शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘शून्य माता मृत्यू’ची उद्दिष्टपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:25 IST

सन २०१६-१७ मध्ये संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झालेल्या उपजिल्हा रूग्णालयाने अनेक बाबीत उपलब्धी मिळविली आहे.

ठळक मुद्देतिरोडा उपजिल्हा रूग्णालय : सहा महिन्यांत धोकादायक अशा ८७ प्रसूती यशस्वी

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सन २०१६-१७ मध्ये संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झालेल्या उपजिल्हा रूग्णालयाने अनेक बाबीत उपलब्धी मिळविली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांनी जिल्ह्यात सुरू केलेल्या ‘शून्य माता मृत्यू’ अभियानाचीसुद्धा तिरोडा उपजिल्हा रूग्णालयाने ६ महिन्यांत (अर्धवार्षिक) धोकादायक स्थितीत असलेल्या ८७ प्रसूती सिझेरियनद्वारे यशस्वी करून उद्दिष्टपूर्ती केली आहे.विशेष म्हणजे, तिरोडा उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात त्यांच्या वैद्यकीय चमूने परिश्रम घेवून कायाकल्प कार्यक्रमात महाराष्टÑ राज्यातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविला. त्याबद्दल नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्री श्री. जे.पी. नड्डा यांच्या हस्ते १५ फेब्रुवारी रोजी त्यांचा व त्यांच्या चमूचा गौरव करण्यात आला. तसेच मुंबई येथे महाराष्टÑ राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्तेसुद्धा १० जुलै रोजी पुरस्कृत करण्यात आले.यानंतर तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात १ एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान सहा महिन्यांच्या कालावधीत सिझेरियनद्वारे धोकादायक असलेल्या ८७ यशस्वी प्रसूती सुरक्षिरित्या करण्यात आल्या. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी सुरू केलेल्या ‘शून्य माता मृत्यू’ अभियानाची उद्दिष्टपूर्ती या सहा महिन्यांत सदर रूग्णालयाच्या चमूने करून दाखविली. तसेच सदर अभियान पुढेही यशस्विरित्या राबविण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक व त्यांची चमू परिश्रम घेत आहे. कोणत्याही मातेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू होवू नये व नवजात बाळही सुरक्षित असावे, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहे.विविध प्रकारच्या २८६ रूग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद, नागपूर, पुणे येथील तज्ज्ञांकडून तिरोडा उपजिल्हा रूग्णालयातील टेलिमेडिसिन सेंटरच्या माध्यमाने उपचार करण्यात आला. यासाठी टेलिमेडिसिन सेंटरचे संचालक कमलेश शुक्ला यांनी सहकार्य करीत विविध विषयांतील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला रूग्णांना मिळवून दिला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मेश्राम व त्यांच्या चमूच्या परिश्रमामुळेच सातत्याने पाच वेळा जिल्ह्यातून डॉ. आनंदीबाई जोशी प्रथम क्रमांकाचे पुरस्कार तिरोडा उपजिल्हा रूग्णालयाला मिळाले.५८ कुपोषित बालकांवर उपचार१ एप्रिल ते ३० सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत तिरोडा उपजिल्हा रूग्णालयातील बाल उपचार केंद्रात ५८ कुपोषित बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आला. त्यामुळे त्या बालकांची वजनवाढ होवून शारीरिक विकासात भर पडली. तसेच मोतीबिंदूच्या ११९ रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी प्रदान करण्यात आली. तसेच काही रूग्णांना इतर डॉक्टरांचा सल्ला घेण्याबाबत व डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.जिल्हाधिकाºयांनी सुरू केलेले ‘शून्य माता मृत्यू’ अभियान पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी आम्ही पूर्ण परिश्रम घेत आहोत. याचीच फलश्रुती म्हणजे मागील सहा महिन्यांत तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात एकाही मातेचा मृत्यू झाला नाही. प्रसूत माता व नवजात बाळ यांची पूर्ण काळजी घेतली जात आहे.डॉ. हिंमत मेश्राम,वैद्यकीय अधीक्षक,उपजिल्हा रूग्णालय, तिरोडा.