शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना देव पावला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 05:00 IST

कोरोनाचा संसर्ग, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण यामुळे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला घेऊन अनिश्चितता होती. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे वर्षभराचे वेळापत्रक जाहीर केले तर अभ्यास करणाऱ्यांना योग्य होईल असे मुलांना वाटत आहे. लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असल्याने हजारो जागा काढणे अपेक्षित आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता देव पावला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २९० पदांची जाहिरात निघाल्याने आता फक्त वेळेवर परीक्षा व्हावी असे विद्यार्थ्यांना वाटत आहे. निघालेल्या जागांसंदर्भात थोडा आनंद परंतु कमी जागा असल्याने नाराजीही व्यक्त होत आहे. स्पर्धा परीक्षेच्या नादी लागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  त्यामुळे वर्षातून किमान दोन वेळा परीक्षेची संधी देण्यात यावी, असा सूर उमटत आहे.कोरोनाचा संसर्ग, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण यामुळे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला घेऊन अनिश्चितता होती. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे वर्षभराचे वेळापत्रक जाहीर केले तर अभ्यास करणाऱ्यांना योग्य होईल असे मुलांना वाटत आहे. लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असल्याने हजारो जागा काढणे अपेक्षित आहे. 

२९० पदांची जाहिरातमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत गट-अ च्या ७ तर गट- ब च्या १० संवर्गांसाठी जाहिरात काढण्यात आली. त्यात २९० पदे ब गटाची आहेत.  त्यात ५४ पदे ही सरकारी कामगार अधिकारी या पदाची आहेत. १०० पदे ही गट अ ची असून सहायक कामगार आयुक्तांची सर्वाधिक २२ पदे आहेत.

२५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार- २ जानेवारी २०२२ रोजी राज्यसेवेची पूर्व परीक्षा ३७ जिल्हा केंद्रांवर होणार आहे. यासाठी ५ ते २५ ऑक्टाेबरपर्यंत करता येणार आहे.- राज्यसेवेची पूर्व परीक्षा २०२१ मार्फत २९० पदांच्या १७ संवर्गांत ही भरती केली जाणार आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे म्हणणे आहे.

वय निघून चालले, काय होणार?वर्षाकाठी दोन वेळा जाहिरात निघणे आवश्यक आहे. एकदा भरती झाल्यावर दोन-तीन वर्षे जागाच निघत नाही. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांची फौज खूप मोठी आहे. पण त्या तुलनेत जागाच निघत नाही.स्पर्धापरीक्षेच्या तारखा अनिश्चित राहत असल्याने तयारी करणारा विद्यार्थी निराशेच्या छायेत आहे. शासनाने झोपेचे सोंग घेऊ नये, शासन बोलते वेगळे आणि करते वेगळे. आयोगाने वेळापत्रक जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. ओबीसी आरक्षण असो किंवा मराठा आरक्षण असो त्यांचा मुद्दा तसाच पडून आहे. आधी ज्यांनी परीक्षा पास केल्या त्यांना नियुक्ती देण्यात आल्या नाही. दोन-तीन वर्षांत एकदा भरती निघते. अधिकारी होण्याच्या नादात तयारी करणाऱ्यांचे वय ओलांडत चालले आहे. 

निघालेल्या जागांची संख्या आणि अभ्यास करणारे विद्यार्थी यांची संख्या पाहिल्यास कीव येते. कोणत्या ना कोणत्या कारणाने परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांत नाराजी आहे. विद्यार्थ्यांनीही इतर पर्याय निवडणे गरजेचे आहे.- राजकुमार हिवारे, मार्गदर्शक

नोकरीचा नाद करून स्पर्धा परीक्षेची तयारीच करणाऱ्या लोकांचे वय वाढत गेले आणि नोकरी हातात आली नाही तर त्यांच्या मनात नैराश्य येते. नैराश्य येऊ नये यासाठी योग्य वयातच योग्य कामाला सुरुवात करणे गरजेचे आहे.- झेड.डी. पठ्ठे, मार्गदर्शक

 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा