाणे टाळावे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा तसेच आरोग्य विभागाने सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोना संसर्ग वाढू न देणे हे आता नागरिकांच्याच हाती आहे. नमुन्यांची संख्या वाढलीजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कोरोना चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत दररोज केवळ ३५० स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता आहे. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून दररोज दोन हजारावर स्वॅब नमुन्यांचा अहवाल राहत आहे. अन्यथा कोरोना बाधितांचा आकडा अधिक वाढला असता. त्यामुळे आता आणखी एक आरटीपीसीआर मशिन लावण्यात येणार आहे.अहवालास विलंब, संसर्ग वाढीस मदतबºयाच लोकांना कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसल्यास ते मेडिकलच्या प्रयोगशाळेत स्वॅब नमुने तपासणीसाठी जात आहे. मात्र स्वॅब नमुने तपासणीचा अहवाल चार ते पाच दिवसानंतर प्राप्त होत आहे. त्यामुळे या कालावधी ते अनेकांच्या संपर्कात येत असून यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्यास मदत होत आहे. त्यामुळे स्वॅब नमुने तपासणीचा अहवाल २४ तासात मिळणे गरजेचे आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस